शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम

By admin | Updated: July 30, 2016 05:42 IST

मणिपूरसह ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार बहाल करणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षांपासून

मणिपूरसह ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार बहाल करणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या इरॉम चानू शर्मिला यांनी आपले उपोषण मागे घेण्याबाबत घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. आजच्या परिस्थितीत उपोषणाने प्रश्न सुटणे अवघड असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी आपला मार्ग बदलण्याचे ठरविले. परंतु याचा अर्थ इरॉम यांनी या लढ्यातून माघार घेतली असे अजिबातच नाही. तर यापुढे लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरुन आपला हा लढा पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. इरॉम शर्मिला यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ऐन तारुण्यात उपोषणास प्रारंभ केला तेव्हा एका तरुण मनाने भावनेच्या आवेगात उचललेले हे पाऊल असल्याचा अनेकांचा समज झाला होता. पण कालांतराने त्यांच्या संघर्षाचे गांभीर्य आणि त्यातील सत्यता समोर आली. आपल्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अत्यंत दृढ निश्चयाने पुकारलेला तो लढा होता. त्यांच्या उपोषणाने देशाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचे एक वेगळे रुप लोकांपुढे आले. आपल्या अख्ख्या तारुण्याची आहुती देणाऱ्या इरॉम यांनी निस्वार्थ जनसेवेचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. नोव्हेंबर २००० मध्ये घडलेल्या एका घटनेने त्यांच्या मनात या संघर्षाची ठिणगी पडली होती. मणिपूरची राजधानी इम्फाळला लागून असलेल्या मलोम येथे त्या एका शांतता सभेला संबोधित करीत असताना सैन्यदलाने सभेला उपस्थित लोकांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात दहा निष्पाप जीव मारले गेले. मृतांमध्ये लेसंगबम इबेतोमी ही वृद्ध महिला आणि बहादुरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनम चंद्रमणी यांचाही समावेश होता. जवानांकडून नागरिकांवर गोळीबाराची ही काही पहिली घटना नव्हती. अत्याचाराने परीसीमा गाठली असल्याची तीव्र भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे आहे, सशस्त्र दलाने सामान्य नागरिकांविरुद्ध युद्धच पुकारले आहे; असा आक्रोश व्यक्त करीत सशस्त्र दलाला विशेषाधिकार देणारा कायदा हटविण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. आणि यासाठी संघर्षाचे बिगुल फुंकले. इरॉम आज ४४ वर्षांच्या आहेत. त्यांचे उपोषण मोडण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी अनेक प्रयत्न केले. आत्महत्त्येचा प्रयत्न करीत असल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदविण्यात आला. पोलिसांनी अनेकदा अटकही केली. वेळप्रसंगी त्यांना नाकात नळी घालून अन्न भरविण्यात आले. पण इरॉम यांनी आपले मनोबल खचू दिले नाही. त्यांच्या या प्रदीर्घ संघर्षानंतरही सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्यात आला नसला तरी ईशान्येकडील सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांनी साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आणि हेच त्यांच्या संघर्षाचे फलित आहे.