शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

होईल का असे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 21:43 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. योगायोगाने जनसामान्यांच्या मनातील एका प्रश्नाचा उहापोह खुद्द या आयोगानेच केला असून ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. संघटित क्षेत्रात काम करणारे देशातील सारेच कामगार आणि कर्मचारी आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यात एव्हाना तरबेज झाले आहेत आणि मंजूर झालेल्या त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कुणी ब्र जरी उच्चारण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर आक्रमकपणे उसळी मारण्याच्या कलेतही ते तितकेच वाकबगार झाले आहेत. परिणामी सरकारी नोकराना भरघोस वेतनवाढ देताय तर द्या पण त्याच्या बदल्यात हे नोकर सरकारला म्हणजेच जनतेला काय देणार हा प्रश्न या शिफारसी जाहीर होताच अनेकांच्या मनात तरळून गेला. सरकारी कारभाराचे व्यवच्छेदक लक्षण बनलेली दिरंगाई आणि चालढकल आहे तशीच चालू राहणार असेल तर मग आम्ही आमच्या खिशातले जास्तीचे चार पैसे या लोकाना का म्हणून द्यावेत, ही या प्रश्नातील खरी खोच. तिचेच एकप्रकारे उत्तर देताना आयोगाने कामकाजात अळंटळं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिफारस केली आहे. आपण जो पगार घेतो, त्या बदल्यात काही देणेही लागतो ही भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोगाने उचललेल्या या पावलाचे कोणीही स्वागतच करील. पण त्याची अंमलबजावणी नेमकी कोण आणि कशी करणार हा वेगळाच प्रश्न त्यातून जन्मास येतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ आणि केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ यात दोन वर्षांते अंतर असले तरी दोहोंच्या सेवाकाळाच्या विशिष्ट टप्प्यावर त्यांच्या तोवरच्या कामकाजाचा आढावा घेण्याची आणि या आढाव्यावरच त्यांचा सेवाकाळ पुढे सुरु ठेवायचा की नाही याबाबतचा निर्णय करण्याची एक पद्धत तशीही अस्तित्वात आहे. पण ती केवळ कागदावरच राहिली आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे वरिष्ठ दरवर्षी गोपनीय अहवाल लिहीत असतात व तोही एकप्रकारचा वार्षिक आढावाच असतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हळूहळू या आढाव्याचे महत्व विरघळत गेले. कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची संरक्षणे उपलब्ध होत गेली. ‘मॅट’ किंवा ‘कॅट’सारख्या न्यायालयीन संस्थांचे निवाडे बहुश: सरकारच्या विरोधात जाणारेच असतात. या साऱ्यातून मार्ग काढावयाचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस न देता त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करुन पगार द्यायचा ही कल्पना आणि सूचना अमलात आणायची तर त्यासाठी खुद्द सरकारच्या ठायी फार मोठी इच्छाशक्ती यावी लागेल. जे होणे आजच्या काळात अशक्य नसले तरी अवघड मात्र जरुर आहे.