शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

का नाराज आहेत कर्मचारी सरकारवर?

By admin | Updated: May 18, 2015 00:16 IST

गेले काही दिवस शासनाच्या एका निर्णयामुळे अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवीन भरती किंवा पदोन्नतीने बदली करताना ती चक्राकार

यदू जोशी -गेले काही दिवस शासनाच्या एका निर्णयामुळे अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवीन भरती किंवा पदोन्नतीने बदली करताना ती चक्राकार पद्धतीने करण्याचे नवे धोरण देवेंद्र फडणवीस सरकारने आणले आहे. त्यानुसार आधी नागपूर विभागातील, मग मराठवाडा, नंतर अमरावती, त्यानंतर नाशिक, पुणे, कोकण या क्रमाने पदे भरली जातील. विदर्भ, मराठवाड्यात पदांचा बॅकलॉग राहू नये हा यामागील उद्देश असला तरी त्याला अधिकाऱ्यांच्या संघटनेने तीव्र विरोध केला आहे. वर्षानुवर्षे मुंबई, पुणे, ठाण्यात ठाण मांडून बसलेल्यांना मागास भागात जावे लागणार असल्याने अस्वस्थता आली आहे. विदर्भातच पाठवताहेत ना, पाकिस्तान, अफगाणिस्तानात तर नाही ना! अधिकाऱ्यांच्या संघटनेचे किती पदाधिकारी किती काळ मागास भागांमध्ये होते याचे उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे देण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी प्रादेशिक वादात पडू नये, अशी अपेक्षा आहे. त्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याची हमी घेतली पाहिजे. दुर्गम गडचिरोली, मेळघाट, नंदुरबारच्या आदिवासी पाड्यापर्यंत आणि तळकोकणातल्या खेड्यापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी, विकासाची कामे करण्यासाठी कर्मचारी/अधिकारी राबतात. ऊनपावसात कोरड्या कागदपत्रांचा संसार मांडावा लागतो. कार्पोरेट आणि वायफायच्या दुनियेपासून ते कोसो दूर असतात. हयातभर इमानेइतबारे नोकरी करून समाधानाने निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी दुसरेही चित्र आहेच. सरकारदरबारी पैसा वा ओळखीशिवाय कामे होत नाहीत, अशी आम धारणा आहे. ‘सरकारी काम, सहा महिने थांब’, असे म्हटले जाते. ‘पाहून सांगतो आणि सांगून पाहतो’ या न्यायाने नोकरशाही चालते. वरून खालपर्यंत जबाबदारी ढकलण्यावर भर असतो. टेबलखालून दिल्याशिवाय काम होते असे राज्यातील कार्यालय शोधून सापडणे कठीण. सरकारी कर्मचाऱ्यांना खुर्च्या तोडण्याचे पगार मिळतात, अशीही आम धारणा आहे. प्रशासनाची ही खालावलेली प्रतिमा उंचावण्याचे काम जाणीवपूर्वक झाले तर पारदर्शक व गतिमान कारभाराचे ध्येय गाठता येईल. प्रशासन पारदर्शक करण्यासाठी माहिती अधिकाराच्या कायद्याचा मोठा उपयोग झाला आहे. आता हा कारभार गतिमान करण्यासाठी कर्मचारी/अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित करणारा सेवा हमी कायदा आणला गेला आहे. त्यामुळे ‘सरकारी काम सहा महिने थांब’ ही प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, हे उघड आहे. एकीकडे असे उत्तरदायित्व ठरवतानाच मंत्रालयातील बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून फडणवीस यांनी विविध खात्यांचे सचिव आणि विभागप्रमुखांवर मोठा विश्वासही टाकला आहे. आपल्या काही सहकारी मंत्र्यांची नाराजी ओढवून घेत त्यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी कुठल्याही सरकारने हे केलेले नव्हते. मंत्रालयात यापूर्वी बदल्यांसाठी होणाऱ्या ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांचे मात्र विकेंद्रीकरण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि नोकरशाही यांच्यात याहीपूर्वी अनेकदा सुप्त संघर्ष झाला पण तुटण्याइतपत कधीही ताणले गेले नाही. याचे भान दोन्ही बाजूंनी ठेवणे आवश्यक आहे. राज्यात सध्या ऊठसूट निलंबनाचे प्रकार घडत आहेत. इतकी वर्षे विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते थोडे काही झाले की निलंबनाची मागणी करायचे. आता तेच नेते मंत्री झाल्याने निलंबनाची हौस भागवून घेत आहेत. मात्र, भावनेच्या भरात निलंबित केले ते दोषी नव्हतेच असे थोडी चौकशी केल्यानंतर समोर येत असल्याने सरकार तोंडघशी पडत असून, निलंबन न करण्याची वा केलेले निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढवत आहे. त्यातून प्रशासन व मंत्र्यांमध्ये छुपा संघर्ष घडत आहे. वकील हे न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अधिक जबाबदारीने आणि संतुलन ठेवणे अपेक्षित असते. आता न्यायाधीशाच्या भूमिकेत आलेल्या मंत्र्यांनी हे भान बाळगले तर हा संघर्ष टाळता येईल. बदल्यांमध्ये पैसे खाल्ल्याच्या तक्रारी आल्या तर गाठ माझ्याशी आहे, असा दम सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत पारदर्शकतेचे बांधकाम केले. ग्रामविकास आणि महिला बालकल्याण विभागात अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनीच दिलेल्या पर्यायानुसार बदल्या करण्याचे धोरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगीकारले आहे. पण चक्राकार पद्धतीने बदल्या करण्याच्या शासनाच्या नव्या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण आहे.