शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejariwal: अरविंद केजरीवालांची ‘जादू’ दिल्लीबाहेर चालेल?; नरेंद्र मोदींविरोधात आव्हानात्मक चेहरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 06:43 IST

AAP Fights Against BJP: पंजाब, गोवा, उत्तराखंड या तीनही राज्यांत केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलबाबत मोठी उत्सुकता आहे. २०२२ पर्यंत ती टिकेल?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे गुजरात मॉडेल चालले. त्या मॉडेलने भाजपला दणक्यात बहुमत मिळवून दिले. त्याच धर्तीवर अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांचे ‘दिल्ली मॉडेल’ सध्या शांतपणे काम करते आहे. मोदी यांच्या करिश्म्याने भाजपला दोनदा बहुमत मिळवून दिले तसे केजरीवाल यांनीही मोदी-अमित शहा जोडीला दोनदा धूळ चारली. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत दिल्लीत केजरीवाल जिंकले. २०१४ मध्ये देशात मोदी लाट असताना २०१५ साली केजरीवाल यांनी भाजपला दिल्लीत जोरदार दणका दिलाच, शिवाय काँग्रेस पक्षही कोपऱ्यात ढकलला गेला. २०२० साली केजरीवाल यांनी केलेली विजयाची पुनरावृत्ती अभूतपूर्व अशी होती. एकेका राज्यात केजरीवाल यांनी भाजपचा वारू रोखला. २०१७ साली नितीशकुमार यांनीही भाजपचा अश्वमेध घोडा बिहारमध्ये रोखला; पण त्यासाठी त्यांना लालूंच्या राजदची मदत घ्यावी लागली. शिवाय अखेरीस नितीशच खुद्द  मोदी-शहा जोडीच्या आणि अरुण जेटलींच्या गळाला लागले.

भारतात नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना आव्हान देणे सोपे नाही हेच त्यामुळे समोर आले. विविध कारणांनी २०१४ पासून काँग्रेस बासनात गुंडाळली गेली आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचेसुद्धा मोदींना आव्हान वाटत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये भरघोस मतांनी निवडून आल्या; पण त्यांना सध्या तरी देशभर अपील नाही. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा प्रभाव मोदींची चिंता वाढविणारा आहे. ‘छोट्या केंद्रशासित प्रदेशाचा नेता’ म्हणून भाजप केजरीवाल यांना हिणवत असला तरी त्यांच्या दिल्ली मॉडेलने देशभर विशेषत: पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात बऱ्यापैकी कुतूहल निर्माण केले हे भाजपही ओळखून आहे. २०२२ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या राज्यात निवडणुका होत आहेत. आयआयटी पदवीधर असलेल्या केजरीवाल यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा २०१४ सालापासून लपून उघड दिसत आलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी ४५० च्या आसपास लोकसभा जागा लढविल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजप  दिल्लीबाहेरचा केजरीवाल यांचा उदय रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिल्लीत मोदींना केवळ त्यांचेच आव्हान आहे.

दिल्ली मॉडेल काय आहे? लोकसभा निवडणुकीत दिल्ली मॉडेल चालते हे वारंवार दिसून आले आहे; परंतु पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यांत केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलबाबत मोठी उत्सुकता  आहे. दिल्ली हे एक कॉस्मोपॉलीटन शहर आहे, देशभरातून लोक नोकऱ्या, व्यापार आणि पर्यटनासाठी या शहरात येतात. इथे स्थिरावतात. दिल्लीत केजरीवाल यांनी नेमके काय बदल घडविले, त्यांचा सामान्य माणसाला कोणता फायदा झाला, याच्या कहाण्या या लोकांमार्फत देशाच्या अन्य भागांत पोहोचतात. गेली सात वर्षे केजरीवाल कमी बोलायला शिकले आहेत. कामावर त्यांचा भर दिसतो.  नागरिकांना एकामागून एक सुविधा देण्यासाठी त्यांचे सरकार झटत  असते. केंद्रीय संस्था, पोलीस, भाजप, नायब राज्यपाल यांनी सारखे अडथळे आणूनही केजरीवाल यांनी आपले काम थांबविलेले नाही. केजरीवाल यांची मोहल्ला क्लिनिक्स, घरपोच सेवा तर जोरात आहेच, शिवाय सर्वांना मोफत पाणी, वीज आणि शिक्षण यामुळेही परिणाम झाला आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यांतील लोक काँग्रेस, भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना कंटाळले असून, त्यांना नवा चेहरा हवा आहे. हे वातावरण २०२२ सालापर्यंत कसे टिकते हे मात्र पाहावे लागेल.

कॅप्टन-भाजप : २०१७ चा गुप्त करार पंजाबात भरपूर फिरून माहिती जमवून भाजपसाठी सर्वेक्षण करणारे निवडणूक तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या हे केव्हाच लक्षात आले आहे की ‘आप’ त्याचे दोन प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि अकाली दलाच्या पुष्कळच पुढे आहे. खरे तर २०१७ सालीच ‘आप’ तेथे सरकार स्थापन करणार होते. अकाली दल भाजपला इन्कम्बन्सी घटक त्रास देत होता. राज्यात काँग्रेस निष्प्रभ होती. या टप्प्यावर केजरीवाल लोकांना भावले. निवडक मतदार संघांत काँग्रेसला काहीही करून साथ द्यायची असे अकाली भाजप युतीने ठरविले तेव्हाच्या  विरोधी मंडळींच्या बैठकीची माहिती प्रस्तुत लेखकाला होती. अरुण जेटली त्यावेळी पंजाबचे प्रभारी होते. झालेल्या समझौत्यात ते सामील होते. विरोधाभासाची गोष्ट म्हणजे जेटली यांना अमरिंदर सिंग यांना पाठिंबा द्यावा लागला होता. तीन वर्षांपूर्वी अमृतसर लोकसभा निवडणुकीत त्यांनी जेटलींना पाडले होते. २०१७ साली भाजपचे ऐतिहासिक नुकसान झाले. ११७ पैकी केवळ तीन जागा मिळाल्या. योजना सफल झाली. केजरीवाल यांची पीछेहाट झाली, कारण त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शेवटपर्यंत दिला नव्हता. इतरांनीही काही चुका केल्या. महत्त्वाच्या सीमावर्ती राज्यातल्या शांततेला आपमुळे धोका आहे, त्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत असे चित्रही रंगविले गेले. अमरिंदर सैन्य दलातले फौजी आहेत.  २०१७ मधले भाजपचे कर्ज फेडण्यासाठी ते उत्सुक असणारच. पुढे ते काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा