शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे? 

By किरण अग्रवाल | Updated: December 8, 2024 14:35 IST

सारांश : कौटुंबिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे सामाजिक चष्म्यातूनही बघण्याची गरज 

किरण अग्रवाल

नातेसंबंधातीलच गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढीस लागल्याने कुटुंब व समाज स्वास्थ्यावर ओरखडे उमटू पहात आहेत. कायद्याच्या धाकाबरोबरच सामाजिक भय देखील ओसरत चालल्याचाच तर हा परिपाक नाही ना, याचा विचार यानिमित्ताने होणे आवश्यक ठरावे. 

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एकीकडे जग मुठीत आल्याचे दिसत असताना, दुसरीकडे घरातलीच माणसे घरातल्यांपासून किंवा आप्त स्वकीयांपासून मात्र दुरावत चालल्याचे दर्शवून देणारी उदाहरणे कमी नाहीत. अश्यात हा दुरावा किंवा वितुष्ट गुन्हेगारीच्या पातळीवर पोहोचताना दिसतो तेव्हा भयचकित होणे स्वाभाविक ठरते. नातेसंबंधांना पणास लावणाऱ्या अशा घटना वाढीस लागल्या आहेत हे चिंताजनकच म्हणायला हवे. 

अपवाद हे कुठे वा कशात नसतात?, पण अपवादात्मक ठरणाऱ्या बाबीही जेव्हा मोठ्या संख्येने घडून येताना दिसतात तेव्हा काळजीचे ढग दाटून आल्याखेरीज राहत नाहीत, कारण समाजशास्त्र व मानसशास्त्र अशा दोन्ही अंगाने अशा घटनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. व्यक्तिगत कारणातून या अशा घटना घडत असल्या तरी समाज स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत असतो, आणि म्हणूनच केवळ अपवाद म्हणून त्याकडे न पाहता किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता कौटुंबिक व सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याच्या संदर्भाने बघितले जाणे गरजेचे ठरावे. 

अनैतिक संबंधातून होणारे खून खराबे हा काही नवीन विषय नाही. दोनच दिवसांपूर्वी अंमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथेही असाच एक प्रकार घडून पत्नीसह प्रियकराला अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथेही प्रेम प्रकरणातून प्रेयसीनेच प्रियकराचा खून केल्याची घटना समोर आली. 

अशा काही घटनांमध्ये लहान मुलांचेही हकनाक बळी जात असल्याचे लपून राहिलेले नाही. प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याच्या प्रकारातून एरंडोल तालुक्यातील विखरणच्या एका प्रियकराला अलीकडेच जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. इतरही अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. तात्पर्य इतकेच की, कायदा कायद्याचे काम करीत आहे; संबंधितांना शिक्षाही होत आहे परंतु कुटुंब व्यवस्था व समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत का? सामाजिक भय व संस्कारांची वीण कुठे उसवत चालली आहे का? याचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. 

विशेष म्हणजे, जराशा अपयशातून किंवा मनाविरुद्ध घडलेल्या घटनेतून विचलित होऊन स्वतःच्याच जीवाचे बरेवाईट करून घेण्याचे आत्मघाती प्रकारही वाढीस लागले आहेत. कमजोर मने त्यात लवकर बळी पडतात. गेल्या महिन्याच्या अखेरीस जळगावच्या व्यंकटेशनगरात कुटुंबीय एका अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले असता एका भगिनीने आपल्या अवघ्या आठ वर्षीय मुलीसह गळफास घेत स्वतःलाही संपविल्याची घटना उघडकीस आली, तर पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना धुळ्याच्या देवपूरमध्ये नोंदविली गेली. विभक्त राहणाऱ्या पत्नीवर संतापातून धारदार शस्त्राने वार करणाऱ्या व भांडण सोडवण्यास आलेल्या मुलाला जखमी करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील सूनसगावच्या एका व्यक्तीवरही अलिडेच गुन्हा गुदरला गेला आहे. अशाही घटनांची यादी मोठी आहे. तेव्हा कुटुंबात व समाजात वडीलकीच्या नात्याने आणि अधिकाराने धीर, आधार देणारी किंवा समजूत घालणारी व्यवस्था लयास चालली आहे का? याचा यानिमित्ताने विचार व्हायला हवा. 

वैषम्य याचे, की पद, पैसा व प्रतिष्ठा याच्यामागे इतके काही लागले जाते की विवेक बाजूला पडतो. कुणी भंगाराच्या पाईप चोरीत अडकतो, तर कुणी निवडणुकीत सहानुभूतीसाठी स्वतःच स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणताना तपासात निष्पन्न होतो. काय चालले आहे हे? भुसावळमधील एका घरफोडीच्या प्रकरणात एक जावईच निघाला आरोपी. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तर वाढतच आहेत. पोलीस दप्तरी न नोंदविली जाणारी अशी प्रकरणे मोठ्या संख्येत आहेत. 'कुंपणानेच शेत खाल्ल्या'ची प्रकरणेही कमी नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी 'फेमीसाईड इन 2023' असा एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी जगभरात प्रतिदिनी 140 महिलांची कुटुंबीयांकडूनच हत्या केली गेल्याचे म्हटले आहे. हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असावा,  कारण अनेक देशांनी यासंबंधीची माहितीच पुरविलेली नव्हती. डोके चक्रावणारी ही माहिती आहे. त्यामुळेच या साऱ्या प्रकारांकडे केवळ गुन्हेगारीच्या नव्हे, तर सामाजिक चष्म्यातून बघण्याची व नैतिक दायित्व निभावण्याची खरी गरज आहे. 

सारांशात, नातेसंबंधांतील विश्वासाचे व परस्परांबद्दलच्या आदराचे बंध कमकुवत होत चालल्यामुळे की काय, कौटुंबिक हिंसेच्या घटना वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे अति 'सोशल' झाल्याच्या गमजा मारणाऱ्या समाजधुरीणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवायला हवे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप