शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा कुठे गेला होता धर्म ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:14 IST

कुरूक्षेत्रात युद्धाला सज्ज झाल्यावरही समोर प्रतिपक्षात आपल्या सगेसोयऱ्यांना पाहून अर्जुनाची जशी दिङ्मूढ स्थिती झाली अगदी तशीच द्विधा अवस्था आमच्या देवेंद्रभाऊंची झालेली..

हे काय घडतंय भगवंत?कुरूक्षेत्रात युद्धाला सज्ज झाल्यावरही समोर प्रतिपक्षात आपल्या सगेसोयऱ्यांना पाहून अर्जुनाची जशी दिङ्मूढ स्थिती झाली अगदी तशीच द्विधा अवस्था आमच्या देवेंद्रभाऊंची झालेली...सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाऊंनी प्रतिपक्षाच्या व्यूहरचनेचा भेद करीत आपला रथ रणभूमीच्या केंद्रस्थानी आणला आणि सभोवताल नजर टाकली. तो पालघरचा पट्टा, इकडे भंडारा-गोंदिया, बाजूला अमरावती त्याला लागून चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा. अगदी नाकासमोर नाशिक. पुढे पलुस-कडेगाव. सर्व पट्ट्यात सेना सज्ज.एव्हाना भाऊंनी अर्जुनाच्या भूमिकेत एन्ट्री घेतलेली. समोर उभी ठाकलेली सेना (एकटी शिव नाही). पाहून या अर्जुनाला मग स्फुरण चढले. हाती गदा घेऊन युद्धासाठी तो सज्ज झाला. तेवढ्यात मागून आवाज आला... गदा कसली घेतोस वत्सा, उचल तुझे ते गांडीव आणि साध निशाणा. अर्जुनाने (अर्थात देवेंद्रभाऊंनी) मागे वळून पाहिले. प्रत्यक्षात सारथी नव्हताच. दिल्लीहून हायकमांड रिमोट कंट्रोलने रथाचे सारथ्य करीत होते. या अदृश्य सारथ्यास नमन करून अर्जुन म्हणाला, या युद्धात धनुष्यबाणाची मदत न घेण्याचा प्रण मी केला आहे भगवंत.सारथी : ठीक आहे. वापर तुझे इतर अस्त्र. पण एक लक्षात ठेव... त्या तुझ्या राखीव नारायणास्त्रावर विसंबून राहू नकोस....ठीक आहे असे म्हणून अर्जुनाने प्रतिपक्षाच्या दिशेने कूच केले. पण हे काय...? त्याच्या हातची गदा अचानक गळून पडली. अवसानच गळाले! ज्यांच्या गळ्यात गळा घालून वावरलो, त्यांचेच गळे कापायचे...? पालघरचा तो वनगा काल तर माझा सखा होता ना? आणि तो कोकणी पट्ट्यातला सरदार...त्याला मीच तर खासदारकीच्या गादीवर बसवलं...!नाही...नाही...! यांच्यावर वार करणे मला शक्य नाही. हे धर्मसंगत नाही.(अर्जुन माघार घेतोय हे पाहून त्याला गीता सांगण्याच्या भानगडीत न पडता सारथ्याने त्याचा खरमरीत क्लासच घेतला.)सारथी : हे बघ अर्जुना, तू येथे रणभूमीवर आहेस. संघाच्या चिंतन शिबिरात नाही हे लक्षात घे आणि हे ‘धर्मसंगत’ वगैरे काय बरळतोस...! महाभारतात मी कर्णाला सुनावले तेच तुलाही सुनावतो....त्या वनगाच्या मूत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला वाºयावर सोडले तेव्हा कुठे गेला होता गंगाधरपुत्रा तुझा धर्म?... वनगाला सेनेने हायजॅक केले, त्याला काटशह म्हणून शत्रुपक्षातून तू उमेदवार आणलास... तेव्हा कुठे गेला होता विदर्भपुत्रा तुझा धर्म? कोकणात सेनेवर नारायणास्त्र कोसळेल हे माहीत असतानाही तू गप्प राहिलास तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म...? आणि नाशकात...! सेनेच्या पाठी होता ना तू...मग तो ‘कोकणी’ पिल्ला का सोडलास त्यांच्यावर. तेव्हा नाही आठवला धर्म?आणि एक लक्षात ठेव...! भुजबळ नावाचे रॉकेट कालच लाँच झाले. राष्टÑवादीच्या लाँचपॅडवरून ते उडाले असले तरी कधी मातोश्रीवर विसावेल याचा नेम नाही. २५ वर्षांचा घरोबा होता म्हणे त्यांचा. तेव्हा त्यांची ताकद वाढण्याआधीच होऊन जाऊ दे हर...हर...महादेव.- दिलीप तिखिले