शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

होईल का असे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 21:43 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. योगायोगाने जनसामान्यांच्या मनातील एका प्रश्नाचा उहापोह खुद्द या आयोगानेच केला असून ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. संघटित क्षेत्रात काम करणारे देशातील सारेच कामगार आणि कर्मचारी आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यात एव्हाना तरबेज झाले आहेत आणि मंजूर झालेल्या त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कुणी ब्र जरी उच्चारण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर आक्रमकपणे उसळी मारण्याच्या कलेतही ते तितकेच वाकबगार झाले आहेत. परिणामी सरकारी नोकराना भरघोस वेतनवाढ देताय तर द्या पण त्याच्या बदल्यात हे नोकर सरकारला म्हणजेच जनतेला काय देणार हा प्रश्न या शिफारसी जाहीर होताच अनेकांच्या मनात तरळून गेला. सरकारी कारभाराचे व्यवच्छेदक लक्षण बनलेली दिरंगाई आणि चालढकल आहे तशीच चालू राहणार असेल तर मग आम्ही आमच्या खिशातले जास्तीचे चार पैसे या लोकाना का म्हणून द्यावेत, ही या प्रश्नातील खरी खोच. तिचेच एकप्रकारे उत्तर देताना आयोगाने कामकाजात अळंटळं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिफारस केली आहे. आपण जो पगार घेतो, त्या बदल्यात काही देणेही लागतो ही भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोगाने उचललेल्या या पावलाचे कोणीही स्वागतच करील. पण त्याची अंमलबजावणी नेमकी कोण आणि कशी करणार हा वेगळाच प्रश्न त्यातून जन्मास येतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ आणि केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ यात दोन वर्षांते अंतर असले तरी दोहोंच्या सेवाकाळाच्या विशिष्ट टप्प्यावर त्यांच्या तोवरच्या कामकाजाचा आढावा घेण्याची आणि या आढाव्यावरच त्यांचा सेवाकाळ पुढे सुरु ठेवायचा की नाही याबाबतचा निर्णय करण्याची एक पद्धत तशीही अस्तित्वात आहे. पण ती केवळ कागदावरच राहिली आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे वरिष्ठ दरवर्षी गोपनीय अहवाल लिहीत असतात व तोही एकप्रकारचा वार्षिक आढावाच असतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हळूहळू या आढाव्याचे महत्व विरघळत गेले. कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची संरक्षणे उपलब्ध होत गेली. ‘मॅट’ किंवा ‘कॅट’सारख्या न्यायालयीन संस्थांचे निवाडे बहुश: सरकारच्या विरोधात जाणारेच असतात. या साऱ्यातून मार्ग काढावयाचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस न देता त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करुन पगार द्यायचा ही कल्पना आणि सूचना अमलात आणायची तर त्यासाठी खुद्द सरकारच्या ठायी फार मोठी इच्छाशक्ती यावी लागेल. जे होणे आजच्या काळात अशक्य नसले तरी अवघड मात्र जरुर आहे.