शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘जागतिक’ अंजन

By admin | Updated: June 2, 2016 01:59 IST

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना

गत काही दिवसांपासून भारतात विकासाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. साठ वर्षात देशात अजिबात विकास झाला नसल्याचा आरोप करताना, आम्ही मात्र दोनच वर्षात खूप काही करून दाखविले, असे दावेही केले जात आहेत. पण विकासाच्या याच मुद्यावर संबंधितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. आजवर जगातील तमाम देशांची विकसित व विकसनशील अशा दोन ढोबळ गटांमध्ये वर्गवारी केली जात असे. भारत देश अर्थातच विकसनशील श्रेणीत मोडत असे. चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देशही याच श्रेणीत गणले जात असत. मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, कॅनडा, जपान यासारखे देश विकसित गणले जात. जागतिक बँकेने आता ही ढोबळ वर्गवारी मोडीत काढली असून, त्याऐवजी नवी वर्गवारी सुरू केली आहे. नव्या वर्गवारीमध्ये एखाद्या देशाची समृद्धी आणि जनतेची जीवनशैली यांची अधिक सुस्पष्ट कल्पना येऊ शकेल, अशी व्यवस्था केली आहे. नव्या वर्गवारीत आजवर विकसनशील म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देशांना ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ आणि ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले असून भारताची गणना पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांसोबत ‘निम्न मध्यम उत्पन्न देश’ या श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. त्याचवेळी चीन, मेक्सिको, ब्राझील यासारखे देश मात्र ‘उच्च मध्यम उत्पन्न देश’ श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. जागतिक बँकेचे विकासाचे जे सुचकांक आहेत, त्यामध्ये भारताची स्थिती जागतिक सरासरीपेक्षाही वाईट आहे. उदाहरणार्थ, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची जागतिक सरासरी २० दिवस, तर भारतात त्यासाठी अजूनही २९ दिवस लागतात. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीमध्ये कर संकलनाची जागतिक सरासरी २०१३ मध्ये १४ टक्के होती, तर भारतात केवळ ११ टक्के! चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृहांच्या उपलब्धेतेची जागतिक सरासरी २०१५ मध्ये एकूण लोकसंख्येच्या ६८ टक्के एवढी होती, तर भारतात तेच प्रमाण केवळ ४० टक्के होते. त्याचप्रकारे जगाने २०१३ मध्ये सरासरी प्रती व्यक्ती १८९४ किलो तेल खर्च केले, तर भारताने फक्त ६०६ किलो! ही उदाहरणे केवळ वानगीदाखल; पण अशा अनेक सुचकांकांच्या बाबतीत, भारत जागतिक सरासरीचीही बरोबरी करू शकत नाही. याचा एकच अर्थ. विकासाचे ढोल बडवत राहाण्याने वास्तव लपविले जाऊ शकत नाहीे!