शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सोनिया गांधींना शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:30 IST

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे १९९८ पासून सांभाळत राहिलेल्या व त्या पक्षाला २००८ आणि २००९ च्या निवडणुकीत केंद्रात विजय मिळवून देणाºया सोनिया गांधींनी दि. ९ ला पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपविली.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे १९९८ पासून सांभाळत राहिलेल्या व त्या पक्षाला २००८ आणि २००९ च्या निवडणुकीत केंद्रात विजय मिळवून देणाºया सोनिया गांधींनी दि. ९ ला पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपविली. ती सोपविण्याआधी त्यांच्या नेतृत्वाला सक्षमतेची जोड मिळालीे की नाही याची त्यांनी तीन वर्षे परीक्षा घेतली. सोनिया गांधींनी त्याच दिवशी आपल्या वयाची ७१ वर्षेही पूर्ण केली. त्यांचे आयुष्य हे एखाद्या लोकविलक्षण कादंबरीचा भाग बनावे असे आहे. राजीव गांधींच्या प्रेमात पडून भारतवासी झालेल्या सोनिया गांधींनी केवळ भारतच स्वीकारला नाही, त्याच्या सगळ्या सांस्कृतिक परंपरा व त्यातल्या बारीकसारीक चालीरीतीही त्यांनी आत्मसात केल्या. प्रसंगी अन्य कोणाही भारतीय स्त्रीहून त्याच अधिक भारतीय आहेत असे देशाला वाटत राहिले. त्यांचे वागणे, बोलणे व दिसणेही तसेच राहिले. अंगावर कोणताही दागिना न घालणाºया या महिलेने स्वत:ला साºया देशात व विशेषत: त्यातील ग्रामीण भागात, आदिवासी क्षेत्रात आणि तरुणाईत लोकप्रिय केले. आपल्या पतीचे स्फोटक मरण पाहून त्या कोसळल्या नाहीत. (त्यांच्या टीकाखोरांनी म्हटले तसेच त्या माहेरीही गेल्या नाहीत) त्यांचा भारतात स्थायिक होऊन राहण्याचा व अंगावर येईल त्या जोखमीला तोंड देण्याचा निर्धार कायम राहिला. त्याआधी इंदिरा गांधींना त्यांच्या डोळ्यादेखत ठार मारले गेले. तेव्हाही त्या खचल्या नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांनी सारा गांधी परिवार एकहाती सांभाळला. घर राखले, त्यातली माणसे जपली आणि प्रत्येकाशी नाते राखले. पक्षनेत्यांच्या कारभारात कधी हस्तक्षेप केला नाही. पक्षाने काही काळ केलेली उपेक्षाही त्यांनी सहन केली. पक्षातील विरोधकांना त्यांच्यापासून तुटतानाही देशाने पाहिले. मात्र २००४ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील पक्षाला जनतेने बहुमत दिले तेव्हा त्यांनी मित्रपक्षांच्या सहकार्याने संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकारने त्यांना आपले नेतृत्वपद म्हणजे पंतप्रधानपद दिले. पण आपण ‘विदेशी’ असल्याचे राजकारण करून विरोधक देशात रडीचे राजकारण उभे करतील या शंकेने त्यांनी ते पद नाकारले. (प्रत्यक्षात सुषमा स्वराज या तेवढ्यासाठी स्वत:चे वपन करायला तेव्हा निघाल्याही होत्या) हाती आलेले देशाचे पंतप्रधानपद आपले विश्वासू सहकारी डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सोपविण्यामागील त्यांचा त्याग हा जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची नोंद ठरावी असा झाला. त्या पदासाठी सारे पुढारी त्यांचे राजकारण करतात ते पद दुसºयाला देण्यातला त्यांचा त्याग अभूतपूर्व म्हणावा असा होता. नंतरच्या काळात सारी सत्ता हातात असताना त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या पदाचा सन्मान कायम राखला व आपलीही आब पक्षात व देशात तशीच राखली. त्याच बळावर त्यांनी २००९ मध्येही पक्षाला केंद्रात मोठा विजय मिळवून दिला. पण सत्तेने वा अधिकाराने त्यांच्या स्वभावात वा व्यक्तिमत्त्वात कधी अहंकार येऊ दिला नाही. त्यांचे वागणे बोलणे एखाद्या घरंदाज भारतीय स्त्रीसारखेच राहिले. पतीच्या निधनाचे दु:ख आणि इंदिरा गांधींची झालेली हत्या असे आघात पचविणाºया सोनिया गांधींसमोर राहुल गांधींच्या एकाकी नेतृत्वाच्या सुरक्षेचेही भय आहेच. मात्र त्यांनी राहुलला कधी थांबविले नाही. गुजरातच्या निवडणुकीत ते जोखीम अंगावर घेऊन काम करतात. पण त्याविषयीचा चिंतेचा शब्द त्यांनी कधी काढला नाही. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे कर्तव्य निष्ठेने पार पाडावे तसे त्या राहुल गांधींच्या प्रवासाकडे पाहत आहेत. त्यांना जय-पराजयाची चिंता नाही. त्या दोन्ही गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि पचविल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीची आस्था असणाºयांना आज वाटणारी काळजी त्यांच्या प्रकृतीची आहे.त्यांच्या तब्येतीच्या उलटसुलट बातम्या येत असतात आणि त्या धास्तावणाºया असतात. देशाला अशी सून, अशी माता आणि असे शांत व अनाक्रमक नेतृत्व सोनिया गांधींच्या आधी फार क्वचितच लाभले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाध्यक्षीय कारकिर्दीच्या अखेरीस त्यांना दीर्घायुरारोग्याच्या व त्यांचे मार्गदर्शन देशाला दीर्घकाळ लाभत राहावे अशाच शुभेच्छाही द्यायच्या आहेत.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी