शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 18:47 IST

१५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे

पुणे : स्वप्निल लोणकरच्या (swapnil lonkar) आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar on mpsc exam) यांनी ६ जुलै २०२१ रोजी विधानसभेत १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे १५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेच्या सभागृहात १५ हजार ५११ पदांची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील २५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक केली आहे. ३० जुलै २०२१ वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (mpsc) रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, अद्यापही कोणत्याही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. मागील २ वर्ष झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात आली नाही.

'२५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक'-

सुमारे २५ लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून १५५११ पदांची भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.- महेश घरबुडे, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

राज्यात लाखो तरुण पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा मुख्य अजेंडा हा तरुणांना न्याय मिळवून देणे आहे. याच धोरणानुसार सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदांच्या बाबत सर्व विभागांना मागणीपत्र ३० सप्टेंबर आयोगाकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. पण एकूणच या विभागातील प्रशासकीय दिरंगाई दिसत आहे. त्यामुळे अद्याप कुठल्या ही विभागाचे मागणी पत्र गेले नसल्याचे समोर येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांची अडचण तसेच पदभरती संदर्भात मागणी करणार आहे.- कल्पेश यादव, युवासेना

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा