शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सहानुभूती जिंकली, दहशत हरली

By admin | Updated: April 15, 2015 23:39 IST

पोटनिवडणुकांच्या निकालाचे फार श्लेष काढायचे नसतात आणि या निकालांच्या आधारे भविष्यकालीन आडाखेही मांडायचे नसतात. त्यातच जेव्हा पोटनिवडणूक एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत घेणे भाग पडलेले असते

पोटनिवडणुकांच्या निकालाचे फार श्लेष काढायचे नसतात आणि या निकालांच्या आधारे भविष्यकालीन आडाखेही मांडायचे नसतात. त्यातच जेव्हा पोटनिवडणूक एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत घेणे भाग पडलेले असते व या अपवादात्मक परिस्थितीला दु:खाची किनार असते, त्यावेळी तर स्थितीच पूर्णांशाने भिन्न असते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील आणि मुंबईतील वान्द्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या तृप्ती सावंत या उभय महिला उमेदवार विजयी झाल्या नसत्या तरच राजकीय आडाखे बांधायला वाव मिळाला असता. भारतीय मतदार सामान्यत: भावनाशील असतो, हे याआधीही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार रा.रा.पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या अकस्मात निधनामुळे पोटनिवडणूक अनिवार्य ठरल्यावर व दोहोेंच्या भार्यांनाच त्या मतदारसंघातून संबंधित पक्षांनी उमेदवारी बहाल केल्यानंतर दोघींच्या वाट्याला मतदारांची सहानुभूती येणे सहजस्वाभाविक होते. खरे तर या दोन्ही निवडणुका अविरोध पार पाडल्या जाव्यात असाच काहींचा आग्रह वा मानस होता. तो काहींना मानवला नाही व निवडणूक अनिवार्य ठरली. अर्थात साऱ्या देशाने लोकशाहीचा सहर्ष स्वीकार केलेला असल्याने यात फार काही गैर झाले असेही नाही. त्यातल्या त्यात कवठेमहांकाळची निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्वच पक्षांनी सहकार्याची भूमिका स्वीकारलेली असताना, तिथे अन्य काही उमेदवारांच्या जोडीने भाजपाच्या एका बंडखोरानेही निवडणूक लढविली. त्याला भाजपाने दूर सारले असले तरी तो चुकून विजयी झालाच असता तर भाजपाची भूमिका कदाचित वेगळीही राहिली असती. पण ते होणे नव्हते. वांद्र्याची निवडणूक मात्र अटीतटीची झाली. तूर्तास शिवसेनेशी सत्तेतली भागीदारी असल्याने भाजपाने तिथे आपला उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेसने मात्र आपला मोठा मोहरा नारायण राणे यांच्या माध्यमातून इरेला पाडला. राणे प्रारंभी ही निवडणूक लढवायला फारसे उत्सुक नव्हते असे म्हणतात. पण पक्ष कोणताही असला तरी प्रत्येक राजकारणी ‘अगं अगं म्हशी’ करीत असल्याने राणे त्याला अपवाद कसे ठरावेत? त्यातून त्यांच्या इच्छेविरुद्ध कुणी त्यांना काही करण्यास भाग पाडेल वा दस्तुरखुद्द राणे स्वत:चे मन मोडून काही करतील हे कालत्रयी होणे नाही. त्यांनी निवडणूक लढविली आणि त्यांच्याकडील साऱ्या आयुधांसकट लढविली. त्यांच्या पुढ्यात शिवसेना आणि सेनेच्या पुढ्यात राणे म्हटल्यानंतर अटीतटी ओघानेच आली. त्यातून याच मतदारसंघात शिवसेनेचे मातोश्री हे मुख्यालय आणि देवालयदेखील. परिणामी दोहोंच्या प्रतिष्ठा पणास लागणेही आलेच. तरीही सामना राणे विरुद्ध शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्यापुरता सीमित न राहता तिथे मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या ओवेसी बंधूंच्या पक्षानेही आपली उमेदवारी पुढे सारली. सदर पक्षाचे तेलंगणातील आमदार असलेले अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम मतदारांना आकृष्ट करून घेण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या लकबीनुसार आगखाऊ वक्तव्ये केली. ओवेसींचा पक्ष आणि नारायण राणे (राणे यांचा पक्ष असे येथे अभिप्रेत नाही) या दोहोंचे लक्ष्य एकच आणि ते म्हणजे शिवसेना. साहजिकच सेना एकाचवेळी दोहोंचाही मुकाबला करीत होती. यातील गंमतीशीर योगायोग म्हणजे ज्या तीन शक्तींमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने रस्सीखेच होत होती, त्यांच्यात एक बाब मात्र सामाईक होती आणि ती म्हणजे तिघांना शुचितेचे, सोज्वळतेचे आणि किमान शिष्टाचाराचे असलेले वावडे. परिणामी राणे यांच्या उभय पुत्रांच्या जोडीने सेनेच्या आमदारासकट काही सैनिकांना ऐन मतदानाच्या दिवशी काही काळापुरते का होईना जेरबंद करणे पोलिसांना भाग पडले होते. ओवेसी यांच्या वक्तव्यांवरून गदारोळ सुरूच आहे व कदाचित त्याला यानंतर अधिक जोर चढू शकतो. पण मजलिसने खेचून घेतलेली मते नगण्य मात्र म्हणता येत नाहीत. मुंबईत तसाही त्यांचा एक आमदार आहेच आणि तोदेखील सेनेच्या तथाकथित गडामधूनच निवडून गेलेला आहे. त्यामुळे मजलिसला माध्यमांनीच अकारण हवा देण्याचे प्रयत्न केले, असे म्हणण्यात मतलब नाही. निवडणूक आणि मतदारांची मानसिकता याबाबत अनेकदा जी ठोकळेबाज मांडणी केली जाते, ती लक्षात घेता, मजलिसने मुसलमानांची मते स्वत:कडे आकृष्ट करून घेतली व त्यापायी काँग्रेसच्या खात्यातील तितकी मते कमी झाली आणि राणेंना अल्पावधीत दुसऱ्या पाडावाला सामोरे जावे लागले. झालेल्या मतदानाच्या संदर्भातल्या अशाच ठोकताळ्याचा विचार करता, अल्प मतदान स्थितीस्थापकत्वाच्या म्हणजे ‘जैसे थे’च्या बाजूने झुकणारे असते असे म्हटले जाते व तसेच घडल्याचे उभय ठिकाणी आढळून येते. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांच्या बाजूने नि:संशय सहानुभूती हा घटक समान होता. पण वान्द्रे पोटनिवडणुकीत एक जास्तीचा घटक होता आणि तो मतदारांच्या मनातील सहानुभूतीला छेद देऊ पाहत होता. हा घटक होता, दहशतीचा, अरेरावीचा आणि विधिनिषेधशून्यतेचा. पण मतदारांनी यापैकी कशाचीच डाळ शिजू दिली नाही आणि म्हणूनच म्हणायचे, सहानुभूती जिंकली, तर दहशत हरली!