शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आपल्या आई-वडिलांच्या काळात ‘ग्लोबल वॉर्मिंग’कुठे होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 07:20 IST

चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही.

- लोकेश बापट

कालच - रविवारी जैवविविधता दिवस साजरा झाला. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही, कारण तेव्हा शहरांची महानगरे झाली नव्हती. लोकसंख्या मर्यादित होती. डोंगर व  टेकड्या यांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व होते. नद्या, विहिरी, ओढे  निर्मळ होते. 

जीवनमान बदललेले नसल्याने हवेचे प्रदूषण वगैरे चर्चेत नव्हते.  ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर लोकसंख्या वेगाने वाढू लागली. लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले. गरजा बेसुमार वाढू लागल्या. औद्योगिकरण विकासाचा वेगही प्रचंड वाढला. मानव व पर्यावरणाचा संघर्ष सुरू झाला. लोभ,  स्वार्थ, पैसा,  फायदा, हव्यास व लालसेपोटी या विकासाने वृक्ष, वेली, झाडे, डोंगर, टेकड्या, पाणी, पशु-पक्षी, हवा, माती हे सारे गिळून टाकायला सुरूवात केली. निसर्गातील प्रत्येक परिसंस्थांवरचा ताण  वाढत गेला. यामध्ये अनेक परिसंस्था नष्ट झाल्या. मानवी कृत्यामधून निर्माण झालेला  अतिरिक्त ताण सहनशक्तीच्या पलीकडे गेला तर  परिसंस्था कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे.   भविष्यात मानव जातीच्या अस्तित्वाला हा मोठा धोका ठरू शकतो. 

- दोन वर्षांपूर्वी एका छोट्या विषाणूने हेच जगाला दाखवून दिले. त्याने जगभरातील सर्व लोकांना काही महिने घरात कैद करून ठेवले आणि निसर्गाने त्या छोट्याशा कालावधीत माणसांच्या मदतीशिवाय आपले  काम चोख बजावले.  हवा स्वच्छ झाली, नद्या, ओढे, विहिरी यातील पाणी स्वच्छ झाले, अनेक वर्ष लोप  पावलेली  झाडेझुडपे, पक्षी, प्राणी आशा काही प्रजातींचे पुन्हा दर्शन झाले. हे का घडले?  तर  मानवाची निसर्गातील लुडबूड काही काळापुरती बंद झाली, म्हणून! खरंतर  निसर्गाला  माणसाची  कधीच गरज नव्हती. आपण मात्र  ‘बिनबुलाये मेहमान’सारखे  त्याच्या घरात विनाकारण घुसलो आणि आता ते घर बळकावण्याचा सोस आपल्याला लागला आहे. आज निसर्ग रक्षण जर खरंच करायचं असेल, तर मानवाने भविष्यात निसर्गात कोणताही, कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप न करता त्याला त्याचे काम करू द्यावे. - lokeshbapat@gmail.com