शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘जागतिक’ अंजन

By admin | Updated: June 2, 2016 01:59 IST

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना, आम्ही मात्र दोनच वर्षात खूप काही करून दाखविले, असे दावेही केले जात आहेत. पण विकासाच्या याच मुद्यावर संबंधितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. आजवर जगातील तमाम देशांची विकसित व विकसनशील अशा दोन ढोबळ गटांमध्ये वर्गवारी केली जात असे. भारत देश अर्थातच विकसनशील श्रेणीत मोडत असे. चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देशही याच श्रेणीत गणले जात असत. मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, कॅनडा, जपान यासारखे देश विकसित गणले जात. जागतिक बँकेने आता ही ढोबळ वर्गवारी मोडीत काढली असून, त्याऐवजी नवी वर्गवारी सुरू केली आहे. नव्या वर्गवारीमध्ये एखाद्या देशाची समृद्धी आणि जनतेची जीवनशैली यांची अधिक सुस्पष्ट कल्पना येऊ शकेल, अशी व्यवस्था केली आहे. नव्या वर्गवारीत आजवर विकसनशील म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देशांना ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ आणि ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले असून भारताची गणना पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांसोबत ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ या श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. त्याचवेळी चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देश मात्र ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. जागतिक बँकेचे विकासाचे जे सुचकांक आहेत, त्यामध्ये भारताची स्थिती जागतिक सरासरीपेक्षाही वाईट आहे. उदाहरणार्थ, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची जागतिक सरासरी २० दिवस, तर भारतात त्यासाठी अजूनही २९ दिवस लागतात. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीमध्ये कर संकलनाची जागतिक सरासरी २०१३ मध्ये १४ टक्के होती, तर भारतात केवळ ११ टक्के! चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृहांच्या उपलब्धेतेची जागतिक सरासरी २०१५ मध्ये एकूण लोकसंख्येच्या ६८ टक्के एवढी होती, तर भारतात तेच प्रमाण केवळ ४० टक्के होते. त्याचप्रकारे जगाने २०१३ मध्ये सरासरी प्रती व्यक्ती १८९४ किलो तेल खर्च केले, तर भारताने फक्त ६०६ किलो! ही उदाहरणे केवळ वानगीदाखल; पण अशा अनेक सुचकांकांच्या बाबतीत, भारत जागतिक सरासरीचीही बरोबरी करू शकत नाही. याचा एकच अर्थ. विकासाचे ढोल बडवत राहाण्याने वास्तव लपविले जाऊ शकत नाहीे!