शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जागतिक ज्येष्ठदिन विशेष: ज्येष्ठांना आर्थिक, आरोग्यसक्षम करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 06:23 IST

ज्येष्ठांचे आर्थिक परावलंबित्व दूर करत, आरोग्यसेवा, उपचार व औषधे मोफत अथवा माफक दरात उपलब्ध व्हायला हवी.

दृष्टिकोन

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनातील १९९२ सालच्या ठरावानुसार, १ आॅक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन म्हणून साजरा करायचा असला, तरी त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही. उतार वयात आरोग्य, त्यावरील खर्चाचा प्रश्न भेडसावतो. आर्थिक परावलंबित्व दूर करत, आरोग्यसेवा, उपचार व औषधे मोफत अथवा माफक दरात उपलब्ध व्हायला हवी. ज्येष्ठांसाठी सरकारी आरोग्य योजना आहे. त्यासाठी पिवळ्या, केशरी शिधापत्रिकेची अट आहे. निकषांच्या कात्रीत आरोग्य योजना अडकल्या आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील ज्येष्ठांची आरोग्य स्थिती हलाखीची आहे. त्यांचा जीवन स्तर कसा उंचावेल, यावर विचार व्हायला हवा. आपल्याकडे एका ज्येष्ठाला ६०० रुपये पेन्शन मिळते. तिच गोवा, केरळमध्ये दोन हजार मिळते. ज्येष्ठांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगितले जाते. जर लोकप्रतिनिधी निवृत्त झाल्यावर त्यांना हजारो रुपये पेन्शन मिळते, तर मग तोच न्याय ज्येष्ठांना का नाही? महापालिका, नगरपालिकाही ज्येष्ठांना मालमत्ता करात सवलत देत नाहीत.

ज्येष्ठांसाठी जिल्हा, तालुका, शहर पातळीवर आरोग्य शिबिरे घ्यायला हवीत. वैद्यकीय समुपदेश व्हावे. वृद्धांना आरोग्यसेवेसाठी रुग्णालयाच्या रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ न देता, त्यांच्यासाठी वेगळा कक्ष हवा. मुंबईच्या नायर रुग्णालयात ज्येष्ठांची वर्तणूक, मानसिक आरोग्याविषयी जसा जेडियाट्रिक हा स्वतंत्र विभाग आहे, तसा तो अन्यत्रही असावा. विविध रुग्णालयांत मानसोपचार केंद्रे असावी. ज्येष्ठांनीही स्वत:च स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी. त्यासाठी पोलिसांना सहकार्य करायला हवे. नोकरचाकरांची माहिती पोलीस ठाण्यात कळवायला हवी. पैशांचे व्यवहार सावधपणे करावे. पोलिसांनीही ज्येष्ठांची नियमित चौकशी करावी. सरकारचा तसा आदेश आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने हेल्पलाइन सुरू आहे, त्याचा वापर करायला हवा. बहुतांश ज्येष्ठांच्या हत्या लुटीच्या उद्देशाने होतात. २०१३ ते २०१५ या वर्षात जवळपास २ हजार ५०० ज्येष्ठांच्या हत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एखाद्या ज्येष्ठांचा छळ समाजकंटक व घरातील नातेवाइकांकडून होत असेल, तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली पाहिजे. हेल्पलाइनला फोन करून मदत मिळवायला हवी. अनेकदा घरातील लोकांशी वैर नको, त्यांच्याकडेच दिवस काढायचे आहेत, आपले किती दिवस राहिले, असे प्रश्न स्वत:ला विचारून छळ होणारे ज्येष्ठ पोलिसांकडे जात नाहीत.ज्येष्ठ नागरिकांसाठी २००७ चा कायदा आहे, पण त्याद्वारे पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. त्याचे ज्ञान नसल्याने फौजदारी गुन्ह्याऐवजी दिवाणी दाव्याचा चुकीचा सल्ला दिला जातो. अनेकदा तक्रार कशाला देता? उतारवयात तुम्हाला तुमच्याच मुलांकडे दिवस काढायचे आहेत. पुन्हा त्यांच्याकडून त्रास होईल, अशी भीती घालून खच्चीकरण केले जाते. ज्येष्ठांसाठी पोलिसांनी नागरी समिती स्थापन करायला हवी, पण कुठे ती कागदावरच आहे, तर काही ठिकाणी समितीचा पत्ताच नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांचे खटले त्वरित निकाली काढले पाहिजेत, पण त्याचीही अंमलबजावणी होत नाही. या साऱ्याचा एकत्र विचार व्हायला हवा. 

टॅग्स :Mumbaiमुंबई