शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 18:47 IST

१५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे

पुणे : स्वप्निल लोणकरच्या (swapnil lonkar) आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar on mpsc exam) यांनी ६ जुलै २०२१ रोजी विधानसभेत १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे १५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेच्या सभागृहात १५ हजार ५११ पदांची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील २५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक केली आहे. ३० जुलै २०२१ वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (mpsc) रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, अद्यापही कोणत्याही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. मागील २ वर्ष झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात आली नाही.

'२५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक'-

सुमारे २५ लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून १५५११ पदांची भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.- महेश घरबुडे, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

राज्यात लाखो तरुण पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा मुख्य अजेंडा हा तरुणांना न्याय मिळवून देणे आहे. याच धोरणानुसार सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदांच्या बाबत सर्व विभागांना मागणीपत्र ३० सप्टेंबर आयोगाकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. पण एकूणच या विभागातील प्रशासकीय दिरंगाई दिसत आहे. त्यामुळे अद्याप कुठल्या ही विभागाचे मागणी पत्र गेले नसल्याचे समोर येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांची अडचण तसेच पदभरती संदर्भात मागणी करणार आहे.- कल्पेश यादव, युवासेना

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा