शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कधी जागे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:03 IST

हवामान बदलांच्या परिणामांचा आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे. आपण जागे होणार आहोत की नाही?

- रवी टालेहवामान बदलांच्या परिणामांचा आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे. आपण जागे होणार आहोत की नाही?जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये सध्या विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. अमेरिकेच्या हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा कधी नव्हे असा उद्रेक झाला असून, लाव्हारस अनेक घरांना कवेत घेत सुटला आहे. लाव्हारसाची शेकडो फूट उंचीची कारंंजी उडत असून, सोबतीला भूकंपाचे झटके बसत आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडत असलेल्या विषारी वायूंनी आसमंत व्यापून टाकला आहे. तिकडे टर्कीची राजधानी असलेल्या अंकारा शहरात अवकाळी पावसाने नुकतेच असे काही थैमान घातले, की जणू जगाचा अंत जवळ आला आहे, असे वाटावे! त्याचवेळी भारतात धूळीच्या वादळाने सुमारे शंभर बळी घेतले आणि आणखी आठवडाभर तरी भारताच्या बहुतांश भागांना वादळाचा धोका आहेच!भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीने दिलेल्या इशाºयानुसार, आणखी किमान आठवडाभर तरी देशभर विचित्र हवामानाचा अनुभव येणार आहे. आयएमडीनुसार येत्या काही दिवसात किमान १३ राज्यांना वादळ आणि वादळी पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या मधोमध वसलेल्या विदर्भात या कालावधीत तापमान उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे.जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांबाबत आतापर्यंत केवळ वाचायला, ऐकायलाच मिळत होते. आता सर्वसामान्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागला आहे.भारतापुरते बोलायचे झाल्यास, पावसाळ्याच्या आगमनापूर्वीची वादळे ही नित्याचीच बाब आहे; मात्र वादळांची यावर्षीसारखी तीव्रता यापूर्वी कधी दिसली नव्हती. शास्त्रज्ञांच्या मते, सातत्याने वाढत असलेले तापमान त्यासाठी कारणीभूत आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस भारतात वादळे येतातच; मात्र वाढत्या तापमानामुळे त्यांची तीवता आणि वारंवारिता वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी यापूर्वीच वर्तविला होता. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आपण सध्या घेत आहोत.गत चार वर्षात भारतात उष्णतेच्या लाटांनी तब्बल ४,६०० लोकांचे बळी घेतले. वाढत्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे तापमानवाढीस हातभार लागत असून, जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर या शतकाच्या अखेरीस भारतातील बराच मोठा भाग मानवी वस्तीच्या लायक उरणार नाही, असे भाकित संशोधकांनी वर्तविले आहे. शतकाची अखेर होण्यास अद्याप बराच अवकाश आहे; पण येत्या पाच वर्षातच तापमानातील अधर््या अंशाची वाढही मोठ्या प्रमाणात मानवी बळी घेईल, अशी भीती आहे.‘इंदिरा गांधी इंस्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’नुसार, ‘इंटरगव्हर्नर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज’ने जागतिक तापमानवाढीविषयी वर्तविलेली भाकिते प्रत्यक्षात उतरल्यास, हवामानातील बदलांमुळे भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) नऊ टक्क्यांनी घसरेल. त्यासाठी कारणीभूत ठरेल, तांदुळासारख्या पिकांच्या उत्पादनात संभवणारी ४० टक्क्यांपर्यंतची घट! याशिवाय मुंबई, चेन्नईसारख्या समुद्रकाठावरील शहरांचे काही भाग पाण्याखाली गेल्याने जवळपास ७० लाख लोक बेघर होतील. हे सगळे अत्यंत भयानक आहे. प्रश्न हा आहे, की आपण आता तरी जागे होणार आहोत की नाही?