शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धांमधून सुटका कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:54 IST

अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस सुन्न करून सोडणाऱ्या या घटनेने आपल्या समाजाच्या एकंदर जडणघडणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या कुटुंबात ही घटना घडली ते कुटुंब आत्यंतिक दारिद्र्यात दिवस कंठत होते. ज्या पित्याने हे हत्याकांड घडविले तो अशिक्षित आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याच्यावर अंधश्रद्धांचा पगडा असल्याचे म्हणावे, तर इंडियन प्रीमिअर लीगमधील एका संघाची मालकीण असलेल्या अब्जाधीश महिलेच्या कृतीचा उलगडा कसा करावा? धोतर्डीतील घटनेच्या आगेमागेच त्या अब्जाधीश महिलेची एक चित्रफित समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली. त्यामध्ये आपला संघ विजयी व्हावा म्हणून त्या काही तरी पुटपुटत वारंवार स्वत:चे डोळे, मस्तक व डोक्यावरून हात फिरवताना दिसतात. त्यांच्या बाबतीत तर दारिद्र्य किंवा शिक्षणाच्या अभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग तरीही अंधश्रद्धेचा एवढा पगडा? त्या ज्या देवास किंवा बाबास संघाच्या विजयाचे साकडे घालत होत्या, तो देव किंवा बाबा एवढा शक्तिशाली असेल, तर मग कोट्यवधी रुपये मोजून नामवंत क्रिकेटपटू विकत घेण्याची गरजच काय? थोडक्यात काय, तर आपल्या देशात अंधश्रद्धा आणि सांपत्तिक स्थिती किंवा शिक्षणाचा काहीही संबंध नाही. उलट गर्भश्रीमंतच जास्त अंधश्रद्धाळू असल्याची अनेक उदाहरणे नित्य बघायला मिळतात. ज्या देशात अवकाश विज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणाºया संस्थेतील उच्च पदांवरील शास्त्रज्ञच प्रत्येक अवकाशयानाच्या प्रक्षेपणापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहाची प्रतिकृती घेऊन, देवाच्या दरबारी प्रक्षेपण यशस्वी होऊ देण्याचे साकडे घालण्यासाठी पोहोचतात, त्या देशात इतरांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करावी? जेव्हा असे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सांगड न घालण्याचा शहाजोग सल्ला दिला जातो; पण या दोहोतील सीमारेषा एवढी धूसर आहे, की श्रद्धा संपून अंधश्रद्धा कुठे सुरू होते, हे कळतच नाही! जोपर्यंत अंधश्रद्धा निरुपद्रवी असते, तोपर्यंत तिच्याकडे दुर्लक्ष करता येते; पण जेव्हा ती धोतर्डीसारखी जीवघेणी ठरते, तेव्हा निदान बाविसाव्या शतकात तरी आपण यामधून बाहेर पडू शकू की नाही, हा विचार मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. केवळ राज्यघटनेत केलेली तरतूद किंवा विविध कायदे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुरेसे नाहीत, हे सत्यच धोतर्डीतील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.