शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 12:07 IST

Fly ash for bricks औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  कोळसा व लिग्नाइटवर चालणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या विटांची निर्मिती बंद करावी, या आशयाची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील प्लाय ॲश वापरण्याच्या बंधनाचा मुद्दा वगळण्यात येत आहे, असे प्रतिज्ञापत्र पंजाब-हरियाणा राज्याच्या चंडिगड उच्च न्यायालयात मंत्रालयाच्या वतीने २० जानेवारी रोजी सादर करण्यात आले. त्यामुळे देशभरातील वीटभट्टी मालकांचा जीव भांड्यात पडला आहे. केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर, १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कोळसा किंवा लिग्नाइटवर आधारीत औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी फ्लाय अ‍ॅश वापरण्याचे बंधनकारक होते. त्या अधिसूचनेमध्ये संशोधन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २५ फेब्रुवारी, २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसांत संबंधितांकडून आक्षेपही मागविण्यात आले. आक्षेपानंतर पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले. मात्र, त्या अधिसूचनेनुसार औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या विटांची निर्मिती अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे देशभरासह अमरावती विभागात पारस, नागपूर विभागात कोराडी, मौदा, चंद्रपूर येथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरातील वीटभट्टी मालकांच्या अडचणी वाढल्या होत्या, तसेच हजारो उद्योग बंद पडणार असल्याने, देशभरातून हजारो आक्षेप केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात दाखल झाले, तसेच पर्यावरण मंत्रालयात ऑल इंडिया ब्रीक्स अ‍ॅण्ड टाइल मॅन्युफ्रॅक्चरर फेडरेशनकडून विशेष पुराव्यांसह बाजूही मांडण्यात आली. त्यासाठी फेडरेशनचे पुणे येथील सदस्य आनंद दामले यांनीही पाठपुरावा केला. 

पर्यावरण मंत्रालयाने मागे घेतली अधिसूचना   केंद्रीय वने, पर्यावरण, जलवायू मंत्रालयातील संशोधक पदावर असलेले डॉ.क्रीश्नन किशोर गर्ग यांनी शासनाच्या अधिसूचनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र २० जानेवारी रोजी न्यायालयात सादर केले.   त्यामध्ये औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा