शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

जिद्दीला सलाम

By admin | Updated: July 30, 2016 05:42 IST

मणिपूरसह ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार बहाल करणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षांपासून

मणिपूरसह ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार बहाल करणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या इरॉम चानू शर्मिला यांनी आपले उपोषण मागे घेण्याबाबत घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. आजच्या परिस्थितीत उपोषणाने प्रश्न सुटणे अवघड असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी आपला मार्ग बदलण्याचे ठरविले. परंतु याचा अर्थ इरॉम यांनी या लढ्यातून माघार घेतली असे अजिबातच नाही. तर यापुढे लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरुन आपला हा लढा पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. इरॉम शर्मिला यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ऐन तारुण्यात उपोषणास प्रारंभ केला तेव्हा एका तरुण मनाने भावनेच्या आवेगात उचललेले हे पाऊल असल्याचा अनेकांचा समज झाला होता. पण कालांतराने त्यांच्या संघर्षाचे गांभीर्य आणि त्यातील सत्यता समोर आली. आपल्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अत्यंत दृढ निश्चयाने पुकारलेला तो लढा होता. त्यांच्या उपोषणाने देशाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचे एक वेगळे रुप लोकांपुढे आले. आपल्या अख्ख्या तारुण्याची आहुती देणाऱ्या इरॉम यांनी निस्वार्थ जनसेवेचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. नोव्हेंबर २००० मध्ये घडलेल्या एका घटनेने त्यांच्या मनात या संघर्षाची ठिणगी पडली होती. मणिपूरची राजधानी इम्फाळला लागून असलेल्या मलोम येथे त्या एका शांतता सभेला संबोधित करीत असताना सैन्यदलाने सभेला उपस्थित लोकांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात दहा निष्पाप जीव मारले गेले. मृतांमध्ये लेसंगबम इबेतोमी ही वृद्ध महिला आणि बहादुरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनम चंद्रमणी यांचाही समावेश होता. जवानांकडून नागरिकांवर गोळीबाराची ही काही पहिली घटना नव्हती. अत्याचाराने परीसीमा गाठली असल्याची तीव्र भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे आहे, सशस्त्र दलाने सामान्य नागरिकांविरुद्ध युद्धच पुकारले आहे; असा आक्रोश व्यक्त करीत सशस्त्र दलाला विशेषाधिकार देणारा कायदा हटविण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. आणि यासाठी संघर्षाचे बिगुल फुंकले. इरॉम आज ४४ वर्षांच्या आहेत. त्यांचे उपोषण मोडण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी अनेक प्रयत्न केले. आत्महत्त्येचा प्रयत्न करीत असल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदविण्यात आला. पोलिसांनी अनेकदा अटकही केली. वेळप्रसंगी त्यांना नाकात नळी घालून अन्न भरविण्यात आले. पण इरॉम यांनी आपले मनोबल खचू दिले नाही. त्यांच्या या प्रदीर्घ संघर्षानंतरही सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्यात आला नसला तरी ईशान्येकडील सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांनी साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आणि हेच त्यांच्या संघर्षाचे फलित आहे.