शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संसार उघडा पडलेल्यांचे अश्रू पुसायला आहे कोण..?

By किरण अग्रवाल | Updated: July 23, 2022 11:50 IST

तापाने फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पुरात शिरलेला असाहाय बाप दिसतो. पण, अपवाद वगळता चिखल तुडवणारे लोकप्रतिनिधी मात्र नजरेस पडत नाहीत.

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

राज्याच्या काही भागात गेल्या आठवड्यात संततधार पावसाने दाणादाण उडविली. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला व नदीकाठच्या रहिवाशांचा संसार उघडा पडला. आकाशातून पावसाच्या धारा आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. वस्तीमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. शेतशिवारात पावसाचे पाणी तुंबल्याने जमिनीतून डोके वर काढू पाहणारी पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली. अशा स्थितीत सरकार असले तरी, पालक प्रतिनिधींअभावी स्थानिक पातळीवर ते दिसत नाही; त्यामुळे अश्रू कोण पुसणार, असा प्रश्न आहे. 

मुंबईसह राज्याच्याही विविध भागात गेल्या सुमारे आठवडाभर संततधार सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. म्हणायला हा पाऊस बळीराजाला सुखावणारा आहे. परंतु काही ठिकाणी तो थांबायचे नाव घेत नसल्याने पेरणी वाया जाण्याची चिंता निर्माण झाली आहे. शेतात पावसाचे तळे साचल्याने अंकुरित झालेली पिके कुजण्याची भीती आहे. काही ठिकाणी तर शेतजमीनच खरडून गेल्याने आता काय करायचे, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. विशेषत: विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यात नद्यांना आलेल्या पुराचा फटका बसला आहे. 

नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातही मोठा पाऊस झाला. तेथे गोदावरी नदीला येणारा पूर पुढे जायकवाडीत पोहोचेपर्यंत रस्त्यातील अनेक गावांना प्रभावित करीत असतो. कोकण व कोल्हापूर परिसरातही काही गावांना मोठा फटका बसून गेला आहे, तर मराठवाड्यातही काही भागात पूरस्थितीने बरेच नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात १०० पेक्षा अधिक बळी गेले असून, २७५ पेक्षा अधिक गावांना फटका बसला आहे. या स्थितीत हादरलेल्या व भेदरलेल्या नागरिकांना दिलासा द्यायचा तर सरकार जागेवर आहे कुठे?

आता पूरपाणी ओसरत असले तरी यानंतर उद्भवणाऱ्या रोगराईचा प्रश्न आ-वासून समोर आहे. आताच ‘व्हायरल’मुळे दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांमध्ये पुराचे पाणी असल्याने यापुढील काळात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे अवघड बनले आहे.  ओबीसी आरक्षणाच्या विषयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबलेल्या असल्याने काही ठिकाणी नगरसेवक वा जिल्हा परिषद सदस्यही नाहीत. त्यामुळे नागरिक वाऱ्यावर सुटल्यासारखी स्थिती आहे. 

जवळपास बहुतेक रस्त्यांची वाट लागली असून काँक्रीट व डांबरातील पितळ उघडे पडले आहे. शेतात नेऊन सोडणाऱ्या शिवार रस्त्यांचे सोडाच, परंतु महामार्गांवरही जणू चंद्रावरची विवरे दिसू लागली आहेत. यावर होणारे अपघात नजरेस पडतात, परंतु वाहनधारकांना जे मान, पाठ व मणक्यांचे आजार जडत आहेत ते कसे दिसून येणार?

अशा स्थितीत यंत्रणा आपले कर्तव्य बजावतातच; परंतु तातडीच्या उपाययोजनांसाठी जी सरकार नामक व्यवस्था असायला हवी असते, ती मात्र दिसत नाही. निसर्गाने नागविलेल्या प्रत्येकाचेच डोळे सरकारकडून पुसले जातात, असे नाही. परंतु अशावेळी पालक प्रतिनिधी घटनास्थळी भेट आणि दिलासा देतात. त्यातून जखमांचे व्रण काहीसे हलके होण्यास निश्चितच मदत होते. आजघडीला तेच होताना दिसत नाही. तापाने फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पुरात शिरलेला असहाय बाप नजरेस पडतो आहे. पण, अपवाद वगळता लोकप्रतिनिधी चिखल तुडवताना व समस्या जाणून घेताना नजरेस पडत नाहीत. नाही म्हणायला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काही दौरे केलेतही. पण, त्यांच्याखेरीज मंत्रिमंडळच नसल्याने सरकार दिसत नाही. इतर साऱ्याच लोकप्रतिनिधींचेही लक्ष राजकीय उलथापालथीशी संबंधित कोर्टाच्या निकालाकडे व मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. अशा स्थितीत समस्याग्रस्तांनी कुणाकडे अपेक्षेने बघायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. kiran.agrawal@lokmat.com 

टॅग्स :Rainपाऊस