शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वंचितांची प्रकाशवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:36 IST

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो.

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो. परवा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी हेच सिद्ध केले. ही मुले आश्रमशाळेत शिकणारी. त्यातही अभिमानाची बाब अशी की या महापराक्रमी विद्यार्थ्यांत एका मुलीचाही समावेश आहे. एरवी आश्रमशाळेत शिकणाºया मुलांच्या बाबतीत सरकारचा आणि समाजाचा भाव कायम करुणेचा असतो. आदिवासी समाजातील या मुलांना शिक्षण देणे एवढाच एक उपचार त्यामागे असतो. पण ही मुले अभ्यासाव्यतिरिक्त विविध क्षेत्रातही नेत्रदीपक यश मिळवू शकतात, असे सरकारला कधी वाटत नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्नही होत नाहीत. ही मुले जन्मापासूनच संघर्ष करीत असतात. दारिद्र्य लहानपणापासून त्यांनी बघितलेले असते. त्यामुळे कष्ट उपसण्याची व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती त्यांच्यात अंगभूत असते. फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आदिवासी मुलांमधील हे शौर्य ओळखले. ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या चार मुलांना घडविण्यात आले. सरकारी यंत्रणा समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून एखादा उपक्रम प्रामाणिकपणे राबवत असेल तर त्याचे यशही समाजासमोर ठळकपणे येत असते. ही एक चांगली गोष्टही या कीर्तिवंतांच्या यशातून समोर आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिनंदन करायलाच हवे. आमचे राजकारणी कायमस्वरुपी निवडणुकीतील मतांचा विचार करून आपले राजकारण पुढे दामटत असतात. मुनगंटीवार मात्र सतत समाजातील अशा उपेक्षित घटकांच्या कल्याणाचा राजकारणनिरपेक्ष विचार करीत असतात. केवळ आंदोलन आणि मोर्चातून या उपेक्षित घटकांचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी एक विधायक दृष्टिकोन हवा. या वर्गातील मुले समाजातील मुख्य प्रवाहात सामील होत असताना त्यांनी सर्वच क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवावे, असेही प्रयत्न करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या मुलांनी आपल्या यशातून समाजातील सर्वच उपेक्षित घटकांसमोर प्रकाशाची नवी वाट निर्माण केली आहे. हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीही आहे. या घटकांच्या प्रगतीची बीजेसुद्धा या यशात रुजलेली आहेत.