शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 02:47 IST

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना मात्र बाजारभावानेच गॅसचे सिलींडर घ्यावे लागणार आहे. केन्द्र सरकारचा हा निर्णय म्हणजे देशातील अनुदान पर्वाच्या समाप्तीचा प्रारंभ होय, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली असली तरी ती खरी नाही. घासून गुळगुळीत झालेल्या संकल्पनेचा वापर करायचा तर समाजातील नाहीरे वर्गासाठी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून ज्या सवलती किंवा अनुदाने दिली जातात, ती होयरे वर्गातील लोकानी आपणहून नाकाराव्यात ही खरी यामागील भूमिका होती. अनुदानापोटी परस्पर बँकेत जमा होणारे अनुदान जे लोक नाकारु शकतात त्यांनी ते नाकारावे अशी केन्द्र सरकारची भूमिका होती. या भूमिकेचा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अनेकदा पुरस्कार केला आणि लोकाना जाहीर आवाहनही केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ५७.५ लाख ग्राहकांनी ‘गिव्ह इट अप’चा पर्याय स्वीकारला. देशातील एकूण गॅस ग्राहकांची १६.३५ कोटींची संख्या लक्षात घेता, अनुदान नाकारणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी भरते. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांचे प्रमाण तेरा टक्क््यांच्या घरात जाते. केन्द्राच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराचा म्हणजे आयकराचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाण तीन ते साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ सुमारे चार कोटी नागरिक आयकर भरतात. आज जरी सरकारने दहा लाखांची उत्पन्न मर्यादा निश्चित केली असली तरी यानंतर आयकर भरणाऱ्या साऱ्यांचेच अनुदान बंद केले जाऊ शकते. तसे न करता आजही सरकारने सारे काही नागरिकांच्या सद्सद्विवेकावर आणि प्रमाणिकपणावर सोडले आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांचे एकत्रित उत्पन्न वर्षाला दहा लाखांच्या वरती असेल त्यांनी आपणहून तसे जाहीर करायचे आहे. याचा अर्थ लोकांच्या विवेकाला केले गेलेले हे दुसरे आवाहन आहे. आपणहून अनुदान नाकारण्याच्या बाबतीतल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे तर दिसतेच आहे. आता दहा लाखांच्या मर्यादेमुळे आणखी २३ लाख लोक अनुदानरहित होतील. त्यातून सरकारचे किती कोटी वाचतील हा मु्द्दा येथे गौण आहे. एरवी देशभक्तीचे गोडवे गाणारे आणि देशासाठी बलिदान केलेल्यांच्या शपथा खाणारे लोक स्वत:वर इतका किरकोळ त्याग करण्याची वेळ आली की कसे मागे पाऊल टाकतात, हेच या प्रकरणात दिसून आले असून सरकार अनुदान देतेच आहे तर मग ते का सोडा अशी प्रवृत्तीच यात दिसून येते. त्यांच्या या प्रवृत्तीपायीच सरकार आता सक्तीवर उतरले असून जे आयकर भरतात वा भरु शकतात त्या साऱ्यांचेच अनुदान पुढील काळात बंद केले गेले तर जसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही तद्वतच संबंधितांनी तक्रार करण्याचेही काही कारण नाही.