शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

नाणार की जाणार? की सुका दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे.

अतुल कुलकर्णी|

प्रिय सुभाष देसाई साहेब,जय महाराष्ट्र.एक काम जोरात केलं. त्या नाणारची अधिसूचना रद्दची घोषणा केली ते बरं झालं. आता करा म्हणावं त्या भाजपावाल्यांना काय करायचं ते. आता ना नाणार ना गाणार... पण साहेब, एरव्ही माध्यमांना बाईट देण्यासाठी कंजुषी करणारे आपले मा.मु. ऊर्फ देवेंद्रभाऊ काल चक्क बाईट देण्यासाठी थांबले आणि अधिसूचना रद्द केलेली नाही असं सांगून टाकलं ना त्यांनी. त्यामुळे नाणारला प्रकल्प होणार की नाही, यापेक्षाही मिलियन डॉलर क्वश्चन झालाय अधिसूचना आहे की नाही...? याचा. ते म्हणतात, आपल्याला अशी अधिसूचना रद्द करायचा अधिकारच नाही, चक्क आपल्याला अधिकार नाही म्हणतायतं... आपण अजून सत्तेत आहोत साहेब, तरीही हे असं बोलतायंत. हे काय बरोबर नाही साहेब... थेट आपल्याला चॅलेंज देतात म्हणजे काय? आता आपल्या स्वाभिमानाचा सवाल आहे साहेब, काहीही करा आणि अधिसूचना रद्द करून टाका. नाहीतर आपलं त्या कोकणातल्या स्वाभिमानी नेत्यासारखं व्हायचं. त्यांनी नाही का स्वाभिमान सोडून कमळ जवळ केलं. आता तो रद्द केलेला जीआर की फीआर फेकून मारा या सरकारच्या तोंडावर. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ होतो की नाही पाहा...खासगीत सांगतो साहेब, मंत्रालयातले एक अधिकारी म्हणत होते, जोपर्यंत अधिसूचना कायम आहे तोपर्यंत आपले बोलणे म्हणजे पोकळ धमकीच. शिवाय एकाने तर आणखी वेगळीच माहिती दिलीय. आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे. कारण काही करून त्यांना नाणार प्रकल्प करूनच घ्यायचाय. एकदा का आपण हे खाते सोडले की भाजपवाले प्रकल्प पूर्ण करून घेतील आणि आपल्याला त्या बदल्यात दुसरी दोन खाती पण मिळतील म्हणे. त्यामुळे आपल्या साहेबांनी अचूक टायमिंग साधून भाजपाची कोंडी केली म्हणतात? आता खाते सोडावे तरी आपले साहेब हिरो आणि नाही सोडावे तरी आपला विरोध कायम... हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते सांगून टाका साहेब.आपल्या साहेबांनी त्या नाणार प्रकल्पावर हातोडा मारला खरा, पण जर का ती अधिसूचनाच रद्द झाली नाही तर सगळं मुसळ केरात जाणार. नाहीतरी आपली इमेज विचित्र झालीयं. आपण ना इकडचे ना तिकडचे. सत्तेत असून भाजपावाले आपल्या विरोधातले समजतात आणि विरोधक आपल्याला गांडूळ म्हणून चिडवतात. त्यामुळे आम्हाला नेमकं काय करावं काही कळेनासं झालयं. तेव्हा काय ते बघा जरा...तरी बरं आपल्या साहेबांनी एवढी मस्ती असेल तर प्रकल्प रेटून दाखवा अशी धमकी दिलीय ते बरं झालं. पण साहेब, ती धमकी सुकी आहे की ओली...? की नेहमीप्रमाणे भाजपावाले या कानाने ऐकतील आणि त्या कानाने सोडून देतील आपली धमकी... तसं झालं तर मग लोक पुन्हा आपल्याला गांडूळ म्हणू लागतील. आपलं तर डोकं काम करेनासं झालंय. या तुमच्या धरसोडीमुळं कार्यकर्ते देखील बिथरलेत साहेब. ते म्हणतात, तुमचं आधी काय ते ठरवा, विरोध आहे की सोबत आहे...? मग आम्हाला कामं सांगा, नाहीतर आम्हाला दरवेळी तोंडावर का पाडता असंही म्हणत आहेत साहेब...

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प