शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

झुंडशाही रोखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:25 IST

केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा

केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा ताकीद देऊन गोरक्षेच्या नावावरील हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही असे स्पष्ट बजावले. हे कमी होते की काय म्हणून सरसंघचालकांनीही त्यांना समज दिली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, असे या हैदोस घालणा-या गोरक्षकांना त्यांनी समजावून सांगितले. पण या दोघांच्याही आवाहनांचा फारसा काही परिणाम झाला नाही. त्यांना न जुमानता देशातील तथाकथित गोरक्षकांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या. त्यामुळेच कदाचित सर्वोच्च न्यायालयाने आता या गोरक्षकांना नियंत्रणात आणण्याकरिता बडगा उगारला आहे. गोरक्षणाच्या नावावर होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्याच्या दृष्टीने सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाºयाची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोबतच गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्याकरिता कुठली पावले उचलली याचा अहवालही मागितला आहे. खरे तर देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची आहे. पण दुर्दैवाने त्यांनी या घटनांची पाहिजे तेवढ्या गांभीर्याने दखल न घेतल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयालाच या कामी पुढाकार घ्यावा लागला. आतातरी शासनाचे डोळे उघडतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. या देशातील गोरक्षक कधी नव्हे एवढे आक्रमक झाले आहेत. गोरक्षणाच्या नावावर निष्पाप लोकांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गेल्या तीन वर्षांतील घटना बघितल्या की हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका इसमास गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाने ठार केले होते. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाºया दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गाई चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यंत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. अलवरमध्ये काही लोक गाई घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. पण गोरक्षकांचा हा वाढता उन्माद थांबविण्याच्या दिशेने केंद्र अथवा संबंधित राज्य सरकारांनी कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. उलटपक्षी कुठल्याना कुठल्या पद्धतीने गोरक्षकांचेच लांगूलचालन करण्यात आले. झुंडशाहीत सद्सद्विवेकबुद्धी, कायदा पालन अशा गोष्टींना अजिबात थारा नसतो. तेथे असतो तो केवळ उन्माद. त्यामुळे अशी मानसिकता बाळगणा-यांना कठोर शासन हाच पर्याय असतो.