शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ?

By राजा माने | Updated: September 1, 2017 03:03 IST

सुशीलकुमार शिंदेंची राणे सोलापुरातील मेळाव्याला हजर राहतील अशी अपेक्षा फोल ठरली. शेवटी ‘राणेंनी भाजपात का जाऊ नये?’ या सवालाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीनेच घ्यावा...

सरला आठवडा पावसाच्या चर्चेचा होता. त्यामुळे नारायण राणे भाजपात जाणार हा विषयही मागे पडला. रविवारी सोलापुरात इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आ.प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय नेते मोहनप्रकाश यांच्या साक्षीने राज्यातील जवळजवळ सर्वच नेत्यांचा मोठा मेळावा घेतला. त्या मेळाव्याला नारायण राणे मात्र आले नाहीत. शनिवारी राणे येतीलच असा विश्वास सुशीलकुमारांनी व्यक्त केला होता. भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्वभूमीवर नारायणदादांचे न येणे तसे खटकणारे होते. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या सुशीलकुमारांनी ‘कात टाकावी’ असे मी ‘लोकमत’ आॅनलाईन आवृत्तीला काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्यावर राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘सुशीलकुमारांना का त्रास देताय?’ असा मिश्किल सवालही फोनवर केला होता. कोणी काहीही म्हणो, सुशीलकुमारांनी कात टाकली की नाही हे माहीत नाही पण त्यांनी काम मात्र सुरू केले. त्या कामाचा भाग म्हणूनच इंदिरा गांधी व वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा सोहळा थाटात पार पाडला, असे म्हणायला हरकत नाही. त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘नारायण राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये?’ हा सवाल मनोरंजक आणि विचार करायला भाग पाडणारा ठरतो. या सवालाचा अर्थ काय, राणेंनी भाजपमध्ये जावे की न जावे? ज्याला जो हवा तो अर्थ त्याने घ्यावा. पण सोलापुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसजनांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे अशीच परिस्थिती आहे.२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते हे आत्मविश्वास हरवून बसले आहेत. कुठलीही भूमिका नाही, दिशा नाही केवळ प्रत्येकाने आपल्या ‘गॉडफादर’च्या तोंडाकडे आशेने पाहत बसायचे! हे चित्र प्रत्येक जिल्ह्यात अनुभवायला मिळते. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यातील दोन्ही पक्षांचे गावपातळीवरील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख या भाजपच्या नेत्यांनी हीच बाब हेरली आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादीचे तथाकथित नेते गळाला लावले. भाजप गळ टाकत असताना काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील तथाकथित नेते काय करीत होते? सोलापूरसारख्या जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची सदस्य संख्या सत्ता मिळविण्यास पुरेशी असूनही सत्ता मात्र भाजपच्या हातात जातेच कशी? असेच प्रश्न राज्यातील सर्वच जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत आहेत. या पार्श्वभूमीवर राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये? या प्रश्नाला खूप महत्त्व येते. दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सर्व सत्तास्थाने काबीज करण्याचा सपाटा भाजपने लावला. तो लावत असताना प्रत्येक जिल्ह्यातील विरोधकांची पद्धतशीर नाकेबंदी करण्याची काळजीही त्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर सैरभैर झालेल्या जिल्हा पातळीवरील नेत्यांना आधार देण्याची जबाबदारी घ्यायला कोणीही समर्थपणे पुढे न आल्यामुळे भाजप प्रवेशाची लाट राज्यभर गतिमान होत आहे. राणे व त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र फक्त त्या लाटेचा नियम लावता येणार नाही. नारायणदादांचा मूळ पिंड हा शिवसैनिकाचा! तरीही काँग्रेस संस्कृतीची झूल पांघरुण ते सातत्याने आपली मूळ आक्रमकता दडवत आले. उद्धव ठाकरेंशी पंगा घेत त्यांनी सेना सोडली म्हणून त्यांच्या लेखी त्यांचा पहिला राजकीय शत्रू शिवसेना. सेनेच्या लेखी काँग्रेसपेक्षा राणे हाच त्यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू ! शत्रुत्वाच्या या गणितात आज भाजपच्या ‘शत्रू त्रैराशीका’त सेनेचा शत्रू तो आपला मित्र असे सूत्र मांडले जाणारच. त्या सूत्रानुसार आज काँग्रेसचे असले तरी राणे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना मित्र वाटणारच ! त्यांची मैत्री पक्षाच्या मुळावर येऊ नये म्हणून काँग्रेसने काय केले? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राणेंनाही सापडत नसावे. त्याचमुळे ‘राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये?’ या प्रश्नाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीने घ्यावा, अशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाGovernmentसरकार