शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:54 IST

रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणा-या युवतीचे दोन मोबाइल आणि झुमके हिसकावून लुटारूने पोबारा करण्याची घटना जुईनगर येथे घडली आणि महिलांच्या असुरक्षित लोकल प्रवासाचा प्रश्न आणखी एकदा चर्चेत आला.

रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणा-या युवतीचे दोन मोबाइल आणि झुमके हिसकावून लुटारूने पोबारा करण्याची घटना जुईनगर येथे घडली आणि महिलांच्या असुरक्षित लोकल प्रवासाचा प्रश्न आणखी एकदा चर्चेत आला. तसा हा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येतच असतो; आणि काही दिवसांतच पहिले पाढे पंचावन्न सुरू होते. अशा घटना घडल्या की आठ - दहा दिवस लोकलच्या महिला डब्यात पोलीस दृष्टीस पडतात आणि पुन्हा काही दिवसांत ते गायब होतात. रेल्वे पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’च असते. पूर्वीपेक्षा आता नोकरीच्या वेळा तसेच नाइट आउटमुळे रात्री उशिरा प्रवास करणाºया महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. साहजिकच या महिला गुन्हेगारांचे लक्ष्य ठरतात. नियमानुसार रात्री महिलांच्या डब्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेकदा त्यांची गैरहजेरी अनुभवास येते. त्याचा फायदा घेत लुटारू, चोरटे मोकाट सुटतात आणि महिला प्रवाशांमध्ये दहशत पसरते. हार्बर मार्गावर मोबाइल चोरीच्या घटना या सानपाडा, जुईनगर स्थानकांत जास्त घडतात. चोर सीसीटीव्हीत आपला चेहरा दिसणार नाही यासाठी रूमाल बांधून महिलांच्या डब्यात शिरतात आणि क्षणार्धात मोबाइल लांबवतात. गेल्या वर्षी सानपाडा स्थानकात असा प्रयत्न करणाºया चोरट्याला पोलिसांनी हटकले तेव्हा त्याने जुईनगर स्थानकातच पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली होती. यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला नव्हता. अशा घटना पोलिसांच्या बाबतीत घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेबाबत काय अवस्था असेल हे लक्षात येते. पोलीस यंत्रणा सदोष असली तरी दोष केवळ याच यंत्रणेला देता येणार नाही. कारण महिलांच्या प्रत्येक डब्यात पोलीस तैनात करायचा तर तितके मनुष्यबळ रेल्वे पोलिसांकडे असायला हवे. पण संबंधित विभाग याबाबत गंभीर नसल्याचे पोलीस अधिकारी खासगीत सांगतात. त्यामुळे विपरीत प्रसंग घडला की पोलिसांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. पण त्यांची ही अगतिकताही लक्षात घ्यावयास हवी. अखेरीस अंतिम जबाबदारी शासन यंत्रणेची आहे. कारण महिला सुरक्षिततेविषयक आवश्यक धोरण आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे याच यंत्रणेच्या हाती आहे. आर्थिक राजधानी मुंबईसह या राज्यात महिला सुरक्षित आहेत, अशी ग्वाही देताना त्याबाबत कोणती पावले उचलणे, आवश्यक आहे याकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या महानगरात महिला कौतुकास्पद जबाबदाºया उचलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी या महिलावर्गाला सुरक्षित वाटावे, असे वातावरण निर्माण करण्याची अंतिम जबाबदारी सरकारचीच नव्हे काय?