शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

शेतक-यांना मारण्याचा हा अमानुष खेळ कधी थांबणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:12 IST

यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत. त्याशिवाय शेतक-यांना मारण्याचा हा अमानुष खेळ थांबणार नाही. पण या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्या कृषी केंद्रांना असलेल्या राजकीय संरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची कठोरपणे अंमजबजावणी होईल की नाही, अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात आहे. कीटकनाशक फवारणीतून मरण पावलेल्या शेतक-यांच्या मृत्यूला अपघात म्हणता येणार नाही. हा सदोष मनुष्यवध आहे. अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून या कीटकनाशक कंपन्या आणि कृषी केंद्रांच्या मालकांनी शेतकºयांच्या ताटात तर विष कालवले आहे. हा क्रूर खेळ सुरू असताना सरकारी यंत्रणा गप्प होती. शेतकºयांच्या मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्यानंतरही प्रशासन निगरगट्ट होते. प्रशासनाची भूमिका सुरुवातीपासूनच कंपन्या आणि कृषी केंद्र मालकांना वाचविण्याची होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यवतमाळचा दौरा केल्यानंतर कृषी खात्यातील १५ अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. यात चीड आणणारी गोष्ट अशी की, यातील फक्त एकाच अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची तसदीही प्रशासनाने अद्याप घेतली नाही. कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांची एक मोठी साखळी या जिल्ह्यात कार्यरत आहे. या जिल्ह्यातील काही राजकारण्यांना तीे नियमित पोसत असते. पाटणबोरी, पांढरकवडा या भागात अवैध कीटकनाशकांचे गोडाऊन्स आहेत. लगतच्या तेलंगणातील अदिलाबाद येथून बनावट कीटकनाशकांची तस्करी नियमितपणे या भागात होते. पण, पोलिसांना आणि कृषी खात्याला याचा थांगपत्ताही लागत नाही. यवतमाळ जिल्ह्यात झालेले एवढे मृत्यू हे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे ढळढळीत अपयश आहे. त्याबद्दलचे प्रायश्चित्त कोण घेणार? आपल्या कठोर निर्देशांची तेवढ्याच तत्परतेने अंमलबजावणी होते की नाही, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा त्यांची ही घोषणा फसवी ठरेल. कीटकनाशक कंपन्या राजकीय अर्थकारणात नेहमीच प्रभावी ठरत असतात. कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेत असो, त्यांचे कुणीच काहीही बिघडवू शकत नाही. शेतक-यांचे अनेक नेते त्यांच्यासमोर नांगी टाकतात किंवा त्यांचे भागीदार होतात. त्यामुळे फडणवीसांच्या या कठोर निर्णयाबद्दल जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण, बळीराजाचे कल्याण करावयाचे असेल तर मुख्यमंत्र्यांना या बदमाशांच्या मुसक्या आवळाव्याच लागतील.

टॅग्स :Farmerशेतकरी