शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

हा कांगावा कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 04:10 IST

‘काँग्रेससह देशातील अनेक विरोधी प्रादेशिक पक्ष माझ्या द्वेषाने पछाडले आहेत. त्यांचा रोष एकट्या माझ्यावर आहे.

‘काँग्रेससह देशातील अनेक विरोधी प्रादेशिक पक्ष माझ्या द्वेषाने पछाडले आहेत. त्यांचा रोष एकट्या माझ्यावर आहे. काय वाट्टेल ते करून मला सत्तेवरून घालविणे आणि केंद्राची सत्ता ताब्यात घेणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताजा कांगावा जेवढा हास्यास्पद तेवढाच लोकशाहीविषयीच्या त्यांच्या श्रद्धांचे उथळपण सांगणारा आहे. लोकशाही ही कोणा एका व्यक्तीचे राज्य नसून ते जनतेचे राज्य आहे. त्यात दर काही वर्षांनी लोक आपले सरकार निवडत असतात. जुन्या सरकारचा कारभार पसंत असेल तर ते त्याची फेरनिवड करतात, नपेक्षा त्याला पायउतार करून त्याजागी ते नव्या सरकारची स्थापना करतात. जगभरच्या लोकशाही राजवटीत याच मार्गाने जाणाऱ्या, निवडणूक लढविणा-या व बहुमतात येणाºया पक्षाला सत्ता देणारे आहेत. लोकशाहीत सत्तास्पर्धा व त्या स्पर्धेतील कमी अधिक आक्रमकता गृहितच धरावी अशी आहे. त्यामुळे गेली चार वर्षे सत्तेवर राहिलेल्या मोदींविरुद्ध देशातील काँग्रेससह अन्य पक्ष एकत्र येत असतील व त्यांना तोंड देण्याची तयारी करू लागले असतील तर तो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे ही बाब किमान पंतप्रधानांना समजली पाहिजे. त्याऐवजी ते माझ्या द्वेषाने पछाडले आहेत असे ते म्हणत असतील तर तो त्यांचा नुसता कांगावखोरपणाच नाही तर भयगंडही आहे. विरोधी पक्षांचा संघर्ष एकट्या मोदींशी नाही, तो त्यांच्या भारतीय जनता पक्षाशी व तो पक्ष ज्या संघ परिवाराच्या छायेत वावरणारा आहे त्या परिवाराशीही आहे. तथापि मोदी हे स्वत:ला पक्षाहून मोठे मानणारे नेते आहे. मोदी म्हणजेच भाजप व त्याचा परिवार अशी मानसिकता त्यांनी बनवून घेतली असेल तर त्यांना लोकशाहीतील निवडणुकीचे महात्म्य व मूल्य लक्षात घेणेही अवघड होणार आहे. निवडणुका हा एका नि:शस्त्र लढ्याचा प्रकार आहे. तो मतपरिवर्तनाच्या व लोकाराधनाच्या मार्गाने लढवायचा असतो. ही प्रक्रिया टीकेची व टीकेला दिल्या जाणाºया उत्तरांची आहे. तीत सरकारवर टीका असणार, प्रसंगी सप्रमाण केले जाणारे आरोप असणार आणि त्या साºयांना उत्तरेही मागितली जाणार. मोदींच्या सरकारने जनतेला दिलेले प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लक्ष रुपये जमा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नसेल तर त्याविषयी त्यांना जाब विचारला जाणार की नाही? नोटाबंदी केल्यामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल असे सांगणाºया मोदींच्या सरकारला हा पैसा तर बाहेर आणता आला नाहीच, उलट त्या प्रक्रियेत देशाचे दीडशे कोटी रुपये त्याने पाण्यात घातले. याच काळात विदेशात दडविला गेलेला म्हणून जो पैसा सांगितला गेला तोही या सरकारला देशात आणता आला नाही. देशाची अर्थव्यवस्था साडेसहा टक्क्यांच्या पुढचा विकासदर गाठू शकली नाही आणि त्यातल्या एकजात सर्व राष्ट्रीयीकृत बँका त्यांच्या थकबाकीपायी पार रसातळाला जाण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. यातल्या अनेक बँकांच्या संचालकांविरुद्ध व वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध मोदींच्याच सरकारला आता चौकशा लावाव्या लागल्या आहेत. गेल्या चार वर्षात देशाच्या सभोवती असलेले सगळेच शेजारी देश भारतापासून दूर गेले व चीन या भारताला पाण्यात पाहणाºया देशाच्या स्वाधीन झाले. काश्मीर शांत होत नाही आणि त्यातले सरकारही मोदींच्या पक्षाच्या मदतीने स्थापन झाल्यानंतरही सत्तारूढ राहू शकले नाही. देशात अल्पसंख्य धास्तावले आहे, दलितांच्या मनात अविश्वासाची भावना आहे आणि ‘भारत हा स्त्रियांसाठी सर्वात धोकादायक देश आहे’ हे नको तसे प्रशस्तीपत्र जागतिक संघटनांनी देशाला दिले आहे. मोदींच्या सरकारची चार वर्षातील कमाई ही आहे. तिला विरोधी पक्ष नावे ठेवीत असेल आणि त्या अपयशासाठी मोदींना जाब विचारीत असेल तर तो त्यांना लोकशाहीने दिलेला हक्क आहे हे मोदींना व त्यांच्या सहकाºयांना समजले पाहिजे. यात द्वेषाचा, तिरस्काराचा वा व्यक्तीवरील संतापाचा भाग नाही. तो साध्या लोकशाही प्रक्रियेचा अपरिहार्य परिणाम आहे. मात्र पक्षावरील टीका वा सरकारवरील आरोप माझ्यावरचे आरोप आहेत असे मोदी म्हणत असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत कांगावा समजावा असा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी