शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

नाणार की जाणार? की सुका दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे.

अतुल कुलकर्णी|

प्रिय सुभाष देसाई साहेब,जय महाराष्ट्र.एक काम जोरात केलं. त्या नाणारची अधिसूचना रद्दची घोषणा केली ते बरं झालं. आता करा म्हणावं त्या भाजपावाल्यांना काय करायचं ते. आता ना नाणार ना गाणार... पण साहेब, एरव्ही माध्यमांना बाईट देण्यासाठी कंजुषी करणारे आपले मा.मु. ऊर्फ देवेंद्रभाऊ काल चक्क बाईट देण्यासाठी थांबले आणि अधिसूचना रद्द केलेली नाही असं सांगून टाकलं ना त्यांनी. त्यामुळे नाणारला प्रकल्प होणार की नाही, यापेक्षाही मिलियन डॉलर क्वश्चन झालाय अधिसूचना आहे की नाही...? याचा. ते म्हणतात, आपल्याला अशी अधिसूचना रद्द करायचा अधिकारच नाही, चक्क आपल्याला अधिकार नाही म्हणतायतं... आपण अजून सत्तेत आहोत साहेब, तरीही हे असं बोलतायंत. हे काय बरोबर नाही साहेब... थेट आपल्याला चॅलेंज देतात म्हणजे काय? आता आपल्या स्वाभिमानाचा सवाल आहे साहेब, काहीही करा आणि अधिसूचना रद्द करून टाका. नाहीतर आपलं त्या कोकणातल्या स्वाभिमानी नेत्यासारखं व्हायचं. त्यांनी नाही का स्वाभिमान सोडून कमळ जवळ केलं. आता तो रद्द केलेला जीआर की फीआर फेकून मारा या सरकारच्या तोंडावर. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ होतो की नाही पाहा...खासगीत सांगतो साहेब, मंत्रालयातले एक अधिकारी म्हणत होते, जोपर्यंत अधिसूचना कायम आहे तोपर्यंत आपले बोलणे म्हणजे पोकळ धमकीच. शिवाय एकाने तर आणखी वेगळीच माहिती दिलीय. आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे. कारण काही करून त्यांना नाणार प्रकल्प करूनच घ्यायचाय. एकदा का आपण हे खाते सोडले की भाजपवाले प्रकल्प पूर्ण करून घेतील आणि आपल्याला त्या बदल्यात दुसरी दोन खाती पण मिळतील म्हणे. त्यामुळे आपल्या साहेबांनी अचूक टायमिंग साधून भाजपाची कोंडी केली म्हणतात? आता खाते सोडावे तरी आपले साहेब हिरो आणि नाही सोडावे तरी आपला विरोध कायम... हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते सांगून टाका साहेब.आपल्या साहेबांनी त्या नाणार प्रकल्पावर हातोडा मारला खरा, पण जर का ती अधिसूचनाच रद्द झाली नाही तर सगळं मुसळ केरात जाणार. नाहीतरी आपली इमेज विचित्र झालीयं. आपण ना इकडचे ना तिकडचे. सत्तेत असून भाजपावाले आपल्या विरोधातले समजतात आणि विरोधक आपल्याला गांडूळ म्हणून चिडवतात. त्यामुळे आम्हाला नेमकं काय करावं काही कळेनासं झालयं. तेव्हा काय ते बघा जरा...तरी बरं आपल्या साहेबांनी एवढी मस्ती असेल तर प्रकल्प रेटून दाखवा अशी धमकी दिलीय ते बरं झालं. पण साहेब, ती धमकी सुकी आहे की ओली...? की नेहमीप्रमाणे भाजपावाले या कानाने ऐकतील आणि त्या कानाने सोडून देतील आपली धमकी... तसं झालं तर मग लोक पुन्हा आपल्याला गांडूळ म्हणू लागतील. आपलं तर डोकं काम करेनासं झालंय. या तुमच्या धरसोडीमुळं कार्यकर्ते देखील बिथरलेत साहेब. ते म्हणतात, तुमचं आधी काय ते ठरवा, विरोध आहे की सोबत आहे...? मग आम्हाला कामं सांगा, नाहीतर आम्हाला दरवेळी तोंडावर का पाडता असंही म्हणत आहेत साहेब...

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प