शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

इतना सन्नाटा क्यों है भाई?

By राजा माने | Updated: April 16, 2019 04:47 IST

अभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच!

- राजा मानेअभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच! अभाअपा (अर्थात, अखिल भारतीय अजरामर पात्र संघटना) संघटनेचे सदस्यत्व केवळ कला क्षेत्रातील अजरामर पात्रांनाच मिळाले. परलोकीच्या या संघटनेने परग्रहावरील आमीर खान-राजू हिराणीच्या पीकेलासुद्धा संघटनेचे सदस्यत्व नाकारले होते. अशा संघटनेच्या सदस्यांनी भारतभूमीतील निवडणूक दिवाळसणाची पाहणी करण्यास जाण्याची मागणी मान्य होऊ नये, यासाठी नरदांनी भरपूर गेमा केल्या, काड्या केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट इंद्रदेवांनी अभाअपाची मागणी मान्य केली, पण सोबत गाइड म्हणून झेलेअण्णांना नेण्याचा जीआर काढला आणि अनंत माने यांच्या एक गाव बारा भानगडी, रामदार फुटाणे नानांच्या सामनामुळे झेलेअण्णांचा प्रोफाइल स्ट्राँग होताच, पण बाई वाड्यावर या... या डायलॉगमुळे झेलेअण्णाचा बायोडाटा उठून दिसला अन् इंद्रदेवांनी त्यांना नमो-रागा रण निरीक्षण मंडळाचे गाइड बनविले.मंडळाचे पहिले निरीक्षक ए.के. हंगल ‘शोले’चे इमाम साहेब व झेलेअण्णा मराठीभूमीत दाखल झाले. इमाम साहेब ठार आंधळेच असल्यामुळे त्यांच्या हातातील काठीचे टोक झेलेअण्णांच्या डाव्या हातात होते. अण्णा पुढे आणि इमाम साहेब काठी धरून मागे... मुंबापुरीसह खान्देशाची रपेट सुरू होती. डाव्या हातात काठीचे टोक आणि उजव्या हातात गळ्यात अडकविलेले मोबाइल घेऊन अण्णा इमाम साहेबांना खडान्खडा माहिती देत होते, ऐकवत होते. दिवसभर हा सिलसिला चालूच राहिला. इमाम साहेब मात्र गप्पच होते. त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता... अखेर वैतागून अण्णाच बोलले, ‘काय राव इमाम साहेब कुछ तो बोलो!’ त्यावर इमाम साहेब बोलते झाले, ‘भाई झेलेअण्णा, इतना सन्नाटा क्यों है भाई...’ हे शब्द कानावर पडताच अण्णा चक्क खेकसलेच ! सन्नाटा? इतना गोंधळ सुनाया अन् तुम बोलताय सन्नाटा! जळगावला वो कमलवालों का मारामारी, सुनाया, गिरीशभाऊ का अ‍ॅक्शन रोल बताया.

उदनयराजेंने निकाले हुए चित्र-विचित्र आवाज सुनाया, वो आझम खान का जयाप्रदा को बोला हुआ अनाब-शनाब बात सुनाया, शायर रामदासजीने रिपब्लिकन ऐक्य के वास्ते मंत्रिपद छोडने का किया हुआ वादा भी सुनाया... फिर भी ऐसे गोंधळ में तुम पूछताय, ‘सन्नाटा क्यों है भाई...’
हा संवाद सुरू असतानाच झेलेअण्णांना एक पक्ष कार्यालय दिसले. काही महिला कार्यकर्त्या कार्यालयातून बाहेर पडत होत्या. त्यांच्याशी संवाद साधावा, म्हणून अण्णांनी त्यांना थांबविले. सवयीप्रमाणे ते बोलते झाले, ‘बाई व्वा...’ (पुढचे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार तोच, आता इमाम साहेबांनीच झेलेअण्णांच्या तोंडावर आपला हात दाबून धरला अन् अनर्थ टळला). त्या दोघांना पाहून महिला कार्यकर्त्यांनी नमस्कार केला. काय मदत हवी काय, अशी विचारपूस केली. महिलेचा आवाज कानावर पडताच इमाम साहेब बोलते झाले... कौन बसंती? वो अहमद को समझाती क्यों नही... (आता मात्र झेलअण्णांचा हात इमाम साहेबांचा तोंडावर गेला आणि पुढचा डायलॉग तिथेच थांबला) अखेर अण्णांनी इमाम साहेबांना सन्मानपूर्वक परलोकी धाडले. निरोप घेताना, ते एवढेच म्हणाले, ... आयला इमामसाब, आता रिपोर्ट में सन्नाटा क्यों है भाई , असं मत लिखो..

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी