शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

गर्भातच कळ्या खुडणारे गुन्हेगार कोण?

By नंदकिशोर पाटील | Updated: March 16, 2024 07:48 IST

पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत घटलेले स्त्री-पुरुष लिंग गुणाेत्तर चिंताजनक आहे. गंभीर सामाजिक समस्येचे ते लक्षण आहे.

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या महिला धोरणाच्या बातमीची शाई वाळते ना वाळते तोच, समोर आलेल्या एका आकडेवारीने आपली झोप उडाली नाही तरच नवल! पुरोगामी राज्य म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत घटलेले स्त्री-पुरुष लिंग गुणाेत्तर प्रमाण केवळ चिंताजनक नसून, येऊ घातलेल्या एका गंभीर सामाजिक समस्येचे ते लक्षण आहे; ज्याचे दुष्परिणाम सध्याच जाणवू लागले आहेत. 

राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये २०१९च्या तुलनेत लिंग गुणोत्तर घटले आहे. मुख्यत: दुष्काळी प्रदेशात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात होतात ही बाब बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणातून समोर आली होती. या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या अधिक आहे. ऊस तोडणीसाठी सहा-सहा महिने घराबाहेर राहणाऱ्या महिलांना बाळंतपण परवडणारे नसते. त्यामुळे या महिला गर्भपिशवी काढून टाकतात. परंतु, उपसंचालकांनी ‘रेड अलर्ट’ दिलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, सांगली, नागपूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगरसारख्या तुलनेने प्रगत जिल्ह्यांचा समावेश असल्याने या सामाजिक संकटाची व्याप्ती आणि गांभीर्य अधिकच अधोरेखित झाले आहे. 

गर्भलिंग निदान व गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदाही आहे; परंतु, याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचा संशय उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. सामाजिक जागृती आणि आरोग्य यंत्रणेचा वॉच यामुळे बीड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सुधारले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. जालन्याची आकडेवारी सर्वाधिक चिंताजनक आहे. या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर ८५४ वर आले आहे. म्हणजेच, एक हजार मुलांमागे मुलींची संख्या १६८ ने घटली आहे! जालन्यानंतर अकोला, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांतील लिंग गुणोत्तर पहिल्यांदाच घटले आहे असे नव्हे, तर घटीचे प्रमाणही वाढले आहे.

मुलगा असो की मुलगी, नव्या जिवाच्या जन्माचे स्वागत व्हायलाच हवे. पण, मुलगी जन्मताच कामा नये अशी मानसिकता आपण बाळगणार असू तर कितीही कठोर कायदे केले तरी गर्भपातासारख्या प्रकारांना आळा बसू शकणार नाही. एकीकडे पैशांच्या लालसेपोटी वैद्यकीय व्यवसायाच्या पावित्र्याला काळिमा फासणारे आधुनिक कसाई आणि दुसरीकडे मुलीचा भार नको म्हणून त्यास बळी पडणारे लोक! असे हे दुहेरी रॅकेट आहे. 

जन्माला येणाऱ्या मुलाबाबतचा निर्णय बहुतेक घरांत पुरुषांच्या मर्जीचा मामला असतो. १९९० च्या दशकात अल्ट्रासाउंडसारखे आधुनिक तंत्रज्ञान आल्यानंतर जन्माला येणारे मूल स्त्रीजातक असेल तर तो गर्भ पाडून टाकण्याचे प्रकार कमालीचे वाढले. दक्षिण भारताच्या तुलनेत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या प्रगतशील राज्यांत गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे, हे विशेष! 

लोकसंख्येत सुमारे ३० दशलक्ष स्त्रियांची तूट असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑगस्ट १९९४ मध्ये संसदेने जन्मपूर्व निदान तंत्र कायदा लागू केला. ज्याने समुपदेशन केंद्रांना कठोर निकष पाळल्याशिवाय अशा प्रक्रिया करण्यास मनाई केली. तथापि, पोलिस-डॉक्टर यांच्यात आर्थिक हितसंबंध निर्माण झाल्याने हा कायदा धाब्यावर बसविण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष बान की मून भारतात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील घटत्या लिंग गुणोत्तराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशीच चिंता अलीकडे आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षांनीदेखील व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Abortionगर्भपात