शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाऱ्यांवरच दोष येणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 21:15 IST

सत्तरी तालुक्यातील बहुतांश रहिवासी म्हादई अभयारण्याच्या विरोधात आहेत

- राजू नायक

गोव्याच्या सत्तरी तालुक्यात चार उमद्या वाघांची हत्या झाली, त्यानंतर राज्यात उडालेली खळबळ धुरळा खाली बसावा तशी शांत झाली आहे. आणखी काही दिवसांनी लोक विसरून जातील आणि ज्यांच्यावर वाघांची हत्या केल्याचा आरोप आहे, ते सुटून जातील..१९९९ मध्ये एका वाघाच्या हत्या प्रकरणात अटक केलेली त्याच तालुक्यातील व्यक्तीही सध्या मोकाट आहे. त्याला जामीन मिळाला व प्रकरण आता हरल्यात जमा आहे. उलट ज्या वन अधिका-यांनी त्याला अटक केली, तेच ‘गुन्हेगार’ ठरले आहेत. अनिल शेटगावकर व परेश परब हे प्रामाणिक अधिकारी मानले जातात. त्यांच्यावर या व्यक्तीने आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले व तुरुंगात डांबले असल्याची तक्रार नोंदविली असून त्यात तेच नाहक सतावणूक भोगत आहेत. कोर्टात हेलपाटे घालत आहेत!

सत्तरी तालुक्यातील बहुतांश रहिवासी म्हादई अभयारण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी गेले तीन महिने त्याविरोधात उग्र निदर्शने चालविली आहेत. वनाच्या हद्दीतील दरवाज्याचीही मोडतोड केली व ‘अधिका-यांना गावबंदी’ असा फलकही उभारला आहे. स्थानिक नेतेमंडळींचा उघड पाठिंबा असल्याने वन खाते बचावात्मक भूमिका स्वीकारू लागले आहे.

चार वाघांच्या हत्या प्रकरणात दोन धनगर कुटुंबांतील लोकांना अटक झालेली असली तरी वाघाची नखे गायब असल्याने काही शिकारीही त्यात गुंतले असल्याचा संशय पर्यावरणवादी व्यक्त करतात. राजेंद्र केरकर यांनी तसे बोलून दाखवले झाले. वाघांना कारस्थान करूनच मारले असण्याची शक्यता त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आहे. परंतु तालुक्यातील संशयग्रस्त वातावरणात सत्य बाहेर येईल का, हाच खरा प्रश्न आहे.

लक्षात घेतले पाहिजे की १९९९ मध्ये म्हादई अभयारण्य जाहीर झाले असले तरी त्या भागातील लोकवस्ती, शेती, बागायती वगळण्यासंदर्भात अधिसूचना काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. कोणत्याही सरकारने त्याबाबत हालचाल केलेली नाही. त्याची सुरुवात जिल्हाधिकारी पातळीवरच अधिकारी नेमून करायची असते. या काळात अनेक लोक तेथील जमिनीवर दावा करण्यासाठी पुढे आलेले असले तरी त्यातील कोणाजवळही योग्य कागदपत्रे नाहीत. त्यातील काही जण तर धनवानही आहेत.

वन खात्याच्या दप्तरी त्यांनी जंगलात घुसखोरी केलेली असल्याने त्यांना तेथून हुसकावणेच योग्य ठरते. दुर्दैवाने राजकीय दबावाखाली अजून त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट काँग्रेस सरकारच्या काळात जो मुख्य वनपाल नेमण्यात आला, त्याने आरक्षित जंगलातील खाण कंपन्यांचेच दावे प्राधान्यक्रमाने मंजूर केले. आदिवासींच्या तोंडाला मात्र पाने पुसली. त्यानंतरच्या सरकारांनीही गेली २० वर्षे म्हादई अभयारण्याचे क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भात हयगयच केलेली आहे.

राजकीय तडजोडीच्या भूमिकेमुळे वन अधिकारी अभयारण्याबाबत व तेथील घुसखोरीबद्दलही ठाम भूमिका घेण्यास कचरतात. त्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाघांच्या मारेक-यांवर कारवाई करायला जाऊन स्वत:च ‘गुन्हेगार’ का बना, असाही प्रश्न त्यांना पडला आहे. १९९९च्या वाघ हत्या प्रकरणात कारवाई करण्याचे धाडस दाखवणा-या दोघा वनाधिका-यांना वकील देण्यासही सरकारने हयगय केली होती, ती शेवटी १० वर्षानी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना पुरी झाली.

पर्यावरणवादी म्हणतात, सरकारला वाघांच्या हत्येत सामील असणा:यांना पकडण्यात व जरब निर्माण करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. ज्यांनी प्रत्यक्ष वाघाला मारले, त्यांना शिक्षा होण्याऐवजी वन खात्यावरच दोष येण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलTigerवाघgoaगोवा