शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

दहशतखोरांसमोर शांतीपाठ कशाला?

By admin | Updated: May 12, 2015 03:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त परिसराला दिलेल्या भेटीच्या ऐन मुहूर्तावर तेथील नक्षलवाद्यांनी २०० आदिवासी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त परिसराला दिलेल्या भेटीच्या ऐन मुहूर्तावर तेथील नक्षलवाद्यांनी २०० आदिवासी स्त्री-पुरुषांचे अपहरण करावे आणि त्यांना ओलीस ठेवावे ही गोष्ट, त्या राज्याचे मुख्यमंत्री रमणसिंग व त्यांच्या सरकारसह केंद्र सरकारच्याही संरक्षक यंत्रणांची नाचक्की करणारी आहे. पंतप्रधानांना आणा नाहीतर राष्ट्रपतींना, तुम्ही आमच्या कारवायांना पायबंद घालू शकत नाही हीच गोष्ट या कारवाईने नक्षलवाद्यांनी सरकारसह साऱ्यांना बजावली आहे. रमणसिंगांचे दिखावू सरकार आणि नक्षलवाद्यांची छत्तीसगडातील पैठ या गोष्टी गेली ३० वर्षे त्या राज्यात एकाचवेळी सुरू आहेत. सरकार आपल्या जागी बसलेले आणि नक्षली त्यांच्या अरण्यक्षेत्रात कार्यरत असलेले असे त्या राज्याचे या काळातले विभाजन आहे. पोलीस यंत्रणा फसल्या, लोकांच्या मदतीने केलेला सलवा जुडूमचा प्रयोग अपयशी झाला आणि सुरक्षा दलांच्या मोहिमांनाही कधी म्हणावे तसे यश आले नाही. बातम्या आल्या त्या फक्त सुरक्षा जवानांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी हौतात्म्याच्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आर्थिक मदतीच्या. लालकृष्ण अडवाणी हे केंद्रात गृहमंत्री असताना काही योजना आखल्या गेल्या. केंद्र व राज्ये यांच्या पातळीवर त्यानुसार संयुक्त हालचालीही होताना दिसल्या. त्यांच्या पश्चात सारे थांबले. पुढे पी. चिदंबरम केंद्रात गृहमंत्री असताना मात्र केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने नक्षल्यांच्या बीमोडाच्या जबर हालचाली केल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेही त्यावेळी त्यांना पाठबळ होते. त्या काळात नक्षल्यांचे अनेक पुढारी मारले गेले, अनेकजण जेरबंद झाले तर त्यांच्यातील अनेकांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्याकाळातल्या माओवाद्यांच्या माहितीपत्रकांमध्येही त्यांच्या चळवळीला ओहोटी लागली असल्याची व लोक त्यांच्यापासून दूर जाऊ लागले असल्याची त्यांनी दिलेली कबुली आली आहे. पुढे सुशीलकुमारांच्या कारकिर्दीतही या कारवाया सुरू राहिल्या. मात्र गेल्या वर्षभरातील राजनाथसिंहांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात त्या पार बासनात गुंडाळून ठेवल्या असाव्या असेच चित्र उभे राहिले. कोणत्याही हालचाली नाहीत, कारवाया नाहीत, कुणाला अटक नाही की कुणी मारले गेले नाही. पंतप्रधानांनी दंतेवाड्याला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत तेथे येणे हे खरेतर राजनाथसिंहांचे कर्तव्य होते. पण तेथे न येता ते अयोध्येला गेले व तेथे जाऊन ‘संसदेची मान्यता मिळाल्याखेरीज राम मंदिर होणे नाही’ हे सांगून परत दिल्लीला आले. देशाचा गृहमंत्री देशासमोरील एका गंभीर संकटाबाबत कितीसा संवेदनशील आहे हे सांगणारा हा निराशाजनक प्रकार आहे. छत्तीसगडच्या दंतेवाड्यासकटचा सगळा दक्षिण भाग आम्ही ‘मुक्त’ केला आहे व त्यावर आमचे राज्य आहे ही गोष्ट नक्षलवाद्यांचे नेते खुलेआम सांगतात आणि रमणसिंहांसह राजनाथसिंह ते मुकाट्याने ऐकून स्वस्थ राहतात. हे आताचे त्या भागाचे चित्र सरकारने जनतेला वाऱ्यावर व नक्षल्यांच्या मर्जीवर सोडले असल्याचे सांगणारे आहे. अन्यथा शेकडोंच्या संख्येने स्त्री-पुरुष पळविणे व ओलीस धरणे नक्षल्यांना शक्यच झाले नसते. भारताचा इराण वा मध्य आशिया झाला असावा असे वाटायला लावणारे हे भयकारी प्रकरण आहे. नक्षलवाद्यांच्या या पुंडाव्याची पंतप्रधानांनी आपल्या भाषणात घेतलेली दखलही निराश करणारी ठरली. दोनशेवर नागरिकांना ओलीस धरणाऱ्या बंडखोरांना कारवाईची कठोर भाषा ऐकविण्याऐवजी मोदींनी त्यांना शांततेचा पाठ ऐकविला. बंदुका टाका, नांगर हाती घ्या, हिंसा सोडा आणि शांततेच्या मार्गाने चला असा सत्ताधाऱ्यांचा उपदेश नक्षली बंडखोर गेली ५० वर्षे ऐकत आले आणि त्याचवेळी त्याचा उपहासही करीत राहिले. नक्षल्यांना शांततेची भाषा समजणारी नाही ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात अजून आली नसेल तर ती संबंधितांनी त्याला समजावली पाहिजे. दुर्दैवाने मोदी सरकारच्या रडारवर देशातला हिंसाचार नाही. त्यावर देशातल्या विरोधी पक्षांनी व विशेषत: काँग्रेस पक्षाने केलेली टीकाच तेवढी आहे. झालेच तर या सरकारची कार्यक्रमपत्रिका संघाने ठरविली असून, त्याच्या पक्षाचे लोक तेवढीच वेळोवेळी सांगत आले आहेत. राजनाथसिंहांना नसलेले राममंदिर दिसते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतरांना ख्रिश्चन आणि मुसलमान हे नक्षलवाद्यांपेक्षा जास्त मोठे शत्रू वाटतात. देश एकसंध व सुरक्षित राखायचा तर त्यासाठी त्यातील शस्त्राचाऱ्यांचे संकट प्रथम संपविले पाहिजे हे सरकारलाही समजणे गरजेचे आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा व महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यांत नक्षल्यांचे लष्करी तळ आहेत. तेथे त्यांचे शस्त्रसाठे व प्रशिक्षणाची केंद्रे आहेत. या दोन्ही सरकारातील अधिकाऱ्यांना त्यांची माहिती आहे व त्यांच्यातील काहींनी त्यांची हवाई पाहणीदेखील केली आहे. गुन्हेगार समोर आहेत फक्त ते सबळ असल्याने सरकार हतबल आहे. ही स्थिती बदलली नाही तर भारताचे रूपांतर पूर्वीच्या नेपाळात व आताच्या मध्य आशियात व्हायला वेळ लागणार नाही. हजारो पोलीस व जवान नुसतेच तैनात करणे आणि आदिवासींचे व त्यांच्या मुलामुलींचे होणारे अपहरण नुसतेच पाहणे ही बाब सरकार व समाज यांना खाली पहायला लावणारी आहे.