शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अकरावी प्रवेशाचे कवित्व सुरूच; १ लाख ६५ हजार जागा अद्याप रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 08:31 IST

शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ४ लाख २० हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि अद्यापही एकूण उपलब्ध जागांपैकी १ लाख ६५ हजार ८२२ जागा अद्याप रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. दरम्यान, अजूनही अनेक विद्यार्थी विभागीय उपसंचालक कार्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची चौकशी करीत आहेत. याच कारणास्तव शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. शिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची अधिकृत घोषणा केली गेली नसल्याने, एकीकडे महाविद्यालयांचे संस्था चालक आणि प्राचार्य याबाबत सातत्याने विचारणा या करीत आहेत.

नागपुरात सर्वाधिक जागा रिक्त अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागांत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. या शिवाय अमरावती विभागात ८४ टक्के, नागपूर विभागात ८७ टक्के, नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. 

अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या चौकशीसाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विशेष काही करता येईल का, याची विचारणा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. - शेषराव बडे, सहायक उपसंचालक मुंबई विभाग.