शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

राज्यातील निवासी डॉक्टरांना कोणी वाली मिळेल का? सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

By संतोष आंधळे | Updated: August 12, 2024 09:00 IST

कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

प्रासंगिक - संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या निवासी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या. या प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रसंगाने केईएम रुग्णालयातील अरुणा शानबाग प्रकरणाच्या  कटु आठवणी जाग्या झाल्या. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील  निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा पुरविली जावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टर्स सोमवारपासून दिवसभरातील काही निवडक सेवा थांबवण्याचा इशारा दिला आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांची बरी परिस्थिती असली, तरीही निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आणि समाजकंटकाकडून अनेकवेळा हल्ले झाले आहेत. एखादी अनुचित घटना घडली की, तात्पुरती मलमपट्टी करायची, हे धोरण सोडून ठोस निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.  

तहान भूक विसरून प्रचंड अभ्यास करायचा. कठीण असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत पास व्हायचे. त्यानंतर ज्या रुग्णालयात काम करत आहोत, त्या ठिकाणी साध्या मूलभूत सुविधा नसलेल्या जागी तीन वर्षे राबायचे, रुग्णसेवा बजावत  शिक्षण घ्यायचे. राहण्यासाठी चांगली निवासाची सोय नाही. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील वसतिगृहे बरे असून, राज्यातील इतर भागांत निवासी डॉक्टरांची वसतिगृहांची परिस्थिती भयावह अशी आहे.

कोंबड्याच्या खुराड्यात राहावे, अशी अवस्था या गुणवंत विद्यार्थ्यांची आहे. कसेबसे राहून दिवस काढायचे ही त्यांची दिनचर्या. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांचा परिसर मोठा असून, निवासी डॉक्टरांना अनेकवेळा रुग्णसेवेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते.  अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवेही नसतात. कुत्रे भुंकत असतात. या भयभीत वातावरणात निवासी डॉक्टर त्याचे कर्तव्य पार पाडत असतो. त्यासंदर्भात तक्रारही करत नाहीत. त्यांच्या करीता किमान संपूर्ण रुग्णालय परिसरात रात्रीची गस्त सुरक्षारक्षकांनी घातली पाहिजे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्ययक आहे, कारण रुग्णालयात येणारा पहिला रुग्ण बघण्याचे काम हा निवासी डॉक्टर बघत असतो.

सध्याच्या घडीला राज्यात  जवळपास ११,२११ निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. या निवासी डॉक्टरांनी दिवसभरात किती तास काम करायचे हे निश्चित नाही. २४ तास रुग्ण सेवा द्यायची. इतर राज्यांतील काही केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील वैद्यकीय संस्थेत निवासी डॉक्टरांनी किती काळ काम करावे, यावर काही नियम करण्याचे काम सुरू आहेत. त्यांना साप्ताहिक रजा असावी, यावरसुद्धा चर्चा सुरू आहे.    

नियमित डॉक्टरांवर होणाऱ्या या हल्ल्याच्या विरोधात सरकाने केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा आणावा, अशी मागणी केली. अनेक वर्षे इंडियन मेडिकल असोसिएशन करत आहे. या घटनेनंतर  फोरडा या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ती मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.  निवासी डॉक्टरांवर असेच हल्ले होत राहिले, तर एके दिवशी हॅशटॅग सेव्ह रेसिडेंट डॉक्टर्स मोहीम राबवायची  वेळ येईल.

टॅग्स :doctorडॉक्टर