शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

छी थू कोणाची?

By admin | Updated: April 20, 2016 02:54 IST

विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे

विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे. आधी त्यांचे पारपत्र रद्द करणे आणि आता असे वॉरन्ट काढणे यात भारताच्या या मद्य सम्राटाची आणि एका धनाढ्य गुलछबू उद्योगपतीची आंतराराष्ट्रीय पातळीवर चांगलीच छी थू झाल्याचेही अनेकाना वाटू लागले आहे. परंतु प्रत्यक्षात ही छी थू त्यांची नव्हे तर संपूर्ण देशाची झाली आहे, होत आहे आणि मल्ल्यांचे किमान प्रस्तुत प्रकरणातील पूर्वचरित्र लक्षात घेता यापुढेही होत राहाणार आहे. मल्ल्या कोणी एक साधे उद्योजक नव्हते. आता त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या बव्हंशी राजकीय पक्षांच्याच कृपेने ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना विदेश मंत्रालयाने राजनैतिक पारपत्र जारी केले होते. असे पारपत्र धारण करणाऱ्याला परदेशात ज्या बहुविध सवलती देय असतात त्यांचा आजवर ते उपभोग घेत आले आहेत. साहजिकच भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राने ज्या व्यक्तीला राजनैतिक पारपत्र बहाल केलेले असते, तीच व्यक्ती जेव्हां तेच राष्ट्र ‘भगोडा’ म्हणून जाहीर करते तेव्हां त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या व्यक्तीचीच नव्हे तर संबंधित राष्ट्राचीही मोठी मानहानी होत असते. आता तर त्याच्याही पुढची पायरी गाठताना त्यांच्या विरुद्ध चक्क पकड वॉरन्टच जारी केले गेले आहे. पण त्यातूनही नेमके काय साध्य होणार? मल्ल्या राजरोसपणे भारताचा किनारा सोडून इंग्लंडात गेले आहेत असे म्हणतात. तिथे जाऊन भारताचा अगदी केन्द्रीय गृहमंत्रीदेखील मल्ल्यांना बेड्या ठोकून भारतात आणू शकत नाही. त्यासाठी आधी इंटरपोलमार्फत ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करावी लागेल. ती जारी केल्यानंतर मल्ल्या खरोखरीच इंग्लंडमध्ये वा अन्य कोणत्याही देशात असल्याचे आढळून आले तर त्या देशाची मनधरणी करावी लागेल. अशा मनधरणीने संबंधित राष्ट्राचे मन वळले जाईलच याची पुन्हा शाश्वती नाही. कॅसेटकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशनकुमार खून प्रकरणातील प्रमुख संशयित संगीतकार नदीम शेख इतकी वर्षे लोटूनही अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही हे येथे लक्षात घ्यावयाचे.