शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

होईल का असे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 21:43 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. योगायोगाने जनसामान्यांच्या मनातील एका प्रश्नाचा उहापोह खुद्द या आयोगानेच केला असून ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. संघटित क्षेत्रात काम करणारे देशातील सारेच कामगार आणि कर्मचारी आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यात एव्हाना तरबेज झाले आहेत आणि मंजूर झालेल्या त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कुणी ब्र जरी उच्चारण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर आक्रमकपणे उसळी मारण्याच्या कलेतही ते तितकेच वाकबगार झाले आहेत. परिणामी सरकारी नोकराना भरघोस वेतनवाढ देताय तर द्या पण त्याच्या बदल्यात हे नोकर सरकारला म्हणजेच जनतेला काय देणार हा प्रश्न या शिफारसी जाहीर होताच अनेकांच्या मनात तरळून गेला. सरकारी कारभाराचे व्यवच्छेदक लक्षण बनलेली दिरंगाई आणि चालढकल आहे तशीच चालू राहणार असेल तर मग आम्ही आमच्या खिशातले जास्तीचे चार पैसे या लोकाना का म्हणून द्यावेत, ही या प्रश्नातील खरी खोच. तिचेच एकप्रकारे उत्तर देताना आयोगाने कामकाजात अळंटळं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिफारस केली आहे. आपण जो पगार घेतो, त्या बदल्यात काही देणेही लागतो ही भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोगाने उचललेल्या या पावलाचे कोणीही स्वागतच करील. पण त्याची अंमलबजावणी नेमकी कोण आणि कशी करणार हा वेगळाच प्रश्न त्यातून जन्मास येतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ आणि केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ यात दोन वर्षांते अंतर असले तरी दोहोंच्या सेवाकाळाच्या विशिष्ट टप्प्यावर त्यांच्या तोवरच्या कामकाजाचा आढावा घेण्याची आणि या आढाव्यावरच त्यांचा सेवाकाळ पुढे सुरु ठेवायचा की नाही याबाबतचा निर्णय करण्याची एक पद्धत तशीही अस्तित्वात आहे. पण ती केवळ कागदावरच राहिली आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे वरिष्ठ दरवर्षी गोपनीय अहवाल लिहीत असतात व तोही एकप्रकारचा वार्षिक आढावाच असतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हळूहळू या आढाव्याचे महत्व विरघळत गेले. कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची संरक्षणे उपलब्ध होत गेली. ‘मॅट’ किंवा ‘कॅट’सारख्या न्यायालयीन संस्थांचे निवाडे बहुश: सरकारच्या विरोधात जाणारेच असतात. या साऱ्यातून मार्ग काढावयाचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस न देता त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करुन पगार द्यायचा ही कल्पना आणि सूचना अमलात आणायची तर त्यासाठी खुद्द सरकारच्या ठायी फार मोठी इच्छाशक्ती यावी लागेल. जे होणे आजच्या काळात अशक्य नसले तरी अवघड मात्र जरुर आहे.