शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याला जाण्यास पर्यटक का घाबरतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2023 07:45 IST

ड्रग्जचा व्यापार, मद्यसेवन, गोव्यातील समुद्रात पर्यटकांचे होणारे मृत्यू इत्यादी गोष्टींमुळे गोवा बदनाम होत आहे. पर्यटनावरही त्याचा परिणाम होत आहे. 

सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा

ड्रग्जचा उघड व्यापार, त्यातून होणारे गुन्हे तसेच मद्याच्या अतिसेवनाने गोव्यात होणारे सेलिब्रेटींचेही मृत्यू यामुळे गोव्याचे पर्यटन बदनाम होत आहे. टिकटॉक स्टार सोनाली फोगोट हिच्या मृत्यूनंतर तर गोव्याच्या पर्यटनाची व ड्रग्ज व्यापाराची चर्चा मध्यंतरी देशभर झाली. गोव्यातील समुद्रात अजूनदेखील मोठ्या संख्येने पर्यटक बुडून मरण आहेत. एकाबाजूने पर्यटक गोव्यात येऊन आपल्या स्वैर वर्तनाने गोव्याला बदनाम करतात आणि दुसऱ्या बाजूने गोव्यातील काही दलाल किंवा भामटे पर्यटकांना लुबाडत असल्याने आता गोव्याचे पर्यटन नको रे बाबा असे पर्यटक म्हणू लागले आहेत. पर्यटकांना मारहाण करणे, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करणे, हॉटेलमधून त्यांचे सामान पळविणे असे गुन्हे अलीकडे वाढले आहेत. यामुळे पोलिस दलातही चिंता आहे.

जीवनात एकदा तरी गोवा पहायला हवा असे जगभरातील पर्यटकांना वाटते. काश्मीरप्रमाणेच गोव्याची ख्याती आहे. अर्थात गोव्यात बर्फ नसला किंवा प्रचंड थंडी नसली तरी, या राज्यातील सुखद हवामान पर्यटकांना भुरळ पाडते. या दिवसांत तर सिंगापूरच्याच हवामानासारखे गोव्याचे हवामान आहे. मात्र पर्यटक समुद्रात बुडाले, कळंगूटमध्ये पर्यटकांना खोलीत कोंडून लुबाडले अशा बातम्या पर्यटकांच्या मनाचा थरकाप उडवत आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी गोव्यातील एकूण पर्यटनाशी निगडीत सरकारची चिंता वाढली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे किंवा कळंगूटमधील बडे रेस्टॉरंट व्यवसायिक तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी सतत पर्यटकांच्या अशा प्रकारच्या असुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. गोव्यात येणारे पर्यटक दुचाकी किंवा चारचाकी वाहन भाड्याने घेतात व पूर्ण गोवा पिंजून काढतात. या पर्यटकांना वाहतूक पोलिस काही ना काही कारण देऊन पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावतात.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यांत नोंद असलेल्या वाहनांची क्रमांकपट्टी पाहून ते वाहन थांबविले जाते आणि मग दंड ठोठावला जातो. रोज अशा प्रकारे शंभरहून अधिक पर्यटकांना दंड भरावा लागत आहे. यामुळे गोव्यात फिरणे आता पर्यटकांना नकोसे वाटू लागले आहे. परराज्यांतून वार्षिक पन्नास लाखांहून अधिक देशी पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. अलीकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली होती की- परराज्यांतून गोव्यात येणाऱ्या वाहनांची कागदपत्रे एकदाच राज्याच्या सीमांवरील तपास नाक्यांवर तपासली जातील. त्यानंतर ही वाहने वाहतूक पोलिसांकडून वारंवार गोव्यात थांबवली जाणार नाहीत. प्रत्यक्षात तशी कोणतीही उपाययोजना अजून झालेली नाही.  

गोव्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनीही या विषयाबाबत एकदा पोलिस महासंचालकांशी चर्चा केली होती. आमदार मायकल लोबो यांनीही पर्यटकांचा हा छळ थांबवा अशी मागणी वारंवार केली आहे. पण, लुबाडणूक व सतावणूक थांबलेली नाही. गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांना पकडून दंड ठोठावला जातो. मात्र गरीब व मध्यमवर्गीय पर्यटकांना गोव्यातील महागड्या हॉटेलांमध्ये राहणे परवडत नाही. अलीकडे हॉटेल व्यावसायिक छुप्या पद्धतीने खोलीभाडे वाढवत आहेत. 

उत्तर गोव्यात जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. कळंगूट, कांदोळी, बागा, सिकेरी, वागातोर, आश्वे, मोरजी, हरमल, हणजुणा या किनाऱ्यांची नावे प्रसिद्ध आहेत. याच भागांमध्ये काही दलालांकडून पर्यटकांना मुली व  महिला पुरविण्याचे खोटे आश्वासन दिले जाते. त्यासाठी कितीही पैसे मोजण्यास तरुण पर्यटक तयार होतात. मग हे पैसे घेऊन दलाल पसार होतात. अशा प्रकारांवरूनही अलीकडे दलाल किंवा रेस्टॉरंट मालक व पर्यटक यांच्यात भांडणे होत आहेत. आम्हाला गोव्यात लुटले असे सांगण्यासाठी शेवटी पर्यटक पोलिसांकडे धाव घेतात. 

समुद्रस्नान करण्यासाठी पाण्यात उतरणारे पर्यटक आपले कपडे, मोबाइल वगैरे किनाऱ्यावर ठेवतात. अनेकदा अशा पर्यटकांचे मौल्यवान साहित्य चोरट्यांकडून पळविले जाते. गेल्या आठवड्यातली घटना ताजी आहे. कळंगूट येथील एका क्बलमध्ये चांगली सेवा पुरविली जाईल असे दोघा पर्यटकांना सांगून खोलीत डांबले गेले. त्या पर्यटकांची लुबाडणूक केली गेली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून एका दलालासह दोघा कामगारांना अटक केली. हे पर्यटक कर्नाटकमधून आले होते. 

काश्मीरमधून २८ व ३४ वर्षीय दोघे सख्खे भाऊ अलीकडेच गोव्यात आले होते. लग्न ठरल्यामुळे आनंदित होऊन हे दोघेजण आपल्या काही मित्रांसमवेत बॅचलर पार्टी करण्याच्या हेतूने आले होते. दोन्ही भावांचा गोव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. एरवी जीवरक्षक काही किनाऱ्यांवर असतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सगळीकडे प्रभावी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन