शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

लेख: म्हणून काँग्रेसने मुंबईत दिला स्वबळाचा नारा!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 17, 2025 10:32 IST

BMC Elections 2025: मुंबई महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबईलोकसभा आणि विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांसोबत काम करताना आम्हाला काय सहन करावे लागले हे आम्हालाच माहिती आहे. त्यामुळे आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी देखील मुंबईत स्वबळावर लढायला परवानगी दिल्याचे पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत जाहीर केले. महाविकास आघाडीमधील सगळ्यात मोठा पक्ष मुंबईतून तरी बाहेर पडला आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार, ही गोष्ट काँग्रेसला परवडणारी नाही. राज ठाकरे यांच्यासोबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी जाणे वेगळे. त्यासाठी एका व्यासपीठावर येणे वेगळे, आणि प्रचार सभेत मांडीला मांडी लावून बसणे वेगळे याचे राजकीय परिणाम काँग्रेसवाल्यांना चांगले माहिती आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या लोकसभेला निवडून आल्या. त्यावेळी 'मातोश्री'ने म्हणजेच ठाकरे कुटुंबाने आयुष्यात पहिल्यांदा काँग्रेसच्या पंजावर मतदान केले. नंतर उद्धव ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा, या भूमिकेतून विधानसभेच्या तिकिटांचे मुंबईत वाटप झाले. पण लोकसभा, विधानसभेला काँग्रेसची मतं उद्धवसेनेला मिळाली. मात्र, उद्धवसेनेची मतं काँग्रेसला मिळाली नाहीत, असा निष्कर्ष शनिवारच्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत काढला गेला. उद्धवसेनेसोबत समप्रमाणात वाटाघाटी होत नाहीत. मनसे, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्यांनाच जर जागा द्याव्या लागल्या तर मुंबईत पक्षाची वाढ तरी कशी होणार? आता तीन वर्षे आपल्या हातात आहेत. त्यामुळे मर्यादित विचार न करता काँग्रेसचे चिन्ह मुंबईतील २२७ वॉर्डामध्ये कसे जाईल, याची तयारी करावी, असा सूर नेत्यांनी शनिवारी लावला. काँग्रेस दरवेळी जास्त जागा मागते. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर करत नाही, असा आक्षेप शुक्रवारी उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी घेतला होता. त्यानंतर लगेचच हा निर्णय जाहीर झाला आहे. याचा अर्थ दानवे बोलले म्हणून हा निर्णय झाला, असा होत नाही. पण काँग्रेसला दरवेळी ठपका ठेवायला कोणीतरी हवे असते. एवढाच काय तो अर्थ.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत नाही याचा अर्थ मुंबईत काँग्रेसकडे सर्व २२७ वॉर्डामध्ये उमेदवार आहेत अशी स्थिती बिलकुल नाही. मात्र, पडद्याआड काँग्रेसने मुंबईत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू केली आहे. त्यांना काही जागा द्यायच्या, असेही अंतिम केले जात आहे. तिकिटासाठी सगळ्यात जास्त मारामारी भाजपमध्ये होईल. शिंदेसेनेकडे मुंबईत काही भागात गटप्रमुख देखील नाहीत. तरीही त्यांना किमान ७० जागा भाजपने द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे उद्धवसेनेतून आणि इतर पक्षातून १२५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक आले आहेत असा, त्यांचा दावा आहे. अशावेळी भाजप आणि शिंदेसेनेतील तिकीट न मिळालेले नाराज उमेदवार राज आणि उद्धवकडे जातील. उद्धव आणि राज दोघांकडे उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे त्यांच्या मारामारीत आपला मार्ग मोकळा होईल, असा दुर्दम्य आशावाद मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांना वाटत असावा. 

हा असा आशावाद आणि काँग्रेस नेत्यांचा टोकाचा आत्मविश्वास हा कधी कौतुकाचा तर अनेकदा चिंतेचा विषय ठरतो ते उगाच नाही. एक मात्र खरे, काँग्रेस २२७मतदारसंघात हात घेऊन गेल्यावर लोक हातात हात घेतील की हात दाखवतील हे काम टाटा प्रोजेक्टचे, बदनामी 'एमएमआरडीए'ची १२ जानेवारी २०२४ रोजी तब्बल १७,८४० कोटी रुपये खर्च करून शिवडी-पनवेल हा भारतातील सर्वात लांब समुद्री मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला करण्यात आला. त्याचे नाव 'अटल सेतू'. २१.८ किलोमीटर लांबीच्या या अटल सेतूचा तब्बल १६ किलोमीटरचा भाग समुद्रातून जातो. या पुलामुळे महाराष्ट्राचे व 'एमएमआरडीए'चे नाव देशभर झाले. मात्र, अवघ्या दोन वर्षांच्या आतच मुंबईकडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गाचे पुन्हा डांबरीकरण करण्याची वेळ आल्याने जे नाव सरकारने कमावले होते, त्यावर पाणी पडले. ज्या भागाचे डांबरीकरण दुसऱ्यांदा करण्याची वेळ आली आहे, ते काम टाटा प्रोजेक्ट यांना देण्यात आले होते. काम करताना त्यांनी खडी आणि बिट्युमाईन कोणाकडून घ्यायचे हे ठरवून दिले होते.

टाटा प्रोजेक्ट्सने हे काम त्या भागातल्या काही कॉन्ट्रॅक्टर्सना दिले. ज्यांना दिले ते लोक राजकीयदृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे काम होण्याशी मतलब म्हणून टाटाने ते काम त्यांना दिले असावे. प्रत्यक्षात त्याठिकाणी कमी दर्जाचे बिट्युमाईन वापरले गेले. यावर्षी पहिल्यांदा दिवाळीपर्यंत पावसाने मुक्काम ठोकला. परिणामी, तेवढ्या पट्ट्यात बिट्युमाईनमध्ये पाणी जमा झाले व गाड्या गेल्यामुळे खड्डे पडले. अनेकजण गाड्या बंद पडल्यानंतर जॅक लावून टायर बदलतात. येथे अशी कामे करू नये, असे नियम असताना पोलिसांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, जॅक लावल्यामुळे अनेक ठिकाणी आणखी मोठे खड्डे झाले.

'एमएमआरडीए'ने टाटा प्रोजेक्ट्सला एक कोटीचा दंड ठोकला. देखभालीचे काम आणखी एक वर्ष करण्याची सक्ती केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयआयटी पवईमथीला तज्ज्ञ प्रोफेसर धरमवीर सिंह यांची नेमणूक केली. या सगळ्यात बदनामी मात्र 'एमएमआरडीए'ची झाली. खरंतर ज्या कामामुळे सरकारची बदनामी होते, अशा कॉन्ट्रॅक्टरची आणि प्रकल्प घेणाऱ्या कंपन्यांची नावे सरकारने जाहीर केली पाहिजेत. एखादा रस्ता पूर्ण झाला की तो कोणी, कधी पूर्ण केला, त्याची देखभाल किती वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरकडे असेल, त्याच्या ऑफिसचा पत्ता, फोन नंबर या माहितीचे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावावेत, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. याचा विचार करायला हरकत नसावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Declares Solo Fight in Mumbai: A Strategic Shift

Web Summary : Congress declares it will contest Mumbai elections independently, prompted by concerns over alliance dynamics and growth limitations. The party is exploring alliances with smaller groups, while also criticizing the current state of infrastructure projects and calling for greater accountability from contractors.
टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी