शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:50 IST

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली.

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली. विशेष रेल्वेगाडीने जाणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून अतिउत्साहात नियमांचा भंगदेखील झाला. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. वरकरणी ही बाब फारशी गंभीर वाटत नसली व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांना त्याची तसदी घेण्याचीदेखील गरज वाटली नसली तरी यातून जनतेला मात्र चुकीचा संदेश गेला आहे हे मात्र निश्चित आहे. रेल्वेगाडी तसेच रेल्वेस्टेशनात नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे व भारताचे नागरिक म्हणून सर्वांनीच नियमांचा आदर करणे अभिप्रेत आहे. परंतु ‘स्वच्छ भारत’चे खंदे समर्थक असलेल्यांना रेल्वेस्थानकावर भारत दिसला नाही की त्यांचे समर्थन हे केवळ दिखाव्यापुरते आहे, असा प्रश्नच निर्माण होतो. भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे असा दावा पक्षनेत्यांकडून अगोदरपासूनच करण्यात येतो. त्यातच अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतूनच घडले असल्यामुळे शिस्त म्हणजे काय हे वेगळ््याने सांगण्याची त्यांना गरज नाही. परंतु संघाच्या शाखेतून पक्ष संघटनेत आल्यावर बहुदा अनेकांना शिस्तीचा विसर पडतो. म्हणूनच की काय रेल्वेस्थानकावर उघडपणे बेशिस्तीचे दर्शनच कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. पक्षाचेच मंत्री रेल्वे नियमांचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येतात. परंतु कार्यकर्त्यांनी ते आवाहनदेखील पायदळी तुडविले आणि सर्रासपणे सुरक्षा यंत्रणांना न जुमानता रेल्वे रुळ ओलांडले. वास्तविकरीत्या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपण्याची व आपली जबाबदारी ओळखून वागण्याची आवश्यकता असते. नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे हीच अपेक्षा असते. जनतेचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते व समाजातील वर्तन पक्षाची प्रतिमा तयार करत असते. परंतु सत्ता आली म्हणजे सर्व काही मिळाले, अशा आविर्भावात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते वावरताना दिसतात. त्यातूनच ‘हम करे सो कायदा’ अशी विचारसरणी निर्माण होते. सत्ता टिकविण्यासाठी समाजाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांचे बळ लागते. मात्र ओठात एक आणि कृतीत भलतेच अशी कार्यकर्त्यांची वर्तणूक निवडणुकांमध्ये अडचण निर्माण करणारी ठरू शकते.