शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व नजरेची दिलदार देशमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 04:11 IST

स्व. विलासरावांची उर्ध्व नजर... संवेदनशील मनाला दिलदार देशमुखी थाटाची जोड लाभली होती. भव्यता आणि नावीन्यतेची ओढ असलेल्या व्यक्तिमत्त्वाची काल जयंती झाली...

- राजा मानेस्व. विलासरावांची उर्ध्व नजर... संवेदनशील मनाला दिलदार देशमुखी थाटाची जोड लाभली होती. भव्यता आणि नावीन्यतेची ओढ असलेल्या व्यक्तिमत्त्वाची काल जयंती झाली...डोळ्यांची उपजत ठेवण हा कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. असं म्हणतात की, उर्ध्व नजर लाभलेल्या व्यक्तीला नावीन्य, अभिनवता, सर्वोत्कृष्टता आणि भव्यतेची ओढ असते. शिवाय त्या व्यक्तिमत्त्वाला कर्तबगारी, रसिकता, महत्त्वाकांक्षा, संवेदनशीलता आणि दिलदारी या गुणांचीही उपजत समृद्धी लाभलेली असते. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेले स्व. विलासराव देशमुख हे देखील उर्ध्व नजरेचेच! त्या नजरेला लाभलेल्या सर्व गुणांना जोड मिळाली ती देशमुखी थाटाची. सर्वसामान्य माणसाशी असलेले आपले नाते नेहमीच घट्ट ठेवत विलासरावांनी आपला देशमुखी थाटही कायम राखला.सोलापूर जिल्ह्याचे आणि त्यांचे राजकीय नाते नेहमीच राज्यात चर्चेचा विषय ठरले. त्यातूनच सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्यातील मैत्रीला ‘दो हंसोंका जोडा...’ असे संबोधन मिळाले. सोलापूरवर त्यांचे तसे विशेष प्रेम होते. त्याच नात्यातून २००२ सालच्या दंगलीवेळी आपले पिता दगडोजीरावांच्या निधनाचा दुखवटा काळ असतानाही ते सोलापुरात आले होते. त्या प्रेमापोटीच शहरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय सोलापूरकरांनी त्यांच्या निधनानंतर घेतला. अगदी बाभळगावच्या सरपंचपदापासून, पंचायत समिती उपसभापतीपदाच्या मार्गाने राजकारणातील सर्वोच्च पदे त्यांनी मिळविली. त्या प्रत्येक पदाची उंची वाढविण्याचे काम त्यांनी केले. एखादा छोटा पण उत्कृष्ट असलेला उपक्रम विलासरावांपुढे आला की, तो भव्य आणि ‘पॅटर्न’ म्हणून नावारूपास कधी आला हेही कळायचे नाही. स्वत:च्या राहणीमानातील टापटीप आणि नजाकत त्यांनी कधीही ढळू दिली नाही. नवे घडविण्याची जिद्द, कल्पकता आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी लातूरला वेगळे स्थान निर्माण करून दिले. आज लातूरच्या जलपरीची चर्चा होते. सर्वार्थाने नैसर्गिक प्रतिकूलता असलेल्या लातूरची ओळख राज्यात त्यांच्यामुळे निर्माण झाली. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठीच त्यांनी लातूर बॅरेजेसचा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन-चार वर्षांत पाऊसच नाही तर बॅरेजेसमध्ये पाणी कोठून येणार? लातूरच्या पाणीप्रश्नावर उजनी धरण हा एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे, हे मराठवाड्याला हक्काचे पाणी उजनीतून देण्याचा ठराव मुख्यमंत्री म्हणून करणाऱ्या विलासरावांना निश्चितच माहीत होते. कदाचित मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अजून मिळत नाही आणि विलासराव लातूरला पाणी नेण्यासाठी हट्ट करताहेत असा चुकीचा संदेश गेला असता, म्हणूनच त्यांनी त्याऐवजी अन्य मार्ग धुंडाळण्याचा प्रयत्न केला असावा, असो. आपल्या व्यक्तिमत्त्वाने जनमानसाच्या हृदयात त्यांनी निर्माण केलेले स्थान आजही कायम आहे.जे नवे ते लातूरला हवे, असे आयुष्यभर म्हणणाऱ्या विलासरावांनी सदैव सकारात्मक राजकारण केले. त्यामुळे ते काही क्षणात राजकीय शत्रुत्व संपवून नव्या मैत्रीच्या पर्वाची सुरुवात करायचे. याची प्रचिती अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दिली. सहवासात आलेल्या माणसाला जतन करणे, संवेदनशीलता अबाधित राखणे आणि नव्याचा शोध घेत राहण्याचा प्रयत्न ते सतत करत राहिले. त्याच कारणाने १९९३ साली भूकंपग्रस्तांचे दु:ख पाहून ढसढसा रडताना आम्ही विलासरावांना पाहिले. लातूरच्या मूक-बधीर विद्यार्थ्यांमध्ये तासन्तास रमणारे विलासराव आम्ही पाहिले. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या सांगलीच्या निवासस्थानी भेट दिली होती. लिफ्ट नसलेल्या चौथ्या मजल्यावरील घरी मुख्यमंत्री येणार कसे, असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. त्यांनी मात्र ‘माझ्या स्नेह्याच्या घरी जाण्यासाठी कितीही मजले चढू !’ असे ठामपणे सांगितले. असे वेगळे अनुभव राज्यातील असंख्य स्नेह्यांनी घेतले. त्या अनुभवांवर प्रभाव होता तो ‘दिलदार देशमुखी’चा ! तो वसा जतन करण्याचे काम स्व. विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, बंधू आ. दिलीपराव, चिरंजीव आ. अमित, अभिनेता रितेश व धीरज नेटाने आज करीत आहेत.