शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

१५ टक्के अभ्यासक्रमांचे मूल्यांकन पूर्ण; नॅक मूल्यांकनाचे प्रमाण ३५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2023 07:06 IST

एनबीए अध्यक्षांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशामध्ये आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन (एनबीए) म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी दिली. हे प्रमाण भविष्यात वाढण्याची गरज आणि आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. 

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठांपैकी केवळ ३० ते ३५ टक्के संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नॅक अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे मूल्यांकन आणि देशातील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमांचे मूल्यांकन या दोन्ही भिन्न आणि स्वतंत्र यंत्रणा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. वॉशिंग्टन अकॉर्ड या धोरणांतर्गत एनबीए संस्था येत असून, त्यानुसार ज्या अभ्यासक्रमांना एनबीए मूल्यांकन मिळाले आहे, ते अभ्यासक्रम इतर २५ देशांतील त्या अभ्यासक्रमांशी समकक्ष ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर देशांत जाऊन पुन्हा तोच अभ्यासक्रम न करता समकक्षता मिळाल्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविणे शक्य होते. यामुळे अधिकाधिक अभ्यासक्रमांना एनबीए मान्यता प्राप्त होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

नॅक मूल्यांकन आवश्यकचशैक्षणिक संस्थेतील, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील शिक्षणाच्या दर्जावरच पदवीधराकडे काय कौशल्य असेल? त्याला नोकरी कशी आणि कुठे मिळेल हे अवलंबून असल्यामुळे नॅक मूल्यांकन आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेचा ‘दर्जा’ आणि ‘गुणवत्ता’ ओळखण्यासाठी मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचे मत सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी मांडले. राज्य उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून केले जाणारे प्रयत्न चांगले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.