शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

छी थू कोणाची?

By admin | Updated: April 20, 2016 02:54 IST

विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे

विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे. आधी त्यांचे पारपत्र रद्द करणे आणि आता असे वॉरन्ट काढणे यात भारताच्या या मद्य सम्राटाची आणि एका धनाढ्य गुलछबू उद्योगपतीची आंतराराष्ट्रीय पातळीवर चांगलीच छी थू झाल्याचेही अनेकाना वाटू लागले आहे. परंतु प्रत्यक्षात ही छी थू त्यांची नव्हे तर संपूर्ण देशाची झाली आहे, होत आहे आणि मल्ल्यांचे किमान प्रस्तुत प्रकरणातील पूर्वचरित्र लक्षात घेता यापुढेही होत राहाणार आहे. मल्ल्या कोणी एक साधे उद्योजक नव्हते. आता त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या बव्हंशी राजकीय पक्षांच्याच कृपेने ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना विदेश मंत्रालयाने राजनैतिक पारपत्र जारी केले होते. असे पारपत्र धारण करणाऱ्याला परदेशात ज्या बहुविध सवलती देय असतात त्यांचा आजवर ते उपभोग घेत आले आहेत. साहजिकच भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राने ज्या व्यक्तीला राजनैतिक पारपत्र बहाल केलेले असते, तीच व्यक्ती जेव्हां तेच राष्ट्र ‘भगोडा’ म्हणून जाहीर करते तेव्हां त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या व्यक्तीचीच नव्हे तर संबंधित राष्ट्राचीही मोठी मानहानी होत असते. आता तर त्याच्याही पुढची पायरी गाठताना त्यांच्या विरुद्ध चक्क पकड वॉरन्टच जारी केले गेले आहे. पण त्यातूनही नेमके काय साध्य होणार? मल्ल्या राजरोसपणे भारताचा किनारा सोडून इंग्लंडात गेले आहेत असे म्हणतात. तिथे जाऊन भारताचा अगदी केन्द्रीय गृहमंत्रीदेखील मल्ल्यांना बेड्या ठोकून भारतात आणू शकत नाही. त्यासाठी आधी इंटरपोलमार्फत ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करावी लागेल. ती जारी केल्यानंतर मल्ल्या खरोखरीच इंग्लंडमध्ये वा अन्य कोणत्याही देशात असल्याचे आढळून आले तर त्या देशाची मनधरणी करावी लागेल. अशा मनधरणीने संबंधित राष्ट्राचे मन वळले जाईलच याची पुन्हा शाश्वती नाही. कॅसेटकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशनकुमार खून प्रकरणातील प्रमुख संशयित संगीतकार नदीम शेख इतकी वर्षे लोटूनही अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही हे येथे लक्षात घ्यावयाचे.