शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

तरुणाईला सावरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:44 IST

तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे

मिलिंद कुलकर्णीभारत हा सर्वाधिक तरुण देश आहे, असे आपण अभिमानाने म्हणतो. ते खरे आणि वास्तव आहे. परंतु, या तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. अन्यथा ही तरुणाई वाहवत गेली तर मोठा अनर्थ ओढवेल. याची भयघंटा वाजू लागली आहे. पूर्वी महानगरांपुरती सीमित असलेली ही चिंता आता जळगावसारख्या छोट्या शहरांना भेडसावू लागली आहे, हे मू.जे.महाविद्यालयात तरुणांच्या क्षुल्लक वादात मुकेश सपकाळे या तरुणाच्या झालेल्या खुनावरुन स्पष्ट झाले आहे.एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या तरुणाईला दिशा देण्याचे काम करणार कोण हाच मोठा प्रश्न आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सगळ्या घटकांनी समन्वयाने व पुढाकाराने मार्ग काढायला हवा. या घटनेनंतर ज्या दोन-तीन प्रमुख बाबी समोर आल्या त्याचा विचार सुरुवातीला करुया. महाविद्यालयाच्या परिसरातील ही गुंडगिरी आहे. गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादाची किनार त्याला दिसत आहे. पीडित आणि आरोपी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शिक्षण जेमतेम बारावी, आयटीआय पर्यंत झालेले आहे. छोट्या स्वरुपातील नोकऱ्या काही जण करतात. हे चित्र पाहता सामान्य स्थितीतील हे तरुण गुन्हेगारी मार्गाकडे भरकटलेले दिसतात. एकावर केवळ पूर्वी गुन्हे दाखल आहेत. इतरांची तशी पार्श्वभूमी नाही. चित्रपटातील गुन्हेगारी विश्वाच्या प्रभावामुळे आकर्षित होऊन काही या मार्गाकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने आणि रोजगार नसल्याने तरुण मुले या मार्गाकडे सहजतेने आकर्षित होतात. जिद्दी, धाडसी, जीवावर उदार होणाºया तरुणांना हेरण्याचे काम काही टोळ्या करीत असतात, त्यांच्या हाती असे तरुण हमखास सापडतात. शिक्षण जेमतेम असल्याने नोकऱ्यांची संधी कमी आहे. गुन्हेगारी विश्वातून विनासायास भरपूर पैसा मिळत असताना कष्टाची चाकरी करायला अपरिपक्व विचाराची ही तरुण मुले तयार होत नाही.आहे रे आणि नाही रे या घटकांमधील अंतर्विरोध हादेखील एक मुद्दा आहे. तुलना करताना आपल्याला या गोष्टी का मिळत नाही, समोरच्याला का मिळाल्या हा प्रश्न तरुणाईला पडतो. सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुध्दी नसल्याने मग टोळीत सामील होऊन हिसकावण्याची प्रवृत्ती बळावते. याचे परिणाम आणि पडसाद काय उमटतील, याचा विचार देखील ही मुले करीत नाही. आपल्या कुटुंबाचे काय होईल, ही काळजी त्यांना शिवत नाही. कुटुंबांवर निस्सीम प्रेम करणारी ही तरुणाई कुटुंबाला सगळे सुख देण्यासाठी अशा मार्गाकडे वळल्याचे समर्थन करीत असतात. ‘वाल्या ते वाल्मिकी’ असा प्रवास करण्यासाठी कुणी मार्गदर्शक भेटला तर शक्य आहे, अन्यथा घसरण अटळ आहे.राजकीय मंडळी या तरुणाईचा करुन घेत असलेला वापर हा अधिक घातक आहे. आपल्या पदाचा, सत्तेचा वापर करुन किरकोळ स्वरुपाचे गुन्हे केलेल्या या तरुणांना वाचविण्याचे, सोडविण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असतात. पण अशा कृत्यांमधून आपण गुन्हेगारीला प्रोत्साहन, बळ देत आहोत, याकडे ते कानाडोळा करतात. त्यांचे इप्सित वेगळे असते. राजकारण, निवडणुका यासाठी या तरुणाईचा वापर करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा राजकीय पाठिंब्याच्या बळावर ही तरुणाई बेदरकार व बेधडकपणे गुन्हे करायला मोकळी होते. प्रशासनाचे हात बांधले जातात. भस्मासूर तयार झाल्यावर मग राजकीय मंडळींसह समाजाचे डोळे उघडतात. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलली जाते. पण खरेच अशी जबाबदारी ढकलणे योग्य आहे काय? तरुणाईला वेळीच योग्य मार्गावर आणणे समाजातील सर्वच जबाबदार घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. निव्वळ प्रशासन किंवा समाजावर ढकलून काही साध्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव