शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

आपला मोरू झालाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:03 IST

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो.

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो. नाणारपासून डोकलामपर्यंत आणि कठुआपासून नगरपर्यंतच्या असंख्य घटना-घडामोडींवर तो अपडेट टाकत असतो. पाच वर्षापूर्वी तो इंजिनिअर झाला, तेव्हा खूप अपसेट होता. रिझर्र्व्हेशनमुळे ओपनवाल्यांना नोकरी मिळत नाही, म्हणून त्यानं केवढा त्रागा केलेला! सरकारच्या नावानं तर शिव्यांची लाखोली व्हायचा...कॉलेजने दोन रुपये फीवाढ केली म्हणून त्याने आंदोलनही छेडले होते. अण्णा हजारे यांच्या चळवळीला त्याचा मॉरल सपोर्ट होता. अण्णांमध्ये त्याला गांधीजी दिसत होते...दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची भाषा करायचा...पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे, काश्मीरमधील ३७० वं कलम हटवलं पाहिजे आणि देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे, या त्याच्या तीन प्रमुख मागण्या असायच्या. आरक्षणाला तर त्याचा ठाम विरोध. दिल्लीत निर्भयाकांड झाले तेव्हा तो अक्षरश: पेटून उठला होता...मेनबत्ती मोर्चात अग्रभागी होता. इंधनदरवाढ, भाववाढीच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही तो पुढे असायचा... सरकार, देश, सामाजिक व्यवस्था, पोलीस यंत्रणा, सीबीआय, उद्योगपती, भ्रष्टाचार याबद्दल त्याच्या मनात विलक्षण चीड होती. आपली शिक्षण व्यवस्था बेकारांचे तांडे निर्माण करणारी आहे, हे त्याचं ठाम मत. दरम्यान, मोरूच्या हाती मोबाईल आला अन् तो पार बदलून गेला. कधीकाळी पं. नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्याविषयी आदर बाळगून असलेला मोरू अचानक त्यांचा कडवा विरोधक बनला. नेहरू, गांधींविषयी व्हॉट्सअपवर आलेली माहिती खरी मानून तो ती फॉरवर्ड करू लागला... मिस् कॉल देऊन तो एव्हाना एका राजकीय पक्षाचा सदस्यही झाला होता. काही दिवसात तो ‘इंग इंडिया’ नावाच्या ग्रुपला जॉर्इंन झाला. बघता-बघता मोरूचे नेटवर्किंग चांगलेच वाढले. आता तो टीम लिडर बनला. दुसºया पक्षाच्या नेत्यांविषयी बदनामीकारक मेसेज फॉरवर्ड करायचे, सभास्थळी घोषणा द्यायच्या अन् बुथ सांभाळायचा. राजकीय परिवर्तनाशिवाय प्रगती नाही, या ठाम धारणेमुळे तो झपाटून कामाला लागला होता. अखेर मोरूच्या स्वप्नपूर्तीचा तो दिवस उजाडला...देशात सत्तांतर झालं! मोरू बेभान होऊन नाचला...जनधन योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप अन् स्टॅण्डअप इंडिया या घोषणांनी तर तो अक्षरश: भारावून गेला. पण मध्येच नोटाबंदी झाली आणि अनेकांच्या रोजगारावर कुºहाड कोसळली. पण मोरू ठाम राहिला. देशहितासाठी असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, अशी फेसबुक पोस्ट टाकून मोकळा झाला! गेल्या चार वर्षात मोरूला इंटरव्ह्यूचा एकही कॉल आलेला नाही. आता त्याची गरजही उरलेली नाही. तो पूर्णवेळ ‘डिजिटल व्हॉलेंटियर’ बनला आहे. सरकारची जोरदार पाठराखण करणे, हा त्याचा पेशा आहे. पण अण्णांचे उपोषण, विद्यार्थी आंदोलनं, बेरोजगारांचे मोर्चे आणि कठुआसारख्या घटनांमुळे आपला देश परत मागे जातोय की काय? या शंकेनं त्याची झोप उडाली आहे. २०१९ पर्यंत तरी त्याला उसंत नाही !!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)