शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

दहा लाखच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 02:47 IST

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना मात्र बाजारभावानेच गॅसचे सिलींडर घ्यावे लागणार आहे. केन्द्र सरकारचा हा निर्णय म्हणजे देशातील अनुदान पर्वाच्या समाप्तीचा प्रारंभ होय, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली असली तरी ती खरी नाही. घासून गुळगुळीत झालेल्या संकल्पनेचा वापर करायचा तर समाजातील नाहीरे वर्गासाठी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून ज्या सवलती किंवा अनुदाने दिली जातात, ती होयरे वर्गातील लोकानी आपणहून नाकाराव्यात ही खरी यामागील भूमिका होती. अनुदानापोटी परस्पर बँकेत जमा होणारे अनुदान जे लोक नाकारु शकतात त्यांनी ते नाकारावे अशी केन्द्र सरकारची भूमिका होती. या भूमिकेचा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अनेकदा पुरस्कार केला आणि लोकाना जाहीर आवाहनही केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ५७.५ लाख ग्राहकांनी ‘गिव्ह इट अप’चा पर्याय स्वीकारला. देशातील एकूण गॅस ग्राहकांची १६.३५ कोटींची संख्या लक्षात घेता, अनुदान नाकारणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी भरते. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांचे प्रमाण तेरा टक्क््यांच्या घरात जाते. केन्द्राच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराचा म्हणजे आयकराचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाण तीन ते साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ सुमारे चार कोटी नागरिक आयकर भरतात. आज जरी सरकारने दहा लाखांची उत्पन्न मर्यादा निश्चित केली असली तरी यानंतर आयकर भरणाऱ्या साऱ्यांचेच अनुदान बंद केले जाऊ शकते. तसे न करता आजही सरकारने सारे काही नागरिकांच्या सद्सद्विवेकावर आणि प्रमाणिकपणावर सोडले आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांचे एकत्रित उत्पन्न वर्षाला दहा लाखांच्या वरती असेल त्यांनी आपणहून तसे जाहीर करायचे आहे. याचा अर्थ लोकांच्या विवेकाला केले गेलेले हे दुसरे आवाहन आहे. आपणहून अनुदान नाकारण्याच्या बाबतीतल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे तर दिसतेच आहे. आता दहा लाखांच्या मर्यादेमुळे आणखी २३ लाख लोक अनुदानरहित होतील. त्यातून सरकारचे किती कोटी वाचतील हा मु्द्दा येथे गौण आहे. एरवी देशभक्तीचे गोडवे गाणारे आणि देशासाठी बलिदान केलेल्यांच्या शपथा खाणारे लोक स्वत:वर इतका किरकोळ त्याग करण्याची वेळ आली की कसे मागे पाऊल टाकतात, हेच या प्रकरणात दिसून आले असून सरकार अनुदान देतेच आहे तर मग ते का सोडा अशी प्रवृत्तीच यात दिसून येते. त्यांच्या या प्रवृत्तीपायीच सरकार आता सक्तीवर उतरले असून जे आयकर भरतात वा भरु शकतात त्या साऱ्यांचेच अनुदान पुढील काळात बंद केले गेले तर जसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही तद्वतच संबंधितांनी तक्रार करण्याचेही काही कारण नाही.