शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरतीच्या ‘यूजीसी’च्या सूचनांना राज्य शासनाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:55 IST

 १०० टक्के जागा भरण्याचा चौथ्यांदा दिला आदेश

ठळक मुद्दे राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : देशातील उच्चशिक्षण देणाºया अनुदानित संस्थांमध्ये प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. रिक्त जागा १०० टक्के भरण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) देशातील राज्य शासनांना वारंवार आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने १०० टक्के प्राध्यापक भरतीला ठेंगा दाखविला असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीने पुन्हा एकदा पत्र पाठवून जागा भरण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने मागील आठवड्यात विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचे वेळापत्रकच महाविद्यालये, विद्यापीठांना पाठविले आहे. या पत्रात रिक्त जागांची आकडेवारी २० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अध्यापन, गुणवत्ता, परीक्षा आणि संशोधन वाढविण्यासाठी प्राध्यापक भरती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचेही यूजीसीने म्हटले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्यानंतर यूजीसीकडून मिळणाऱ्या अनुदानात, प्रकल्पात वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. ३१ जुलै २०१९ पासून आतापर्यंत चार वेळा पत्र काढून यूजीसीने प्राध्यापक भरतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

यासाठी पदभरतीचे थेट वेळापत्रकच काढले आहे. मात्र, यावर राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही. २०१८ च्या अखेर राज्य शासनाने एकूण रिक्त पदाच्या ४० टक्के आणि महाविद्यालयातील रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या परवानगीनंतरही खाजगी अनुदानित महाविद्यालयांनी जागा भरण्यास उत्साह दाखविलेला नाही. त्यामागे आर्थिक कारणे असल्याचे बोलले जात आहे.

यूजीसीने जाहीर केलेले वेळापत्रकयूजीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात विद्यमान रिक्त जागांसह आगामी सहा महिन्यांत रिक्त होणाºया जागांवर प्राध्यापक भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. आरक्षण तपासून रिक्त जागा १५ दिवसांच्या आत जाहीर कराव्यात, रिक्त जागा भरण्यासाठी ३० दिवसांच्या आत संबंधित अधिका-यांची परवानगी घ्यावी, ३० दिवसांत परवानगी न दिल्यास मान्यता असल्याचे मानावे, रिक्त जागांना मान्यता मिळाल्यास १५ दिवसांत भरण्यासाठी राष्ट्रीय दैनिकात जाहिरात द्यावी, त्यानंतर पात्रताधारकांना अर्ज करण्यास एक महिन्याचा कालावधी द्यावा, निवड समिती अंतिम करण्याची प्रक्रिया वरील कालावधीच्या काळात समांतर पद्धतीने करावी, निवड समितीच्या सदस्यांच्या वेळा १५ दिवसांत ठरवाव्यात, त्याचवेळी महिनाभरात मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी आॅनलाईन जाहीर करावी, त्यानंतर उर्वरित सर्व प्रक्रिया महिनाभरात पार पाडावी, असेही या वेळापत्रकात म्हटले आहे.

...तर राज्यातील उच्चशिक्षणाचे वाटोळे होईलराज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरती अंशत: सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्षात भरती होताना दिसत नाही.  संस्थाचालक परवानगी मिळालेल्या जागा भरण्यास उत्सुक नाहीत. याचा विचार करावा लागेल. आमच्या संघटनेतर्फे प्राध्यापक भरतीसाठी विविध आंदोलने केली. तासिका तत्त्वावर वेठबिगारीसारख्या नेमणुका करून शासन उच्चशिक्षणाचे वाटोळे करीत आहे. अशा पद्धतीच्या धोरणामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती सुधारण्यास कठीण जाणार आहे. याचे खापर राज्य शासनावरच फुटेल, हे नक्की.- डॉ. विक्रम खिलारे, बामुक्टो 

यूजीसीच्या सूचनांचे  पालन झाले पाहिजेविद्यापीठ अनुदान आयोग उच्चशिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजना यशस्वी करण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये शिकविण्यासाठी, संशोधनासाठी प्राध्यापक असणे अत्यंत गरजेचे आहे. रिक्त जागा भरल्यास यूजीसीच्या विविध योजनांमधून अनुदान देता येईल. मात्र, राज्य विद्यापीठांना जागा भरण्यास सक्ती करू शकत नाही. यूजीसी देत असलेल्या निधीतील विद्यापीठांच्या जागा १०० टक्के भरल्या जातील.- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी

राज्य शासनाची मान्यता आवश्यकविद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील १०० टक्के जागा भरण्याविषयी पत्र यूजीसीने काढले आहे. मात्र, आपल्याला जागा भरण्यासाठी राज्य शासनाची मान्यता आवश्यक आहे. सध्या विद्यापीठातील काही जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठProfessorप्राध्यापक