शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुलांच्या आत्महत्यांचा दोष एकट्या आई-बाबांच्या माथी का मारता?

By धर्मराज हल्लाळे | Updated: August 31, 2023 08:29 IST

परीक्षा आणि अभ्यासाचा ताण असह्य होऊन आत्महत्या करणारी मुले हे केवळ त्या मुलांच्या पालकांचे नव्हे, तर अख्ख्या व्यवस्थेचेच अपयश आहे. 

-धर्मराज हल्लाळे(वृत्तसंपादक, लोकमत, लातूर)

स्वप्नांच्या ओझ्याखाली मुलांना गुदमरून टाकणारी ‘कोटा फॅक्टरी’ असे म्हणता  म्हणता समाज आत्मपरीक्षण करायचे सोडून थेट फक्त  आई-वडिलांनाच  दोषी ठरवत सुटला तर तो आत्मघात ठरेल. कोट्यामध्ये  मागील आठ महिन्यांत २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. स्वत:ची अर्धवट स्वप्ने मुलांच्या माथी मारण्यासाठी पालक स्पर्धा करीत आहेत, अशी टीकाही सुरू झाली. हे सर्व आणखी काही दिवस चालेल. पुन्हा जैसे थे! ज्या  कुटुंबातील मुलाने आपले जीवन संपविले आहे, त्यांच्यासाठी मात्र  दु:खाचा डोंगर आजन्म उभा राहतो. विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार असा कोणताही घटक अपयशाने, चिंतेने स्वत:ला संपवीत असेल तर दोष कोण्या एका-दोघांचा नक्कीच नाही.

कोटा येथे दरवर्षी देशभरातून दोन लाख विद्यार्थी ‘नीट’-‘जेईई’च्या तयारीसाठी जातात. मागील आठ वर्षांत कोट्यातील ११० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कमी-अधिक फरकाने देशात आणि राज्यात अशा घटना एका मागून एक घडतात. कधी आई-वडिलांची, कधी मुलांची, तर बऱ्याचदा समाजानं निर्माण केलेली हट्टाग्रही मानसिकता आत्महत्यांचे कारण ठरते. उत्तीर्ण होणे, ‘नीट’-‘जेईई’मधून उत्कृष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळणे म्हणजेच यशस्वी होणे, हे समीकरण घातक आहे. 

बारावीनंतर ‘नीट’-‘जेईई’ची तयारी असो की, पदवीनंतरची स्पर्धा परीक्षा, सगळीकडे जीवघेणी स्पर्धा आणि तणाव आहेच. इतकेच नव्हे, नामांकित शाळेत प्रवेश मिळविणे हासुद्धा पालकांसाठी ताण-तणावाचा विषय आहे. त्यामुळे पालक सतत मुलांच्या पाठीशी असतात. बहुतांश आई-वडिलांकडून मुलांवर असणारा दबाव हा त्या मुलांच्या मानसिकतेला पेलला जाईल एवढाच असतो. काही अपवाद आहेत जिथे पालक चुकतात. कुठे थांबावे, त्यांना कळत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या स्वत:कडूनही अपेक्षा अवास्तव असतात. त्यांना स्वत:ची क्षमता आणि मर्यादा ओळखता येत नाही. त्याची सुरुवात आणि शेवट बारावीनंतर नव्हे, तर अगदी पहिल्या वर्गापासून होते. 

प्रवेश घ्यायचाय?- दे परीक्षा, शिष्यवृत्ती मिळवायचीय?-  दे परीक्षा. अमुक शाखा, विषयच, हवा आहे?- दाखव गुण. त्यातून पालकांना वाटणारी असुरक्षितता, मुलांचे भविष्य घडविण्याची घाई, यामुळे परीक्षा मुले देत असली, तरी अभ्यास जणू पालकच करीत असतात.. मुळात पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट राहिली नाही, तर ती शिकण्याची बाब झाली आहे. एकत्र कुटुंबात आजी-आजोबा, मामा, काका ही नाती घट्ट होती. आता एकल वा आई-बाबा पालक असलेल्यांचीच शाळा भरविणे गरजेचे आहे. काय बरोबर आहे, काय चुकते आहे  हे त्यांना तरी कसे  कळणार? वेळ निघून गेल्यावर बऱ्याच जणांना मुलांच्या बाबतीत आपण चुकलो, असा पश्चात्ताप होतो.

घटना घडली की, चार दिवस चर्चेचे असतात. तसे न घडता उपाय योजले पाहिजेत. शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस यातील बहुतेकांना मूल्य शिक्षणाचा विसर आहे. पालकांना पाल्यांसाठी गुण हवे आहेत. शाळा, कोचिंग क्लासेसला निकाल हवा आहे. तिथे मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला वेळ आहे तरी कोणाला? त्यावर काही तरी धोरण ठरले पाहिजे. दोन महिने परीक्षा बंद करून काही साध्य होणार नाही आणि तो मार्गही नाही. पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे भिंतीवर लिहून नव्हे, तर मनात रुजवून शिकवावे लागेल. अलीकडे उलट मूल ऐकतच नाही म्हणून आई-बाबा मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. प्रश्न अनेक आहेत. मुलांचे आई-बाबा अन् शिक्षकांशी नाते घट्ट करण्याची वेळ आहे. जो आत्महत्या करतो तो किमान काही दिवस आधी कोणाशी ना कोणाशी बोलतो, असे नव्वद टक्के प्रकरणांत सिद्ध झाले आहे. अशावेळी आई-बाबा, शिक्षक, मित्र, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ असे कोणीतरी त्याला भेटेल, ही व्यवस्था करावी लागेल.

टॅग्स :Studentविद्यार्थी