शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नाणार की जाणार? की सुका दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे.

अतुल कुलकर्णी|

प्रिय सुभाष देसाई साहेब,जय महाराष्ट्र.एक काम जोरात केलं. त्या नाणारची अधिसूचना रद्दची घोषणा केली ते बरं झालं. आता करा म्हणावं त्या भाजपावाल्यांना काय करायचं ते. आता ना नाणार ना गाणार... पण साहेब, एरव्ही माध्यमांना बाईट देण्यासाठी कंजुषी करणारे आपले मा.मु. ऊर्फ देवेंद्रभाऊ काल चक्क बाईट देण्यासाठी थांबले आणि अधिसूचना रद्द केलेली नाही असं सांगून टाकलं ना त्यांनी. त्यामुळे नाणारला प्रकल्प होणार की नाही, यापेक्षाही मिलियन डॉलर क्वश्चन झालाय अधिसूचना आहे की नाही...? याचा. ते म्हणतात, आपल्याला अशी अधिसूचना रद्द करायचा अधिकारच नाही, चक्क आपल्याला अधिकार नाही म्हणतायतं... आपण अजून सत्तेत आहोत साहेब, तरीही हे असं बोलतायंत. हे काय बरोबर नाही साहेब... थेट आपल्याला चॅलेंज देतात म्हणजे काय? आता आपल्या स्वाभिमानाचा सवाल आहे साहेब, काहीही करा आणि अधिसूचना रद्द करून टाका. नाहीतर आपलं त्या कोकणातल्या स्वाभिमानी नेत्यासारखं व्हायचं. त्यांनी नाही का स्वाभिमान सोडून कमळ जवळ केलं. आता तो रद्द केलेला जीआर की फीआर फेकून मारा या सरकारच्या तोंडावर. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ होतो की नाही पाहा...खासगीत सांगतो साहेब, मंत्रालयातले एक अधिकारी म्हणत होते, जोपर्यंत अधिसूचना कायम आहे तोपर्यंत आपले बोलणे म्हणजे पोकळ धमकीच. शिवाय एकाने तर आणखी वेगळीच माहिती दिलीय. आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे. कारण काही करून त्यांना नाणार प्रकल्प करूनच घ्यायचाय. एकदा का आपण हे खाते सोडले की भाजपवाले प्रकल्प पूर्ण करून घेतील आणि आपल्याला त्या बदल्यात दुसरी दोन खाती पण मिळतील म्हणे. त्यामुळे आपल्या साहेबांनी अचूक टायमिंग साधून भाजपाची कोंडी केली म्हणतात? आता खाते सोडावे तरी आपले साहेब हिरो आणि नाही सोडावे तरी आपला विरोध कायम... हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते सांगून टाका साहेब.आपल्या साहेबांनी त्या नाणार प्रकल्पावर हातोडा मारला खरा, पण जर का ती अधिसूचनाच रद्द झाली नाही तर सगळं मुसळ केरात जाणार. नाहीतरी आपली इमेज विचित्र झालीयं. आपण ना इकडचे ना तिकडचे. सत्तेत असून भाजपावाले आपल्या विरोधातले समजतात आणि विरोधक आपल्याला गांडूळ म्हणून चिडवतात. त्यामुळे आम्हाला नेमकं काय करावं काही कळेनासं झालयं. तेव्हा काय ते बघा जरा...तरी बरं आपल्या साहेबांनी एवढी मस्ती असेल तर प्रकल्प रेटून दाखवा अशी धमकी दिलीय ते बरं झालं. पण साहेब, ती धमकी सुकी आहे की ओली...? की नेहमीप्रमाणे भाजपावाले या कानाने ऐकतील आणि त्या कानाने सोडून देतील आपली धमकी... तसं झालं तर मग लोक पुन्हा आपल्याला गांडूळ म्हणू लागतील. आपलं तर डोकं काम करेनासं झालंय. या तुमच्या धरसोडीमुळं कार्यकर्ते देखील बिथरलेत साहेब. ते म्हणतात, तुमचं आधी काय ते ठरवा, विरोध आहे की सोबत आहे...? मग आम्हाला कामं सांगा, नाहीतर आम्हाला दरवेळी तोंडावर का पाडता असंही म्हणत आहेत साहेब...

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प