शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

श्रेष्ठ कोण? संविधान की...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 06:35 IST

राज्य, धर्म, परंपरा आणि कुटुंब यांंच्या कालबाह्य बंधनांतून व्यक्तीला स्वतंत्र करू शकणारे केंद्र सर्वोच्च न्यायालय हेच आहे. संविधानाने व्यक्तींना मूलभूत अधिकार दिले आहेत.

सुरेश द्वादशीवार, (संपादक, नागपूर)राज्य, धर्म, परंपरा आणि कुटुंब यांंच्या कालबाह्य बंधनांतून व्यक्तीला स्वतंत्र करू शकणारे केंद्र सर्वोच्च न्यायालय हेच आहे. संविधानाने व्यक्तींना मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यांचा संकोच करण्याचा अधिकार दुसºया कुणालाही नाही. या अधिकारांत धर्म स्वातंत्र्याचा व हवा तो धर्म निवडण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला हवा तो आयुष्याचा जोडीदार निवडून घेण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. हा अधिकार आणि धर्मपरंपरेने लादलेली कालबाह्य बंधने यातून निर्माण झालेली तेढ ज्या दुर्दैवी मुलीच्या वाट्याला आली तिचे नाव अखिला अशोकन. २४ वर्षे वयाची अखिला मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असून सालेम या शहरातील महाविद्यालयात इंटर्नशिप करीत असतानाच तिने शफिन जेहान या मुसलमान मुलाशी प्रेमविवाह केला. हा विवाह ते दोघेही वयात आल्यानंतर व सज्ञान झाल्यानंतर म्हणजे नागरिकत्वाचे पूर्ण अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी केला आहे. या विवाहाला तेथील धर्मश्रद्धांच्या संघटनांनी आणि अखिलाच्या कुटुंबाने आक्षेप घेतला व त्याविरुद्ध केरळच्या उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. अलीकडे बदनाम झालेल्या ‘लव्ह जिहाद’चा हा परिणाम असून त्यात अखिला फसवली गेली आहे अशी मांडणी या लोकांनी न्यायालयासमोर केली. आश्चर्य याचे की सरकारी वकिलांनीही अखिलाच्या बाजूने वा तिला तिचा विवाहविषयक अधिकार आपल्या मर्जीनुसार वापरता येत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले नाही. केरळच्या न्यायमूर्तींनीही अखिलाचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. या काळात अखिला तिच्या आईवडिलांच्या घरात तिच्या इच्छेविरुद्ध बंदिस्त राहिली. केरळच्या उच्च न्यायालयाने तो विवाहच मग रद्द ठरविला. कायदा, घटना व मूलभूत अधिकार याहूनही परंपरा, धर्मनियम आणि परंपरा यावरच त्या न्यायालयाने भर दिलेला दिसला. पुढे ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले. तेव्हाही अखिलाचे म्हणणे न ऐकण्याची सूचना नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या वतीने देशाच्या अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरलने त्या न्यायालयाला केली. मात्र सरकारी वकिलाचे म्हणणे बाजूला सारून त्या न्यायासनाने अखिलाचे म्हणणे सोमवारी ऐकून घेतले. त्या मुलीनेही आपले म्हणणे अस्खलितपणे व शांतपणे न्यायासनाला ऐकवून त्याच्याकडे स्वत:च्या स्वातंत्र्याची मागणी केली. आपण आपले लग्न आपल्या मर्जीने केले आहे. ते कुणाच्याही जरबेने वा फसवणुकीने झाले नाही. हा लव्ह जिहादचा नसून शुद्ध प्रेमाचा निर्णय असल्याचे ती न्यायासनासमोर म्हणाली. न्यायालयाने तिचे म्हणणे ग्राह्य मानून तिला तिच्या वडिलांच्या बंदिस्त घरात न पाठवता तिच्या कॉलेजच्या होस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला. ती होस्टेलमध्ये असताना त्याच्या अधिकारी वॉर्डन महिलेने तिचे रक्षण करावे अशी आज्ञाही न्यायालयाने दिली. तथापि हा न्याय अजून निम्माच राहिला आहे. न्यायासनाने अखिलाची सुटका केली असली तरी केरळच्या उच्च न्यायालयाचा अखिलाचे लग्न अवैध ठरविणारा निर्णय अजून फिरविला नाही. त्याआधी केरळात खरोखरी अशी सक्तीची धर्मांतरे होतात काय याचा छडा लावण्याची आज्ञा त्याने एन.आय.ए.ला केली. या तपासांती येणाºया अहवालाच्या आधारे न्यायासन पुढचा निर्णय करणार आहे. हा निर्णय जानेवारीच्या तिसºया आठवड्यात येईपर्यंत अखिला व जेहान यांचे वैवाहिक जीवन ‘थांबविले’ जाणार आहे. या प्रकारात गुंतलेले प्रश्न अनेक आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत. घटनेने अखिलाला दिलेले निर्णय स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार तिच्या वडिलांना वा जातीधर्माला आहे काय? तो आहे असे मान्य केले तर व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना काही अर्थ उरतो काय? अखिलाने कोणताही अपराध वा अवैध कृत्य केले नाही. ती सज्ञान नागरिक आहे. अशा मुलीला आपल्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे की नाही आणि ती तो वापरीत असेल तर तिला घरात डांबून ठेवणारे तिचे कुटुंबीय अपराधी ठरतात की नाही? धर्माचे वा जातीचे बंधन स्वातंत्र्याच्या मूल्याहून श्रेष्ठ आहे काय? धर्मसंसदा, खापपंचायती किंवा जातींची न्यायालये यांचा अजूनही देशात बुजबुजाट आहे. या पंचायती थेट मृत्युदंडाचीही शिक्षा देतात. त्यापुढे आपली सरकारे वाकतानाही आपण पाहिली आहेत. शहाबानोच्या निकालानंतर सरकारएवढीच संसदही अशी नमलेली दिसली आहे... १९६२ मध्ये अमेरिकेच्या व्हर्जिनिया या राज्याने एका कृष्णवर्णी विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तो देण्याची आज्ञा त्या सरकारला व शाळेला दिली. ती पाळायला त्यांनी नकार दिला तेव्हा जॉन एफ. केनेडी या अध्यक्षांनी त्या राज्यात केंद्रीय लष्कराचे पथक एका रणगाड्यानिशी पाठविले व त्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्या मुलाला कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ते पथक अध्यक्षांनी तेथेच तैनात ठेवले. या काळात तो मुलगा सायकलवरून शाळेत जात आहे आणि त्याच्या रक्षणार्थ एक अजस्त्र रणगाडा त्याच्या मागून शाळेकडे जात आहे असे कमालीचे स्फूर्तीदायी व प्रगतीपर चित्र लाईफ या नियतकालिकाने प्रकाशित केले होते.... अखिलाच्या प्रकरणावर याहून वेगळे भाष्य करायचे बाकी राहते काय?