शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

‘जागतिक’ अंजन

By admin | Updated: June 2, 2016 01:59 IST

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना, आम्ही मात्र दोनच वर्षात खूप काही करून दाखविले, असे दावेही केले जात आहेत. पण विकासाच्या याच मुद्यावर संबंधितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. आजवर जगातील तमाम देशांची विकसित व विकसनशील अशा दोन ढोबळ गटांमध्ये वर्गवारी केली जात असे. भारत देश अर्थातच विकसनशील श्रेणीत मोडत असे. चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देशही याच श्रेणीत गणले जात असत. मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, कॅनडा, जपान यासारखे देश विकसित गणले जात. जागतिक बँकेने आता ही ढोबळ वर्गवारी मोडीत काढली असून, त्याऐवजी नवी वर्गवारी सुरू केली आहे. नव्या वर्गवारीमध्ये एखाद्या देशाची समृद्धी आणि जनतेची जीवनशैली यांची अधिक सुस्पष्ट कल्पना येऊ शकेल, अशी व्यवस्था केली आहे. नव्या वर्गवारीत आजवर विकसनशील म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देशांना ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ आणि ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले असून भारताची गणना पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांसोबत ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ या श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. त्याचवेळी चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देश मात्र ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. जागतिक बँकेचे विकासाचे जे सुचकांक आहेत, त्यामध्ये भारताची स्थिती जागतिक सरासरीपेक्षाही वाईट आहे. उदाहरणार्थ, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची जागतिक सरासरी २० दिवस, तर भारतात त्यासाठी अजूनही २९ दिवस लागतात. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीमध्ये कर संकलनाची जागतिक सरासरी २०१३ मध्ये १४ टक्के होती, तर भारतात केवळ ११ टक्के! चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृहांच्या उपलब्धेतेची जागतिक सरासरी २०१५ मध्ये एकूण लोकसंख्येच्या ६८ टक्के एवढी होती, तर भारतात तेच प्रमाण केवळ ४० टक्के होते. त्याचप्रकारे जगाने २०१३ मध्ये सरासरी प्रती व्यक्ती १८९४ किलो तेल खर्च केले, तर भारताने फक्त ६०६ किलो! ही उदाहरणे केवळ वानगीदाखल; पण अशा अनेक सुचकांकांच्या बाबतीत, भारत जागतिक सरासरीचीही बरोबरी करू शकत नाही. याचा एकच अर्थ. विकासाचे ढोल बडवत राहाण्याने वास्तव लपविले जाऊ शकत नाहीे!