शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 06:32 IST

१७ तारखेपर्यंत मुदत; कागदपत्रांसह उपसंचालक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या आठव्या फेरीच्या प्रस्तावावर अद्याप काहीही निर्णय झाला नसताना प्रवेशासाठी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १७ तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे. जुलैच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊनही अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यंदा गतवर्षीच्या तुलनेत अकरावीची प्रवेश प्रक्रिया आठ दिवस उशिरा सुरू झाली. १ आॅक्टोबरपर्यंत ती सुरू होती. या काळात तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य फेऱ्या अशा सात फेºया पूर्ण झाल्या आहेत. आता अकरावीच्या ऐन परीक्षेच्या काळात आठव्या प्रवेश फेरीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाला दिला, मात्र त्यासंदर्भातील निर्णय होऊ शकला नाही. पूर्ण झालेल्या सात फेऱ्यांत यंदा अकरावी आॅनलाइनमधून किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिले याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही.

यंदा मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी तीन लाखांहून अधिक जागा होत्या. त्यापैकी ९० हजार ते एक लाख जागा रिक्त राहिल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. पुरवणी परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संधी देण्यात आली. त्यानंतर अजूनही विद्यार्थी प्रवेशासाठी येत असल्याने ही प्रक्रिया उपसंचालक कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे.

विद्यार्थी चिंतितअकरावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन महाविद्यालयांत पहिल्या सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. तरीही प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थी चिंतित आहेत. दुसरीकडे परीक्षा सुरू झाल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यास महाविद्यालयांचा विरोध होत आहे. आता प्रवेश दिल्यास या विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण पूर्ण करणार, असा प्रश्न महाविद्यालय प्रशासन उपस्थित करत आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू असून दिवाळीची सुट्टी तोंडावर आहे. त्यातच निवडणुका असल्याने कर्मचारी व पुरेसे प्राध्यापकही महाविद्यालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.