शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारताला नकाराधिकार मिळेल का?

By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST

युक्त राष्ट्रसंघाचे वार्षिक अधिवेशन पुढच्या आठवड्यात सुरू होत असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या सदिच्छा भेटीवर आले

शशीधर खानपरराष्ट्र धोरणाचे अभ्यासक युक्त राष्ट्रसंघाचे वार्षिक अधिवेशन पुढच्या आठवड्यात सुरू होत असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या सदिच्छा भेटीवर आले, हा सुखद योगायोग म्हणायचा. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वावर भारताचा जुना दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच दणक्यात मजबुतीने मांडतील, अशी अपेक्षा आहे. २७ व २८ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भारताची बाजू मांडण्याआधी या जागतिक पीठाचे सर्वांत प्रभावशाली कायम सदस्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोदी भेट घेतील. त्या वेळीही मोदी ओबामांकडे हा विषय काढतील, अशी आशा आहे. पण, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, चीनचा पाठिंबा मिळवणे. इतर स्थायी सदस्यांप्रमाणे चीनकडून पाठिंब्याचे आश्वासन मिळवण्यात भारताला यश मिळालेले नाही. चीनचे अध्यक्ष भारतात येऊन गेले, त्यामागचा उद्देश व्यापारी संबंध भक्कम करणे हा होता. मोदींचे गृहराज्य गुजरातमधून दौऱ्याला सुरुवात करून जिनपिंग यांनी जरा अधिकच जवळीक दाखवली; पण त्यामुळे भारताचा दबदबा वाढला, असे समजण्याचे कारण नाही. चिनी अध्यक्षांच्या दौऱ्यात जे काही करार झाले, ते एकतर्फी होते. कडवटपणा असलेला एकही विषय भारताने काढला नाही. सुरक्षा परिषदेत जागा मिळावी, हा विषयही भारताने काढला नाही. संयुक्त राष्ट्रामध्ये चीन भारताला आपल्या बरोबरीने बसवू इच्छित नाही, याची मोदींना चांगली कल्पना आहे. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळालेल्या पाच युरोपिय देशांचे अध्यक्ष भारत भेटीवर येतात, तेव्हा लाजेखातर का होईना, भारताचा दावा उचलून धरतात. पण, या पाचांमध्ये चीन हा एकमेव देश असा आहे, की त्याने कधी भारताला पाठिंबा देण्याची गोष्ट काढली नाही. तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्याच आशेने २००३मध्ये चीनला गेले होते. पण, चीनकडून त्यांना गोलमोल आश्वासनही मिळवता आले नाही. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांनाही भारताने आपल्या रांगेत बसलेले नको आहे. भारताची शक्ती या देशांना ठाऊक नाही, अशातला भाग नाही. पण, दबंगपणा करून हवे ते मिळवून घ्यायचे, हा प्रकार भारताला ठाऊक नाही. १९४५मध्ये दुसऱ्या महायुद्धाचे विजेते या नात्याने दादागिरी करीत. या महाशक्तींनी नकाराधिकार (व्हेटो पॉवर) घेतला. एवढी वर्षे उलटूनही स्थिती तशीच आहे. सुधारणांची चर्चा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यांची संख्या वाढवण्याचा विषय चर्चेत आहे. पण, गाडी पुढे सरकत नाही. मोदींसाठी हे एक आव्हान आहे. त्यांनी ते स्वीकारलेही आहे. चीनच्या अध्यक्षांनी भारताशी ज्या नात्याचा उल्लेख केला होता, त्यात भारताचा नकाराधिकाराचा दावा अंतर्भूत नाही, आधीही नव्हता. मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी पहिल्या शंभर दिवसांतच येत्या पाच वर्षांचा अजेंडा निश्चित केला. कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी त्यांनी २०१५ची कालमर्यादा निश्चित केली. कायम सदस्यत्वावर भारताबरोबर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचाही दावा आहे. यात भारताचा दावा अधिक मजबूत आहे. तरीही ही जागा मिळत नाही, कारण चीनचा विरोध आहे. रशियाचे पुतिन यांच्याशी मोदींची भेट न्यूयॉर्कमध्ये होईल. पण, जिनपिंग भारतात येऊन गेले. नातेसंबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घेतली गेली. तिबेटी निदर्शकांना पिटाळण्यात आले. तैवान, तिबेटचा प्रश्न भारत कधी उपस्थित करीत नाही. पण, चीन मात्र काश्मीर, लडाख, अरुणाचल प्रदेशवर दावा सांगत आला. भारतीय हद्दीत चीनची घुसखोरीही सुरू असते. पण, मोदींनी तो विषय काढला नाही. चीनच्या वागण्यामुळे आशियात सत्तेचा असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागतो. भारतीय हद्दीत फुटीर कारवाया चालवण्यासाठी चीन शस्त्रास्त्रे आणि त्यांचे प्रशिक्षण देतो, ही बाब लपून राहिलेली नाही. सीमावादावर न काही सहमती होऊ शकली, ना काही करार झाला. पण, दक्षिण आशियायी देशांशी संबंध मजबूत करण्यावर मोदी सुरुवातीपासून भर देत आले आहेत. हे देश आतून चीनच्या अधिक जवळ आहेत. भारतीय मुत्सद्देगिरीचा किती फायदा मिळतो, याचा अंदाज याच महिन्यात येईल. व्यापक पाठिंब्यासह भारताने प्रस्ताव मांडला, तरी तो उडवण्यासाठी एक ‘व्हेटो’ पुरेसा आहे. नरेंद्र मोदी नुकतेच जपानला जाऊन आले. कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी ‘ग्रुप-४’ नावाने एक फोरम बनवण्यात आला आहे. भारत, चीन, जर्मनी व ब्राझील हे देश यात आहेत. पंतप्रधान वाजपेयी यांनी २००४मध्ये या फोरमचा पाया घातला. यातील मजबूत दावेदार भारत आणि जपानशी चीनचे संबंध फार चांगले नाहीत. २००५ ते २०१० पर्यंत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारताचा दावा मजबूत केला. २०१०मध्ये ‘पी-५’ समूहातील सर्व देशांचे अध्यक्ष भारतात आले होते. चीनचे अध्यक्ष वेन जियाबाओ वगळता सर्वांनी भारताचा दावा उचलून धरला होता. भारताच्या भूमिकेचे जोरदार समर्थन बराक ओबामा यांनी केले होते आणि आता मोदी त्यांना भेटायला जात आहेत. कायम सदस्यत्वाचा दावा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. हा कुठल्या राजकीय पक्षाचा मुद्दा नाही. देशाची शान पणाला लागली आहे आणि आता चेंडू मोदींच्या छावणीत आहे.