शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आपला मोरू झालाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:03 IST

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो.

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो. नाणारपासून डोकलामपर्यंत आणि कठुआपासून नगरपर्यंतच्या असंख्य घटना-घडामोडींवर तो अपडेट टाकत असतो. पाच वर्षापूर्वी तो इंजिनिअर झाला, तेव्हा खूप अपसेट होता. रिझर्र्व्हेशनमुळे ओपनवाल्यांना नोकरी मिळत नाही, म्हणून त्यानं केवढा त्रागा केलेला! सरकारच्या नावानं तर शिव्यांची लाखोली व्हायचा...कॉलेजने दोन रुपये फीवाढ केली म्हणून त्याने आंदोलनही छेडले होते. अण्णा हजारे यांच्या चळवळीला त्याचा मॉरल सपोर्ट होता. अण्णांमध्ये त्याला गांधीजी दिसत होते...दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची भाषा करायचा...पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे, काश्मीरमधील ३७० वं कलम हटवलं पाहिजे आणि देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे, या त्याच्या तीन प्रमुख मागण्या असायच्या. आरक्षणाला तर त्याचा ठाम विरोध. दिल्लीत निर्भयाकांड झाले तेव्हा तो अक्षरश: पेटून उठला होता...मेनबत्ती मोर्चात अग्रभागी होता. इंधनदरवाढ, भाववाढीच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही तो पुढे असायचा... सरकार, देश, सामाजिक व्यवस्था, पोलीस यंत्रणा, सीबीआय, उद्योगपती, भ्रष्टाचार याबद्दल त्याच्या मनात विलक्षण चीड होती. आपली शिक्षण व्यवस्था बेकारांचे तांडे निर्माण करणारी आहे, हे त्याचं ठाम मत. दरम्यान, मोरूच्या हाती मोबाईल आला अन् तो पार बदलून गेला. कधीकाळी पं. नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्याविषयी आदर बाळगून असलेला मोरू अचानक त्यांचा कडवा विरोधक बनला. नेहरू, गांधींविषयी व्हॉट्सअपवर आलेली माहिती खरी मानून तो ती फॉरवर्ड करू लागला... मिस् कॉल देऊन तो एव्हाना एका राजकीय पक्षाचा सदस्यही झाला होता. काही दिवसात तो ‘इंग इंडिया’ नावाच्या ग्रुपला जॉर्इंन झाला. बघता-बघता मोरूचे नेटवर्किंग चांगलेच वाढले. आता तो टीम लिडर बनला. दुसºया पक्षाच्या नेत्यांविषयी बदनामीकारक मेसेज फॉरवर्ड करायचे, सभास्थळी घोषणा द्यायच्या अन् बुथ सांभाळायचा. राजकीय परिवर्तनाशिवाय प्रगती नाही, या ठाम धारणेमुळे तो झपाटून कामाला लागला होता. अखेर मोरूच्या स्वप्नपूर्तीचा तो दिवस उजाडला...देशात सत्तांतर झालं! मोरू बेभान होऊन नाचला...जनधन योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप अन् स्टॅण्डअप इंडिया या घोषणांनी तर तो अक्षरश: भारावून गेला. पण मध्येच नोटाबंदी झाली आणि अनेकांच्या रोजगारावर कुºहाड कोसळली. पण मोरू ठाम राहिला. देशहितासाठी असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, अशी फेसबुक पोस्ट टाकून मोकळा झाला! गेल्या चार वर्षात मोरूला इंटरव्ह्यूचा एकही कॉल आलेला नाही. आता त्याची गरजही उरलेली नाही. तो पूर्णवेळ ‘डिजिटल व्हॉलेंटियर’ बनला आहे. सरकारची जोरदार पाठराखण करणे, हा त्याचा पेशा आहे. पण अण्णांचे उपोषण, विद्यार्थी आंदोलनं, बेरोजगारांचे मोर्चे आणि कठुआसारख्या घटनांमुळे आपला देश परत मागे जातोय की काय? या शंकेनं त्याची झोप उडाली आहे. २०१९ पर्यंत तरी त्याला उसंत नाही !!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)