शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

कधी जागे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:03 IST

हवामान बदलांच्या परिणामांचा आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे. आपण जागे होणार आहोत की नाही?

- रवी टालेहवामान बदलांच्या परिणामांचा आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे. आपण जागे होणार आहोत की नाही?जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये सध्या विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. अमेरिकेच्या हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा कधी नव्हे असा उद्रेक झाला असून, लाव्हारस अनेक घरांना कवेत घेत सुटला आहे. लाव्हारसाची शेकडो फूट उंचीची कारंंजी उडत असून, सोबतीला भूकंपाचे झटके बसत आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडत असलेल्या विषारी वायूंनी आसमंत व्यापून टाकला आहे. तिकडे टर्कीची राजधानी असलेल्या अंकारा शहरात अवकाळी पावसाने नुकतेच असे काही थैमान घातले, की जणू जगाचा अंत जवळ आला आहे, असे वाटावे! त्याचवेळी भारतात धूळीच्या वादळाने सुमारे शंभर बळी घेतले आणि आणखी आठवडाभर तरी भारताच्या बहुतांश भागांना वादळाचा धोका आहेच!भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीने दिलेल्या इशाºयानुसार, आणखी किमान आठवडाभर तरी देशभर विचित्र हवामानाचा अनुभव येणार आहे. आयएमडीनुसार येत्या काही दिवसात किमान १३ राज्यांना वादळ आणि वादळी पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या मधोमध वसलेल्या विदर्भात या कालावधीत तापमान उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे.जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांबाबत आतापर्यंत केवळ वाचायला, ऐकायलाच मिळत होते. आता सर्वसामान्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागला आहे.भारतापुरते बोलायचे झाल्यास, पावसाळ्याच्या आगमनापूर्वीची वादळे ही नित्याचीच बाब आहे; मात्र वादळांची यावर्षीसारखी तीव्रता यापूर्वी कधी दिसली नव्हती. शास्त्रज्ञांच्या मते, सातत्याने वाढत असलेले तापमान त्यासाठी कारणीभूत आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस भारतात वादळे येतातच; मात्र वाढत्या तापमानामुळे त्यांची तीवता आणि वारंवारिता वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी यापूर्वीच वर्तविला होता. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आपण सध्या घेत आहोत.गत चार वर्षात भारतात उष्णतेच्या लाटांनी तब्बल ४,६०० लोकांचे बळी घेतले. वाढत्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे तापमानवाढीस हातभार लागत असून, जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर या शतकाच्या अखेरीस भारतातील बराच मोठा भाग मानवी वस्तीच्या लायक उरणार नाही, असे भाकित संशोधकांनी वर्तविले आहे. शतकाची अखेर होण्यास अद्याप बराच अवकाश आहे; पण येत्या पाच वर्षातच तापमानातील अधर््या अंशाची वाढही मोठ्या प्रमाणात मानवी बळी घेईल, अशी भीती आहे.‘इंदिरा गांधी इंस्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’नुसार, ‘इंटरगव्हर्नर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज’ने जागतिक तापमानवाढीविषयी वर्तविलेली भाकिते प्रत्यक्षात उतरल्यास, हवामानातील बदलांमुळे भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) नऊ टक्क्यांनी घसरेल. त्यासाठी कारणीभूत ठरेल, तांदुळासारख्या पिकांच्या उत्पादनात संभवणारी ४० टक्क्यांपर्यंतची घट! याशिवाय मुंबई, चेन्नईसारख्या समुद्रकाठावरील शहरांचे काही भाग पाण्याखाली गेल्याने जवळपास ७० लाख लोक बेघर होतील. हे सगळे अत्यंत भयानक आहे. प्रश्न हा आहे, की आपण आता तरी जागे होणार आहोत की नाही?