शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अकरावी प्रवेशाचे कवित्व सुरूच; १ लाख ६५ हजार जागा अद्याप रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 08:31 IST

शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ४ लाख २० हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि अद्यापही एकूण उपलब्ध जागांपैकी १ लाख ६५ हजार ८२२ जागा अद्याप रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. दरम्यान, अजूनही अनेक विद्यार्थी विभागीय उपसंचालक कार्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची चौकशी करीत आहेत. याच कारणास्तव शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. शिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची अधिकृत घोषणा केली गेली नसल्याने, एकीकडे महाविद्यालयांचे संस्था चालक आणि प्राचार्य याबाबत सातत्याने विचारणा या करीत आहेत.

नागपुरात सर्वाधिक जागा रिक्त अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागांत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. या शिवाय अमरावती विभागात ८४ टक्के, नागपूर विभागात ८७ टक्के, नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. 

अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या चौकशीसाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विशेष काही करता येईल का, याची विचारणा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. - शेषराव बडे, सहायक उपसंचालक मुंबई विभाग.