शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

झुंडशाही रोखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:25 IST

केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा

केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा ताकीद देऊन गोरक्षेच्या नावावरील हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही असे स्पष्ट बजावले. हे कमी होते की काय म्हणून सरसंघचालकांनीही त्यांना समज दिली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, असे या हैदोस घालणा-या गोरक्षकांना त्यांनी समजावून सांगितले. पण या दोघांच्याही आवाहनांचा फारसा काही परिणाम झाला नाही. त्यांना न जुमानता देशातील तथाकथित गोरक्षकांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या. त्यामुळेच कदाचित सर्वोच्च न्यायालयाने आता या गोरक्षकांना नियंत्रणात आणण्याकरिता बडगा उगारला आहे. गोरक्षणाच्या नावावर होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्याच्या दृष्टीने सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाºयाची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोबतच गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्याकरिता कुठली पावले उचलली याचा अहवालही मागितला आहे. खरे तर देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची आहे. पण दुर्दैवाने त्यांनी या घटनांची पाहिजे तेवढ्या गांभीर्याने दखल न घेतल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयालाच या कामी पुढाकार घ्यावा लागला. आतातरी शासनाचे डोळे उघडतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. या देशातील गोरक्षक कधी नव्हे एवढे आक्रमक झाले आहेत. गोरक्षणाच्या नावावर निष्पाप लोकांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गेल्या तीन वर्षांतील घटना बघितल्या की हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका इसमास गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाने ठार केले होते. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाºया दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गाई चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यंत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. अलवरमध्ये काही लोक गाई घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. पण गोरक्षकांचा हा वाढता उन्माद थांबविण्याच्या दिशेने केंद्र अथवा संबंधित राज्य सरकारांनी कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. उलटपक्षी कुठल्याना कुठल्या पद्धतीने गोरक्षकांचेच लांगूलचालन करण्यात आले. झुंडशाहीत सद्सद्विवेकबुद्धी, कायदा पालन अशा गोष्टींना अजिबात थारा नसतो. तेथे असतो तो केवळ उन्माद. त्यामुळे अशी मानसिकता बाळगणा-यांना कठोर शासन हाच पर्याय असतो.