शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

दहा लाखच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 02:47 IST

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे

इतके दिवस सरसकट सर्वांनाच घरगुती जळणाच्या गॅसच्या टाकीवर मिळणारे अनुदान यापुढे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या आत आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना मात्र बाजारभावानेच गॅसचे सिलींडर घ्यावे लागणार आहे. केन्द्र सरकारचा हा निर्णय म्हणजे देशातील अनुदान पर्वाच्या समाप्तीचा प्रारंभ होय, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली असली तरी ती खरी नाही. घासून गुळगुळीत झालेल्या संकल्पनेचा वापर करायचा तर समाजातील नाहीरे वर्गासाठी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून ज्या सवलती किंवा अनुदाने दिली जातात, ती होयरे वर्गातील लोकानी आपणहून नाकाराव्यात ही खरी यामागील भूमिका होती. अनुदानापोटी परस्पर बँकेत जमा होणारे अनुदान जे लोक नाकारु शकतात त्यांनी ते नाकारावे अशी केन्द्र सरकारची भूमिका होती. या भूमिकेचा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अनेकदा पुरस्कार केला आणि लोकाना जाहीर आवाहनही केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ५७.५ लाख ग्राहकांनी ‘गिव्ह इट अप’चा पर्याय स्वीकारला. देशातील एकूण गॅस ग्राहकांची १६.३५ कोटींची संख्या लक्षात घेता, अनुदान नाकारणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी भरते. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांचे प्रमाण तेरा टक्क््यांच्या घरात जाते. केन्द्राच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराचा म्हणजे आयकराचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाण तीन ते साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ सुमारे चार कोटी नागरिक आयकर भरतात. आज जरी सरकारने दहा लाखांची उत्पन्न मर्यादा निश्चित केली असली तरी यानंतर आयकर भरणाऱ्या साऱ्यांचेच अनुदान बंद केले जाऊ शकते. तसे न करता आजही सरकारने सारे काही नागरिकांच्या सद्सद्विवेकावर आणि प्रमाणिकपणावर सोडले आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांचे एकत्रित उत्पन्न वर्षाला दहा लाखांच्या वरती असेल त्यांनी आपणहून तसे जाहीर करायचे आहे. याचा अर्थ लोकांच्या विवेकाला केले गेलेले हे दुसरे आवाहन आहे. आपणहून अनुदान नाकारण्याच्या बाबतीतल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे तर दिसतेच आहे. आता दहा लाखांच्या मर्यादेमुळे आणखी २३ लाख लोक अनुदानरहित होतील. त्यातून सरकारचे किती कोटी वाचतील हा मु्द्दा येथे गौण आहे. एरवी देशभक्तीचे गोडवे गाणारे आणि देशासाठी बलिदान केलेल्यांच्या शपथा खाणारे लोक स्वत:वर इतका किरकोळ त्याग करण्याची वेळ आली की कसे मागे पाऊल टाकतात, हेच या प्रकरणात दिसून आले असून सरकार अनुदान देतेच आहे तर मग ते का सोडा अशी प्रवृत्तीच यात दिसून येते. त्यांच्या या प्रवृत्तीपायीच सरकार आता सक्तीवर उतरले असून जे आयकर भरतात वा भरु शकतात त्या साऱ्यांचेच अनुदान पुढील काळात बंद केले गेले तर जसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही तद्वतच संबंधितांनी तक्रार करण्याचेही काही कारण नाही.