शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धांमधून सुटका कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:54 IST

अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

अकोला जिल्ह्यातील धोतर्डी नामक छोट्याशा गावात, गत बुधवारी एका पित्याने केवळ अंधश्रद्धेतून पोटच्या तीन चिमुकल्यांना ठार केले अन् नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस सुन्न करून सोडणाऱ्या या घटनेने आपल्या समाजाच्या एकंदर जडणघडणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या कुटुंबात ही घटना घडली ते कुटुंब आत्यंतिक दारिद्र्यात दिवस कंठत होते. ज्या पित्याने हे हत्याकांड घडविले तो अशिक्षित आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याच्यावर अंधश्रद्धांचा पगडा असल्याचे म्हणावे, तर इंडियन प्रीमिअर लीगमधील एका संघाची मालकीण असलेल्या अब्जाधीश महिलेच्या कृतीचा उलगडा कसा करावा? धोतर्डीतील घटनेच्या आगेमागेच त्या अब्जाधीश महिलेची एक चित्रफित समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली. त्यामध्ये आपला संघ विजयी व्हावा म्हणून त्या काही तरी पुटपुटत वारंवार स्वत:चे डोळे, मस्तक व डोक्यावरून हात फिरवताना दिसतात. त्यांच्या बाबतीत तर दारिद्र्य किंवा शिक्षणाच्या अभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग तरीही अंधश्रद्धेचा एवढा पगडा? त्या ज्या देवास किंवा बाबास संघाच्या विजयाचे साकडे घालत होत्या, तो देव किंवा बाबा एवढा शक्तिशाली असेल, तर मग कोट्यवधी रुपये मोजून नामवंत क्रिकेटपटू विकत घेण्याची गरजच काय? थोडक्यात काय, तर आपल्या देशात अंधश्रद्धा आणि सांपत्तिक स्थिती किंवा शिक्षणाचा काहीही संबंध नाही. उलट गर्भश्रीमंतच जास्त अंधश्रद्धाळू असल्याची अनेक उदाहरणे नित्य बघायला मिळतात. ज्या देशात अवकाश विज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणाºया संस्थेतील उच्च पदांवरील शास्त्रज्ञच प्रत्येक अवकाशयानाच्या प्रक्षेपणापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहाची प्रतिकृती घेऊन, देवाच्या दरबारी प्रक्षेपण यशस्वी होऊ देण्याचे साकडे घालण्यासाठी पोहोचतात, त्या देशात इतरांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करावी? जेव्हा असे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सांगड न घालण्याचा शहाजोग सल्ला दिला जातो; पण या दोहोतील सीमारेषा एवढी धूसर आहे, की श्रद्धा संपून अंधश्रद्धा कुठे सुरू होते, हे कळतच नाही! जोपर्यंत अंधश्रद्धा निरुपद्रवी असते, तोपर्यंत तिच्याकडे दुर्लक्ष करता येते; पण जेव्हा ती धोतर्डीसारखी जीवघेणी ठरते, तेव्हा निदान बाविसाव्या शतकात तरी आपण यामधून बाहेर पडू शकू की नाही, हा विचार मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. केवळ राज्यघटनेत केलेली तरतूद किंवा विविध कायदे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुरेसे नाहीत, हे सत्यच धोतर्डीतील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.