शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

बारावीच्या पुनर्मूल्यांकन निकालाला विलंब! मंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 07:45 IST

उच्च शिक्षणासाठी भवितव्य टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल न मिळाल्याने त्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पूर्वपरीक्षाचा म्हणजेच एमएचटी सीईटी, जेईई, नीट यांचा निकाल जाहीर होऊन, १५ जूनपासून सीईटी सेलकडून ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बारावीच्या निकालाबद्दल पुनर्मूल्यांकनाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर लागले आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. मात्र या अभ्यासक्रमांसाठी पूर्वपरीक्षा गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ५ ते १० गुण कमी मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी बारावीच्या काही विषयांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यांच्या अर्जाबद्दल मंडळाकडून अद्याप कोणतीही प्राथमिक प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली नाही. या अशा कारभारामुळे त्यांचा बारावी परीक्षेचा निकाल विलंबाने लागल्यास हुशार विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणालाच मुकावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

  • राज्य मंडळाच्या या भोंगळ कारभाराबाबत मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवत त्वरित हा निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी केली आहे.
  • पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास युवासेना तीव्र आंदोलन छेडण्याचा असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :collegeमहाविद्यालय