शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

अधिकारी-मंत्री वाद संपेल का?

By admin | Updated: November 22, 2015 23:28 IST

पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या खात्याचे सचिव दीपक कपूर यांना डाळीच्या खरेदीत झालेल्या दप्तरदिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांचा खुलासा मागवला आहे.

पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या खात्याचे सचिव दीपक कपूर यांना डाळीच्या खरेदीत झालेल्या दप्तरदिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांचा खुलासा मागवला आहे. एखाद्या कॅबिनेट मंत्र्याने आयएएस अधिकाऱ्यास असे पत्र देणे आणि संबंधित विभागाच्या चुका ‘रेकॉर्ड’वर आणणे, पत्राच्या प्रती मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना देणे या गोष्टी आधी कधीही घडल्या नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली तर त्याच्यासमोर नाराजी व्यक्त करून विषय तिथल्या तिथे संपवला जाई. पण यावेळी असे घडले नाही. प्रशासनात आलबेल नाही हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अधिकाऱ्यांची मानसिकता अजूनही बदलत नाही, अशी टीका आणि दोनच दिवसांपूर्वी झालेल्या विविध विभागाच्या बैठकांमध्येही कामे होत नसतील तर खुर्च्या अडवून बसू नका अशा शब्दात खडसावले. प्रशासन-मंत्री यांच्यातील विसंवादाचे दूरगामी परिणाम राज्याच्या कारभारावर पडतात. पण ही वेळ का आली याचा कधी कोणी विचारच करीत नाही. मुंबई-पुण्यात पोस्टिंग घेणे ठरावीक अधिकाऱ्यांचीच मालकी कशी बनली, काही अधिकारी वर्षानुवर्षे महसूल-नगरविकास विभागातच कसे कार्यरत राहिले, ठरावीक अधिकाऱ्यांनाच मलईदार जागा कशा मिळतात, श्रीकर परदेशी किंवा महेश झगडे यांच्यासारखे अधिकारी या व्यवस्थेला नकोसे का वाटू लागतात, या प्रश्नांची उत्तरे शोधून त्यावर अंमलबजावणी झाली तर नाराजीचे मूळच संपेल.आज आयपीएस लॉबीत महाराष्ट्र केडरचे आणि थेट आयपीएस असे, तर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये प्रमोटी आणि थेट निवड असे दोन उघड गट आहेत. दोन्ही ठिकाणचे काही अधिकारी वादापासून कोसो दूर आहेत, तर काही केवळ वादासाठीच काम करताना दिसतात. सगळ्यांचा जीव पोस्टिंग कोणती मिळते या एकाच प्रश्नात गुंतलेला. त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे अधिकारीही नाहीत असे नाही. या अधिकाऱ्यांना दूर सारून चांगले अधिकारी वेचून काढणे आणि त्यांना मुंबई- पुण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही. फडणवीस सरकार सत्तेवर आले आणि जुन्या स्टाफला हटवण्याचे आदेश निघाले. प्रत्येक मंत्री कार्यालयाची इन्स्टिट्यूशनल मेमरी असते. या निर्णयाने तीच संपुष्टात आणली गेली. परिणामी मंत्रालयाचे कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले. या दरम्यान, वर्षभरात ज्या बदल्या झाल्या त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असणारे, चौकशांंचा ससेमिरा मागे लागलेले आणि चांगले काम करणारे असे दोन्ही प्रकारचे अधिकारी महत्त्वाच्या जागांवर आले. प्रशासनात काही गोष्टी कृतीतून बोलल्या जातात. तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला कोठे नेमता यावरून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीचे काम करू इच्छिता, याचा संदेश अधिकाऱ्यांच्या लॉबीला मिळत असतो. येथे नेमके हेच झाले. काय हवे आणि काय नको हेच स्पष्ट झाले नाही. मागचे दोन्ही मुख्यमंत्री अमुक अधिकाऱ्यांचेच ऐकतात असा संदेश राज्यभर गेला होता. तोच याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दृढ होत चालला असल्याने ठरावीक अधिकाऱ्यांवर मर्जी केलीे जाते हे कळायला बाकीच्यांना वेळ लागला नाही. त्यामुळे आलेली फाईल पुढे ढकलण्यापलीकडे कोणी उत्साहाने काही करेनासे झाले आहे.या सगळ्यात शासन आणि प्रशासन यांतील दुवा म्हणून मुख्य सचिव काम करीत असतात. शिस्तप्रिय अधिकारी अशी चांगली प्रतिमा असणाऱ्या मुख्य सचिवांची दिल्लीत बदली झाल्याच्या बातम्या सतत पेरल्या जाऊ लागल्या आणि त्यांच्याही मनात आपण डावलले जातोय अशी भावना वाढीस लागल्याचे बोलले जाऊ लागले. हे कटू असले तरी वास्तव आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या तळमळीने काम करत आहेत, त्याला जर त्यांच्याच आजूबाजूचे सुरुंग लावत असतील तर वेळीच सावध व्हायला हवे. नाहीतर चांगल्या मुख्यमंत्र्यांना निष्कारण वाईटपणा येऊ शकतो...- अतुल कुलकर्णी