शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

अकरावीच्या शेवटच्या फेरीत १ हजार ५३ प्रवेश निश्चित; अद्याप ७६ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 3:15 AM

यानंतर प्रवेशासाठी संधी नाही, विद्यार्थ्यांबाबत मूल्यमापनाच्या निर्णयाने संभ्रम

मुंबई : अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर अकरावीमध्ये प्रवेश घेण्यास २६ मार्चपर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली होती. या संधीच्या साहाय्याने मुंबई विभागात अकरावीच्या १ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपला प्रवेश निश्चित केला आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या कारणास्तव अनेक विद्यार्थी, पालक जिल्हा, राज्याबाहेर असल्याने त्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. यानंतर अकरावी प्रवेशासाठी कोणतीही संधी देण्यात येणार नसून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

यंदा मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी एकूण ३ लाख २० हजार ७५० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ६० हजार ९ जागांसाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशअर्ज सादर करण्यात आले होते. ३ नियमित फेऱ्या व २ विशेष फेऱ्या, २ एफसीएफएस फेऱ्यांनंतर मुंबई विभागात आतापर्यंत कला शाखेत एकूण २२ हजार ११४, वाणिज्य शाखेत १ लाख ३० हजार २९८, विज्ञान शाखेत ६८ हजार १६७, तर एचएसव्हीसी शाखेत ३ हजार ७२ प्रवेश निश्चित झाले आहेत. एफसीएफएस ३ साठी मुंबईत अकरावीच्या ७७ हजार ३९५ जागा उपलब्ध होत्या. १ हजार १४५ विद्यार्थ्यांना जागा या अलॉट झाल्या. मात्र, त्यातील १ हजार ५३ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले.  त्यामुळे मुंबई विभागात अद्याप अकरावीच्या ७६ हजार ३४२ जागा रिक्त आहेत.

‘मूल्यमापन कसे करणार?’अकरावी प्रवेशप्रक्रिया कोरोना व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उशिरा सुरू झाली असली तरी अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या २ महिन्यांतच पूर्ण झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी अकरावीचे ऑनलाइन शिक्षणही सुरू करून विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात केली होती. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश मात्र आताच झाल्याने त्यांच्या अकरावीच्या अभ्यासक्रमाचे काय, तो पूर्ण कसा करणार, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय? असे प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. अद्याप शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांचे बारावीचे वर्ष कसे आणि कधी सुरू होणार याविषयी गोंधळ निर्माण झाला असल्याच्या प्रतिक्रिया महाविद्यालयीन प्राचार्यही देत आहेत. अकरावी विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाने लवकर निर्णय घेऊन त्यांना गोंधळमुक्त करावे, अशी मागणी शिक्षक संघटना व पालक करीत आहेत.