शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांची प्रकाशवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:36 IST

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो.

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो. परवा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी हेच सिद्ध केले. ही मुले आश्रमशाळेत शिकणारी. त्यातही अभिमानाची बाब अशी की या महापराक्रमी विद्यार्थ्यांत एका मुलीचाही समावेश आहे. एरवी आश्रमशाळेत शिकणाºया मुलांच्या बाबतीत सरकारचा आणि समाजाचा भाव कायम करुणेचा असतो. आदिवासी समाजातील या मुलांना शिक्षण देणे एवढाच एक उपचार त्यामागे असतो. पण ही मुले अभ्यासाव्यतिरिक्त विविध क्षेत्रातही नेत्रदीपक यश मिळवू शकतात, असे सरकारला कधी वाटत नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्नही होत नाहीत. ही मुले जन्मापासूनच संघर्ष करीत असतात. दारिद्र्य लहानपणापासून त्यांनी बघितलेले असते. त्यामुळे कष्ट उपसण्याची व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती त्यांच्यात अंगभूत असते. फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आदिवासी मुलांमधील हे शौर्य ओळखले. ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या चार मुलांना घडविण्यात आले. सरकारी यंत्रणा समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून एखादा उपक्रम प्रामाणिकपणे राबवत असेल तर त्याचे यशही समाजासमोर ठळकपणे येत असते. ही एक चांगली गोष्टही या कीर्तिवंतांच्या यशातून समोर आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिनंदन करायलाच हवे. आमचे राजकारणी कायमस्वरुपी निवडणुकीतील मतांचा विचार करून आपले राजकारण पुढे दामटत असतात. मुनगंटीवार मात्र सतत समाजातील अशा उपेक्षित घटकांच्या कल्याणाचा राजकारणनिरपेक्ष विचार करीत असतात. केवळ आंदोलन आणि मोर्चातून या उपेक्षित घटकांचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी एक विधायक दृष्टिकोन हवा. या वर्गातील मुले समाजातील मुख्य प्रवाहात सामील होत असताना त्यांनी सर्वच क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवावे, असेही प्रयत्न करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या मुलांनी आपल्या यशातून समाजातील सर्वच उपेक्षित घटकांसमोर प्रकाशाची नवी वाट निर्माण केली आहे. हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीही आहे. या घटकांच्या प्रगतीची बीजेसुद्धा या यशात रुजलेली आहेत.