शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

गडचिरोलीचे काश्मीर होणार काय ?

By admin | Updated: June 24, 2017 02:39 IST

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याचे काश्मिरात रूपांतर होत आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्राचे सरकार शासन चालविते की तेथील नक्षलवादी त्यावर राज्य करतात

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याचे काश्मिरात रूपांतर होत आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्राचे सरकार शासन चालविते की तेथील नक्षलवादी त्यावर राज्य करतात, असा प्रश्न कुणालाही पडावा अशी त्या जिल्ह्याची आताची स्थिती भयग्रस्त आहे. या जिल्ह्याच्या १५४ ग्रामपंचायतींमधील ४३७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत त्यातील १४६ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल न केल्याची बातमी धक्कादायक म्हणावी अशी आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर बहिष्कार घाला, असे आवाहन त्या जिल्ह्यात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी केले आहे. सरकारची यंत्रणा नक्षलवाद्यांना तोंड देत तेथील ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्था कायम टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र उपरोक्त चित्र सरकारी यंत्रणा अपयशी झाली असल्याचा व नक्षलवादी हे त्यांच्या उद्दिष्टात यशस्वी झाले असल्याचे सांगणारे आहे. या जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा हैदोस १९८० पासून वाढला आहे. आपली दहशत कायम करण्यासाठी या शस्त्राचारी लोकांनी आजवर शेकडो आदिवासींना कापून ठार मारले आहे. त्याचवेळी त्यांनी पोलिसांतील व निमलष्करी दलातील अनेक जवानांचे समोरासमोरच्या चकमकीत बळी घेतले आहेत. दरवेळी नक्षलवाद्यांमधील अनेकजण आम्हाला शरण आले आहेत, अनेकांना पकडण्यात आम्हाला यश आले आहे आणि नक्षलवाद्यांचे अनेक वरिष्ठ नेते आता जेरबंद आहेत असे सरकारकडून सांगितले जाते. त्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या घोषणाही सरकारकडून फार केल्या जातात. मात्र या घोषणा वा सरकारचे सुरक्षेचे आश्वासन जनतेपर्यंत पोहचत नाही किंवा तेथील जनतेचा सरकारच्या शब्दावर विश्वास राहिला नाही असे सांगणारे हे चित्र आहे. निवडणूक हा राजकारणी लोकांच्या उत्साहाचा विषय आहे. ग्रामपंचायत असो वा लोकसभा, त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाग घ्यायला सारे राजकारणी उत्सुक असतात व ती लढवायला कंबर कसून तयार होतात. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करूनही गडचिरोली जिल्ह्यातील लोक मतदानात भाग घेत आले आणि तेथे रीतसर निवडणुकाही होत आल्या. मात्र आताचे चित्र नक्षली दहशत वाढली असल्याचे व त्या जिल्ह्यातील जनतेला हे सरकार नक्षल्यांपासून आपले संरक्षण करू शकत नाही असे वाटू लागल्याचे सांगणारे आहे. जिल्ह्याच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक याविषयी वृत्तपत्रांशी बोलायचे टाळतात. उमेदवारी अर्ज भरायला लोक पुढे येत नाहीत याची जबाबदारी स्वत:कडे न घेता निवडणूक अधिकाऱ्यांवर ढकलतात. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यातील तीनही आमदार सत्तारूढ भाजपचे आहेत. त्यातला एक मंत्रीही आहे. शिवाय तेथील खासदारही भाजपचेच आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि दोन आमदार एवढे सारे सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधी त्या जिल्ह्यात असताना ते जनतेला सुरक्षिततेबाबतचा विश्वास देऊ शकत नसतील तर तो त्यांचा, त्यांच्या पक्षाचा व एकूणच लोकशाहीचा पराभव मानला पाहिजे. या पुढाऱ्यांच्या मागे त्यांचे सरकारही नसावे असे सांगणारे हे दुर्दैव आहे. गेल्या २० वर्षांपासून त्या जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक पोलीस व निमलष्करी पथकांचे जवान तैनात आहेत. सबंध जिल्ह्यात त्यांचा वावर आहे. आर.आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी या पथकांना अत्याधुनिक शस्त्रे पुरवण्याची व्यवस्थाही केली आहे. तरीही त्या जिल्ह्यात सक्रिय असणाऱ्या दीडदोनशे नक्षलवाद्यांना या पथकांची भीती वाटत नसेल आणि त्यांच्याविषयीचा जनतेलाही विश्वास वाटत नसेल तर हा सारा संरक्षणाचा व सुरक्षा व्यवस्थेचा दिखावू खेळ आहे असे म्हटले पाहिजे. हे एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनाचे अपयश नाही. ते महाराष्ट्र सरकारचेच अपयश आहे. गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा आहे. त्याला फार मोठ्या विकासविषयक साहाय्याची गरज आहे. तेथे मोठे उद्योग येऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच त्या जिल्ह्याला भेट देऊन त्याच्या औद्योगीकरणाचे आश्वासनही तेथील जनतेला दिले आहे. सुरजागडचा पोलाद प्रकल्प त्याच्या आरंभाची वाट पाहत एवढी वर्षे उभा आहे. मात्र त्याला नक्षलवाद्यांचा असलेला विरोध कायम आहे आणि तो हा प्रकल्प पुढे जाणार नाही याची व्यवस्थाही करीत आहे. जोपर्यंत नक्षलवाद्यांचा बीमोड होत नाही आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आपले जीवन सुरक्षित आहे असे वाटत नाही तोवर तेथे विकास तर येणारच नाही शिवाय तेथील लोकशाहीही जिवंत राहणार नाही. एकेकाळी भामरागडच्या दक्षिणेला किंवा इंद्रावतीच्या काठाने नक्षलवादी वावरत. त्यांची भीतीही त्याच भागात अधिक होती. आता मात्र प्रत्यक्ष गडचिरोली, वडसा, आरमोरी यासारख्या त्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांत व प्रगत भागातही त्यांची दहशत पसरली आहे. एका जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सशस्त्र माणसे हिंसाचार करतात आणि महाराष्ट्राचे प्रगत सरकार तो नुसताच पाहते हा शासनाचे दुबळेपण सांगणारा भाग आहे.