शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शरद जोशी नसताना...

By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारला नाही. शेतकरी विधवांना ‘एकरकमी’ मदत करायची, डोळ्यात पाणी आणायचे, अश्रूंचे आणि भावनात्मक संवादाचे फाऊंडेशन उभारायचे. एकदा हा भर ओसरला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या मायावी जगात मग्न व्हायचे, अशी नाटके शरद जोशींना कधी जमली नाहीत. नंतर शेतकरी संघटनेची अनेक शकले झाली. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी सुरु झालेली ही लढाई केवळ वाटाघाटींच्या चौकटीत बंदिस्त होत गेली. राजकारण्यांच्या जाळ्यात जोशी अलगद सापडले. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे चळवळीचेच नुकसान झाले. पण त्यांच्या त्यागाबद्दल कुणी शंका घेतली नाही. आज ते नसताना त्यांच्यानंतर शेतकऱ्यांच्या चळवळीचे काय, या प्रश्नाने विदर्भातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.शरद जोशींनी शेतकरी संघटना स्थापन केली, तोवर बहुतांश राजकीय पक्ष शेतकऱ्यांना कस्पटासमान वागवायचे. उद्योगांसाठी भांडवल उभारणी करायची असेल तर शेतमालाच्या किमती सातत्याने खालच्या पातळीवर स्थिर ठेवणे हेच सरकारचे धोरण होते. अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या दु:खाचे मूळ समजावून सांगण्यासाठी जोशींनी जीवाचे रान केले. या चळवळीचा झंझावात एवढा की, १९८० पूर्वी लाल किल्ल्यावरून भाषण देताना शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न काढणारे पंतप्रधान शेतकऱ्यांबद्दल बोलू लागले. ही किमया जोशींच्या आंदोलनाची होती. आंदोलनकर्त्यांची ताकद तरी केवढी? दिसायला अगदीच मरतुकडा, पोट खपाटी गेलेला, पिढ्यानपिढ्यांपासून गांजलेला, उभे राहण्याचेही त्राण नसलेला... जोशी सांगायचे, ‘‘तुम्ही काहीच करु नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा.’’ राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा हा अहिंसक मार्ग गांधींच्या अधिक जवळ जाणारा होता. या आंदोलनाच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासोबतच त्यांना लोकशिक्षणही घडवायचे होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मागणीला त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले. जातीधर्मात विभागलेले राजकारण अर्थकारणाच्या दिशेने नेण्याचा क्रांतिकारक प्रयत्न जोशींनी केला. तो त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकला नाही. पण भविष्यातील राजकारण त्यावरच केंद्रित राहणार आहे.भारत आणि इंडिया यांच्यातील विसंगती शरद जोशींनीच पहिल्यांदा समोर आणली. कोट्यवधींचे कर्ज बुडविणारा मद्यसम्राट निर्लज्जपणे पार्ट्यांमध्ये मिरवतो. फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना चिरडणारा दिवटा नट पंतप्रधानांसोबत पतंग उडवितो, हे इंडियाचे दृश्य आणि बँकेचे दहा हजाराचे कर्ज फेडू न शकणारा विदर्भातील शेतकरी बायको-पोरांसह जहर खाऊन मृत्यूला कवटाळतो, हे भारताचे विदारक वास्तव! ते काल होते, आज आहे, कदाचित उद्याही राहील. त्यांची लढाई यासाठीच होती. पुढच्या काळात तिचा वणवा होईल, पण त्यावेळी हा लढवय्या नेता नसेल. शरद जोशींनतर शेतकऱ्यांच्या चळवळीची धुरा समर्थपणे पुढे नेऊ शकणारा कुणी नेता अवतीभवती दिसत नाही. शेतकऱ्यांची आंदोलने ट्रेड युनियनच्या धर्तीवर, प्रादेशिक मागण्यांवर आधारित पुढे नेणाऱ्या शेतकरी नेत्यांचा हा काळ आहे. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आता मागण्यांची झाली आहे. अशावेळी नेत्यांपुढे आश्वासनांचे तुकडे फेकून चळवळी मोडीत काढणे राज्यकर्त्यांना सोपे जाते. खासदारकी किंवा महामंडळांचा लाल दिवा बहाल केला की ‘शेतकरी नेते’ म्हणून त्यांना आपले अस्तित्वही टिकवून ठेवता येते. पुढच्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मतांचा लिलाव करणारे असे पायलीचे पन्नास नेते येतील. त्यावेळीही शेतकऱ्यांना शरद जोशींची पदोपदी उणीव जाणवेल ती अशी... - गजानन जानभोर