शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:50 IST

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली.

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली. विशेष रेल्वेगाडीने जाणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून अतिउत्साहात नियमांचा भंगदेखील झाला. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. वरकरणी ही बाब फारशी गंभीर वाटत नसली व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांना त्याची तसदी घेण्याचीदेखील गरज वाटली नसली तरी यातून जनतेला मात्र चुकीचा संदेश गेला आहे हे मात्र निश्चित आहे. रेल्वेगाडी तसेच रेल्वेस्टेशनात नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे व भारताचे नागरिक म्हणून सर्वांनीच नियमांचा आदर करणे अभिप्रेत आहे. परंतु ‘स्वच्छ भारत’चे खंदे समर्थक असलेल्यांना रेल्वेस्थानकावर भारत दिसला नाही की त्यांचे समर्थन हे केवळ दिखाव्यापुरते आहे, असा प्रश्नच निर्माण होतो. भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे असा दावा पक्षनेत्यांकडून अगोदरपासूनच करण्यात येतो. त्यातच अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतूनच घडले असल्यामुळे शिस्त म्हणजे काय हे वेगळ््याने सांगण्याची त्यांना गरज नाही. परंतु संघाच्या शाखेतून पक्ष संघटनेत आल्यावर बहुदा अनेकांना शिस्तीचा विसर पडतो. म्हणूनच की काय रेल्वेस्थानकावर उघडपणे बेशिस्तीचे दर्शनच कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. पक्षाचेच मंत्री रेल्वे नियमांचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येतात. परंतु कार्यकर्त्यांनी ते आवाहनदेखील पायदळी तुडविले आणि सर्रासपणे सुरक्षा यंत्रणांना न जुमानता रेल्वे रुळ ओलांडले. वास्तविकरीत्या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपण्याची व आपली जबाबदारी ओळखून वागण्याची आवश्यकता असते. नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे हीच अपेक्षा असते. जनतेचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते व समाजातील वर्तन पक्षाची प्रतिमा तयार करत असते. परंतु सत्ता आली म्हणजे सर्व काही मिळाले, अशा आविर्भावात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते वावरताना दिसतात. त्यातूनच ‘हम करे सो कायदा’ अशी विचारसरणी निर्माण होते. सत्ता टिकविण्यासाठी समाजाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांचे बळ लागते. मात्र ओठात एक आणि कृतीत भलतेच अशी कार्यकर्त्यांची वर्तणूक निवडणुकांमध्ये अडचण निर्माण करणारी ठरू शकते.