शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

महिला सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:54 IST

रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणा-या युवतीचे दोन मोबाइल आणि झुमके हिसकावून लुटारूने पोबारा करण्याची घटना जुईनगर येथे घडली आणि महिलांच्या असुरक्षित लोकल प्रवासाचा प्रश्न आणखी एकदा चर्चेत आला.

रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणा-या युवतीचे दोन मोबाइल आणि झुमके हिसकावून लुटारूने पोबारा करण्याची घटना जुईनगर येथे घडली आणि महिलांच्या असुरक्षित लोकल प्रवासाचा प्रश्न आणखी एकदा चर्चेत आला. तसा हा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येतच असतो; आणि काही दिवसांतच पहिले पाढे पंचावन्न सुरू होते. अशा घटना घडल्या की आठ - दहा दिवस लोकलच्या महिला डब्यात पोलीस दृष्टीस पडतात आणि पुन्हा काही दिवसांत ते गायब होतात. रेल्वे पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’च असते. पूर्वीपेक्षा आता नोकरीच्या वेळा तसेच नाइट आउटमुळे रात्री उशिरा प्रवास करणाºया महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. साहजिकच या महिला गुन्हेगारांचे लक्ष्य ठरतात. नियमानुसार रात्री महिलांच्या डब्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेकदा त्यांची गैरहजेरी अनुभवास येते. त्याचा फायदा घेत लुटारू, चोरटे मोकाट सुटतात आणि महिला प्रवाशांमध्ये दहशत पसरते. हार्बर मार्गावर मोबाइल चोरीच्या घटना या सानपाडा, जुईनगर स्थानकांत जास्त घडतात. चोर सीसीटीव्हीत आपला चेहरा दिसणार नाही यासाठी रूमाल बांधून महिलांच्या डब्यात शिरतात आणि क्षणार्धात मोबाइल लांबवतात. गेल्या वर्षी सानपाडा स्थानकात असा प्रयत्न करणाºया चोरट्याला पोलिसांनी हटकले तेव्हा त्याने जुईनगर स्थानकातच पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली होती. यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला नव्हता. अशा घटना पोलिसांच्या बाबतीत घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेबाबत काय अवस्था असेल हे लक्षात येते. पोलीस यंत्रणा सदोष असली तरी दोष केवळ याच यंत्रणेला देता येणार नाही. कारण महिलांच्या प्रत्येक डब्यात पोलीस तैनात करायचा तर तितके मनुष्यबळ रेल्वे पोलिसांकडे असायला हवे. पण संबंधित विभाग याबाबत गंभीर नसल्याचे पोलीस अधिकारी खासगीत सांगतात. त्यामुळे विपरीत प्रसंग घडला की पोलिसांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. पण त्यांची ही अगतिकताही लक्षात घ्यावयास हवी. अखेरीस अंतिम जबाबदारी शासन यंत्रणेची आहे. कारण महिला सुरक्षिततेविषयक आवश्यक धोरण आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे याच यंत्रणेच्या हाती आहे. आर्थिक राजधानी मुंबईसह या राज्यात महिला सुरक्षित आहेत, अशी ग्वाही देताना त्याबाबत कोणती पावले उचलणे, आवश्यक आहे याकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या महानगरात महिला कौतुकास्पद जबाबदाºया उचलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी या महिलावर्गाला सुरक्षित वाटावे, असे वातावरण निर्माण करण्याची अंतिम जबाबदारी सरकारचीच नव्हे काय?