शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:50 IST

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली.

भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली. विशेष रेल्वेगाडीने जाणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून अतिउत्साहात नियमांचा भंगदेखील झाला. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. वरकरणी ही बाब फारशी गंभीर वाटत नसली व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांना त्याची तसदी घेण्याचीदेखील गरज वाटली नसली तरी यातून जनतेला मात्र चुकीचा संदेश गेला आहे हे मात्र निश्चित आहे. रेल्वेगाडी तसेच रेल्वेस्टेशनात नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे व भारताचे नागरिक म्हणून सर्वांनीच नियमांचा आदर करणे अभिप्रेत आहे. परंतु ‘स्वच्छ भारत’चे खंदे समर्थक असलेल्यांना रेल्वेस्थानकावर भारत दिसला नाही की त्यांचे समर्थन हे केवळ दिखाव्यापुरते आहे, असा प्रश्नच निर्माण होतो. भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे असा दावा पक्षनेत्यांकडून अगोदरपासूनच करण्यात येतो. त्यातच अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतूनच घडले असल्यामुळे शिस्त म्हणजे काय हे वेगळ््याने सांगण्याची त्यांना गरज नाही. परंतु संघाच्या शाखेतून पक्ष संघटनेत आल्यावर बहुदा अनेकांना शिस्तीचा विसर पडतो. म्हणूनच की काय रेल्वेस्थानकावर उघडपणे बेशिस्तीचे दर्शनच कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. पक्षाचेच मंत्री रेल्वे नियमांचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येतात. परंतु कार्यकर्त्यांनी ते आवाहनदेखील पायदळी तुडविले आणि सर्रासपणे सुरक्षा यंत्रणांना न जुमानता रेल्वे रुळ ओलांडले. वास्तविकरीत्या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपण्याची व आपली जबाबदारी ओळखून वागण्याची आवश्यकता असते. नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे हीच अपेक्षा असते. जनतेचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते व समाजातील वर्तन पक्षाची प्रतिमा तयार करत असते. परंतु सत्ता आली म्हणजे सर्व काही मिळाले, अशा आविर्भावात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते वावरताना दिसतात. त्यातूनच ‘हम करे सो कायदा’ अशी विचारसरणी निर्माण होते. सत्ता टिकविण्यासाठी समाजाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांचे बळ लागते. मात्र ओठात एक आणि कृतीत भलतेच अशी कार्यकर्त्यांची वर्तणूक निवडणुकांमध्ये अडचण निर्माण करणारी ठरू शकते.