शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दलितविरोधी मानसिकता कधी बदलणार?

By admin | Updated: September 2, 2015 00:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर केले असून, १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर केले असून, १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष सामाजिक समता न्याय वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचे घोषित झाले आहे.एकीकडे बाबासाहेबांचा शासकीय पातळीवर असा गुणगौरव होत असतानाच दुसरीकडे बाबासाहेबांनी ज्या दलित समाजाला माणुसकीचे हक्क मिळावेत म्हणून आकाशपाताळ एक केले, त्या दलित समाजाला-मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्याच्या चोरंबा गावी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आल्याची मन विदीर्ण करणारी बातमी प्रसिद्ध झाली आहे. या विरोधाभासाची संगती कशी लावावी?चोरंबा गावात जे काही घडल्याचे सांगण्यात येते ते परंपरेस धरूनच झाल्यामुळे त्यात विशेष नवल नव्हे. ग्रामीण भागात जातीव्यवस्थेच्या रुढी-परंपरा अजूनही इतक्या घट्ट आहेत की, प्रत्येक गावात प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र पाणवठे, स्वतंत्र विहीर अजूनही कायम आहे. डॉ. बाबा आढावांनी सत्तरच्या दशकात ‘एक गाव एक पाणवठा’ ही सामाजिक विषमता नष्ट करणारी मोहीम राबविली होती. पण ग्रामीण भागातून जाती-प्रथेचा पुरस्कार करणाऱ्या जीर्ण रुढी-परंपरा अजूनही मिटलेल्या नाहीत हेच चोरंबा गावातील पाणी प्रकरणाने अधोरेखित केले असेच म्हणावे लागेल.दलित समाजावर खैरलांजी खर्ड्यासारखे अमानुष अत्याचार करणे , त्यांचे खून करणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकणे वगैरे हा आपल्या समाजाला जाती-वर्ण-धर्मव्यवस्थेने दिलेला जणू एक मूलभूत अधिकारच आहे. दलितांवर अत्याचार करताना त्याचे म्हणूनच कोणाला काही वाटत नाही. अत्याचार करताना कुणीही आपल्या मनास असा प्रश्न विचारीत नाही की आपण दलितांवर का म्हणून जुलुम करीत आहोत? त्यांचा गुन्हा काय? माणुसकीचा हक्क मागणे, स्वाभिमानाने जगणे हा का गुन्हा ठरतो? नाही. मुळीच नाही. तरीही त्यांच्यावर अमानुष अत्याचार का व्हावेत? त्यांच्यावर बहिष्कार का पडावेत? त्यांचे रक्त का सांडावे? त्यांना मानवी हक्क का नाकारावेत? तर रुढी-परंपरा-धर्मानेच जातीव्यवस्थेस मान्यता देऊन दलितांना अस्पृश्य आणि नीच ठरविले म्हणून! तात्पर्य, दलितांना छळणे, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करणे म्हणजेच धर्माचरण होय. ही सनातनी बुरसटलेली मानसिकता जोवर कायम आहे, तोवर दलितांवर अन्याय अत्याचार होतच राहणार हे उघड आहे.जालियनवाला बागेत जनरल डायरने जो राक्षसी गोळीबार करून भारतीयांचे प्राण घेतले त्याबाबत माजी ब्रिटीश पंतप्रधान कॅमेरुन व ब्रिटीश राजपुत्राने भारतीयांची जाहीर माफी मागितली. इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर शीख समाजावर जे अत्त्याचार झाले त्याबाबत व हिंदुत्त्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केल्यानंतर कॉँग्रेस, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधींनी शीख व मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली. पण शेकडो वर्षे नाहकच दलित समाजावर जे अनन्वीत व अगणित अत्त्याचार आपल्या वर्ण-जातीवादी समाजव्यवस्थेने केले त्याबाबत माफी तर सोडाच पण साधा खेदही कुणी व्यक्त करीत नाही यास कोणता सामाजिक न्याय म्हणावे?दलित समाज त्याच्यावर होणारे अत्त्याचार सहन करीत असतानाच सनदशीर मार्गाने अत्याचाराचा निषेध करतो. पण निषेध करीत असताना त्याचेकडून क्वचितप्रसंगी तोल गेला की लागलीच त्याला नक्षलवादी ठरविले जाते. दलित संघटनांच्या आक्रोश मोर्चाविरुद्ध प्रति मोर्चा काढून दलित संघटनांवरच कारवाई व्हावी अशी मागणी जात वर्चस्ववादी संघटनांकडून करण्यात येते. दलित हे अत्त्याचार करण्यासाठीच असतात व अत्त्याचार करणे हा आपला मूलभूत हक्कच आहे अशी ही दलितविरोधी सनातनी-सवर्ण मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर दलित समाजावरील अत्याचार थांबणार नाहीत हे उघड आहे.म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या सामाजिक समतेच्या चळवळीमुळे समाजात एक सुधारणावादी परिवर्तन जरूर आले. पण आता पुरोगामी चळवळी संपून जातवर्चस्ववादी संघटनांचे पेव गावोगावी फुटल्यामुळे दलित अत्त्याचारात वाढ होत आहे. दुसरीकडे दलित पुढारी व काही दलित लेखक-विचारवंत कॉँग्रेसची शागिर्दी करून झाल्यावर भाजपा-सेनेच्या वळचणीला जाऊन परिवर्तनवादी चळवळीलाच नख लावण्याचे घोर पातक करीत आहेत. कॉँग्रेसकडून आजवर भरपूर पदांचे फायदे करून घेतलेले एक अर्थशास्त्रज्ञ आता कॉँग्रेसची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भलामण करू लागले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे करीत असताना दलितांवरील अत्त्याचार थांबून, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कशी वाढेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल व अत्त्याचार रोखण्याच्याबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल या अनुषंगाने विचारमंथन व्हावे ही अपेक्षा. दुसरे काय?- बी. व्ही. जोंधळे