शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 29, 2024 18:49 IST

तिन्ही शिक्षण मंडळाचे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाबरोबरच (एसएससी) सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मुंबईत अकरावी प्रवेशासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. यामुळे अकरावीच्या कटऑफमध्ये यंदा एक ते दोन टक्क्यांनी वाढ संभवते.

दहावीला मुंबई शहर-उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या भागातून उत्तीर्ण झालेल्या ३.२५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार टक्के म्हणजे १३,४३० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १,६४५ने वाढली आहे. तर ३० टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतून ९७,३५४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

दुसरीकडे आयसीएसईच्या ५,२३० विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांवरून अधिक गुण मिळविले आहेत. सीबीएसईने यंदा विभागनिहाय आकडेवारी दिलेली नाही. मात्र या मंडळातूनही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. देशभरात सीबीएसईच्या २.१० लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर सुमारे ४८ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक टक्के मिळविले आहेत. तिन्ही मंडळाच्या दहावीच्या टक्केवारीत वाढ झाल्याने कटऑफ वाढण्यात शक्यता आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांचा इंटिग्रेडेड कोचिंगकडे कल असला तरी कला आणि वाणिज्य शाखेत प्रवेशाकरिता चुरस कायम असेल. 

मुंबईतील कॉलेजेस, उपलब्ध जागा (२०२३-२४ची आकडेवारी)

मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ज्युनिअर कॉलेजेस - १,०१६

उपलब्ध जागा - ३.७५ लाख

गेल्या वर्षी भरल्या गेलेल्या जागा - २.८ लाख

राज्याचे तीन बोर्डांचे एकूण निकाल

एसएससी - ९४.९ टक्के

आयसीएसई - ९९.९

सीबीएसई - ९६.५

५० टक्के प्रवेश

गेल्या वर्षी मिठीबाई कॉलेजमध्ये अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोटा वगळून कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या २,५०० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ५० टक्के जागांवर एसएससी वगळता अन्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल