शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या आई-वडिलांच्या काळात ‘ग्लोबल वॉर्मिंग’कुठे होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 07:20 IST

चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही.

- लोकेश बापट

कालच - रविवारी जैवविविधता दिवस साजरा झाला. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही, कारण तेव्हा शहरांची महानगरे झाली नव्हती. लोकसंख्या मर्यादित होती. डोंगर व  टेकड्या यांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व होते. नद्या, विहिरी, ओढे  निर्मळ होते. 

जीवनमान बदललेले नसल्याने हवेचे प्रदूषण वगैरे चर्चेत नव्हते.  ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर लोकसंख्या वेगाने वाढू लागली. लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले. गरजा बेसुमार वाढू लागल्या. औद्योगिकरण विकासाचा वेगही प्रचंड वाढला. मानव व पर्यावरणाचा संघर्ष सुरू झाला. लोभ,  स्वार्थ, पैसा,  फायदा, हव्यास व लालसेपोटी या विकासाने वृक्ष, वेली, झाडे, डोंगर, टेकड्या, पाणी, पशु-पक्षी, हवा, माती हे सारे गिळून टाकायला सुरूवात केली. निसर्गातील प्रत्येक परिसंस्थांवरचा ताण  वाढत गेला. यामध्ये अनेक परिसंस्था नष्ट झाल्या. मानवी कृत्यामधून निर्माण झालेला  अतिरिक्त ताण सहनशक्तीच्या पलीकडे गेला तर  परिसंस्था कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे.   भविष्यात मानव जातीच्या अस्तित्वाला हा मोठा धोका ठरू शकतो. 

- दोन वर्षांपूर्वी एका छोट्या विषाणूने हेच जगाला दाखवून दिले. त्याने जगभरातील सर्व लोकांना काही महिने घरात कैद करून ठेवले आणि निसर्गाने त्या छोट्याशा कालावधीत माणसांच्या मदतीशिवाय आपले  काम चोख बजावले.  हवा स्वच्छ झाली, नद्या, ओढे, विहिरी यातील पाणी स्वच्छ झाले, अनेक वर्ष लोप  पावलेली  झाडेझुडपे, पक्षी, प्राणी आशा काही प्रजातींचे पुन्हा दर्शन झाले. हे का घडले?  तर  मानवाची निसर्गातील लुडबूड काही काळापुरती बंद झाली, म्हणून! खरंतर  निसर्गाला  माणसाची  कधीच गरज नव्हती. आपण मात्र  ‘बिनबुलाये मेहमान’सारखे  त्याच्या घरात विनाकारण घुसलो आणि आता ते घर बळकावण्याचा सोस आपल्याला लागला आहे. आज निसर्ग रक्षण जर खरंच करायचं असेल, तर मानवाने भविष्यात निसर्गात कोणताही, कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप न करता त्याला त्याचे काम करू द्यावे. - lokeshbapat@gmail.com